शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या रेलचेलीमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 00:11 IST

प्रवास सुखकर : तालुका, जिल्हे एकमेकांना जोडले गेले

संजय करडे मुरूड : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अंतर्गत दळणवळणाच्या साधनांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या जलमार्गाचे जाळे एकमेकांना जोडण्यावर शासन अधिक भर देत आहे. सध्या महागाईत प्रचंड वाढ झाल्याने सर्वच ठिकाणी पूल बांधणे शासनास अशक्य झाले आहे. एका पुलासाठी त्याच्या अंतरानुसार किमान दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा खर्च येत असतो. अशा वेळी असा खर्च करणे सर्वच ठिकाणी कठीण बाब आहे. दोन तालुके अथवा जिल्हे जोडण्यासाठी जंगल जेट्टी हा उत्तम पर्याय बनला आहे. यामधून ट्रक, एसटी, लहान चारचाकी वाहने व लोकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक अगदी सुलभपणे करता येते.

या जंगल जेट्टीमुळे मुरुड तालुक्यातील आगरदांडा तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी ही गावे जोडली गेली. तसेच श्रीवर्धन तालुक्यातील बाणकोट खाडी ते रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास ही गावे जोडली गेल्याने रायगड व रत्नागिरी जिल्हे एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे जंगल जेट्टी वरदान ठरत आहे.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथून जंगल जेट्टीमुळे नागरिकांच्या चारचाकी गाड्यांसह दुचाकी वाहनांची अगदी सहज वाहतूक होऊन प्रवास करणे सोपे जात आहे. पुणे येथून येणारे पर्यटक दिवेआगर व श्रीवर्धन येथून तो मुरुड येथे सुद्धा येऊन आता वस्ती करू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यात जंगल जेट्टीचे सुद्धा सहकार्य लाभत आहे. या जंगल जेट्टीमुळे रत्नागिरी, पुणे व कोल्हापूर येथील पर्यटकांना या भागात येणे सोपे झाले आहे. पूल झाला नसला तरी जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.वेळ आणि पैशाची होतेय बचत

सागरी किनाऱ्यावर वसलेली गावे; परंतु खाडीचा परिसर असल्याने दळणवळणाच्या साधनात येणारा व्यत्यय पार करत जंगल जेट्टीद्वारे विकास करण्यास मदत होत आहे. रस्त्याने रत्नागिरीचे अंतर अधिक आहे, परंतु तेच जंगल जेट्टीचा वापर केल्यास हे अंतर खूप कमी पडून इंधनाची व वेळेची सुद्धा बचत होत आहे.

प्रत्येक तालुक्याचे अंतर कमी होऊन तालुके एकमेकांना जोडले जाऊन वाहतूक अंतर कमी होत आहे. तालुके एकमेकांना जोडल्यामुळे जिल्हे सुद्धा जवळ आले आहेत.जंगल जेट्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या मेरीटाइम बोर्डास प्रत्येक प्रवाशामागे लेवी कराद्वारे भरघोस उत्पन्नसुद्धा मिळत आहे. पर्यटक व स्थानिक नागरिक यांना प्रवासाचे उत्तम साधन मिळून प्रवास हा जवळचा बनला असून बहुसंख्य पर्यटक आता जंगल जेट्टीद्वारे प्रवास करताना दिसत आहेत.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग