शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

किल्ले रायगड परिसरातील उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने? जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 07:03 IST

सिकंदर अनवारे  लोकमत न्यूज नेटवर्क  महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरामध्ये काही विकासकांकडून जमीन सपाटीकरण, उत्खननाची कामे मोठ्या प्रमाणात ...

सिकंदर अनवारे लोकमत न्यूज नेटवर्क महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरामध्ये काही विकासकांकडून जमीन सपाटीकरण, उत्खननाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे या परिसरातील जैवविविधता, ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळे कामे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

  मध्यंतरीच्या रायगड प्राधिकरण या स्वतंत्र विभागाची स्थापना होऊन येथे सरकारने कोट्यवधी खर्च केले आहेत. याद्वारे शिवकाळात ज्या पद्धतीने वास्तू उभ्या होत्या तशा ऐतिहासिक वास्तू उभ्या करण्याचा प्रयत्न होता.  परंतु आता येथे पर्यटक, शिवभक्तांसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा तयार करणे, पाणी योजना राबविणे आदी कामांवर भर देण्यात आला आहे.  मात्र स्थानिकांसह अन्य काही व्यावसायिकांनी येथे टोलेजंग इमारती बांधण्यासाठी, हॉटेल व्यवसाय उभे करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण सुरू केले आहे. यामुळे हिरकणी वाडीसह अन्य गावांना भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रायगड परिसरातील नेवाली, हिरकणी वाडी परिसरात तडे जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार भूगर्भशास्त्र विभागाने काही उपाय सुचवले होते, अशी माहिती पाचाडचे माजी सरपंच रघुवीर देशमुख यांनी दिली. 

...तरीही उत्खनन का? किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडीमध्ये काही वर्षांपूर्वी जमिनीला भेगा गेल्या होत्या. रस्ता खचला होता. सातत्याने या ठिकाणी महसूल प्रशासन लक्ष देऊन आहे. भूगर्भशास्त्र विभागाने याची पाहणी केल्यानंतर हा भाग धोकादायक असल्याचे सांगितले. 

रायगड परिसरातील अनधिकृत बांधकामांना नोटिसा आणि  उत्खननांवर कारवाई करण्यात येईल. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी, महाड 

किल्ले रायगड परिसरातील १००, २०० आणि ५०० मीटरपर्यंतचा भाग संरक्षित भाग आहे. किल्ला, परिसराला हानिकारक असे उत्खनन होत असेल ते थांबविणे हे काम पुरातत्त्व संशोधन विभागाचे आहे. वरुण भामरे, वास्तुसंवर्धक, रायगड प्राधिकरण

रायगड किल्ला आणि परिसराचा विकास होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र निसर्गसौंदर्याला बाधा होऊ न देता विकास झाला तर उत्तम. मात्र उत्खनन, टोलेजंग इमारती होत असतील तर ऐतिहासिक महत्त्व कसे राहील? असा प्रश्न आहे.अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक

टॅग्स :Raigadरायगड