शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगड परिसरातील उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने? जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 07:03 IST

सिकंदर अनवारे  लोकमत न्यूज नेटवर्क  महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरामध्ये काही विकासकांकडून जमीन सपाटीकरण, उत्खननाची कामे मोठ्या प्रमाणात ...

सिकंदर अनवारे लोकमत न्यूज नेटवर्क महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरामध्ये काही विकासकांकडून जमीन सपाटीकरण, उत्खननाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे या परिसरातील जैवविविधता, ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळे कामे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

  मध्यंतरीच्या रायगड प्राधिकरण या स्वतंत्र विभागाची स्थापना होऊन येथे सरकारने कोट्यवधी खर्च केले आहेत. याद्वारे शिवकाळात ज्या पद्धतीने वास्तू उभ्या होत्या तशा ऐतिहासिक वास्तू उभ्या करण्याचा प्रयत्न होता.  परंतु आता येथे पर्यटक, शिवभक्तांसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा तयार करणे, पाणी योजना राबविणे आदी कामांवर भर देण्यात आला आहे.  मात्र स्थानिकांसह अन्य काही व्यावसायिकांनी येथे टोलेजंग इमारती बांधण्यासाठी, हॉटेल व्यवसाय उभे करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण सुरू केले आहे. यामुळे हिरकणी वाडीसह अन्य गावांना भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रायगड परिसरातील नेवाली, हिरकणी वाडी परिसरात तडे जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार भूगर्भशास्त्र विभागाने काही उपाय सुचवले होते, अशी माहिती पाचाडचे माजी सरपंच रघुवीर देशमुख यांनी दिली. 

...तरीही उत्खनन का? किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडीमध्ये काही वर्षांपूर्वी जमिनीला भेगा गेल्या होत्या. रस्ता खचला होता. सातत्याने या ठिकाणी महसूल प्रशासन लक्ष देऊन आहे. भूगर्भशास्त्र विभागाने याची पाहणी केल्यानंतर हा भाग धोकादायक असल्याचे सांगितले. 

रायगड परिसरातील अनधिकृत बांधकामांना नोटिसा आणि  उत्खननांवर कारवाई करण्यात येईल. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी, महाड 

किल्ले रायगड परिसरातील १००, २०० आणि ५०० मीटरपर्यंतचा भाग संरक्षित भाग आहे. किल्ला, परिसराला हानिकारक असे उत्खनन होत असेल ते थांबविणे हे काम पुरातत्त्व संशोधन विभागाचे आहे. वरुण भामरे, वास्तुसंवर्धक, रायगड प्राधिकरण

रायगड किल्ला आणि परिसराचा विकास होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र निसर्गसौंदर्याला बाधा होऊ न देता विकास झाला तर उत्तम. मात्र उत्खनन, टोलेजंग इमारती होत असतील तर ऐतिहासिक महत्त्व कसे राहील? असा प्रश्न आहे.अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक

टॅग्स :Raigadरायगड