शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या रेलचेलीमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 00:11 IST

प्रवास सुखकर : तालुका, जिल्हे एकमेकांना जोडले गेले

संजय करडे मुरूड : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अंतर्गत दळणवळणाच्या साधनांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या जलमार्गाचे जाळे एकमेकांना जोडण्यावर शासन अधिक भर देत आहे. सध्या महागाईत प्रचंड वाढ झाल्याने सर्वच ठिकाणी पूल बांधणे शासनास अशक्य झाले आहे. एका पुलासाठी त्याच्या अंतरानुसार किमान दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा खर्च येत असतो. अशा वेळी असा खर्च करणे सर्वच ठिकाणी कठीण बाब आहे. दोन तालुके अथवा जिल्हे जोडण्यासाठी जंगल जेट्टी हा उत्तम पर्याय बनला आहे. यामधून ट्रक, एसटी, लहान चारचाकी वाहने व लोकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक अगदी सुलभपणे करता येते.

या जंगल जेट्टीमुळे मुरुड तालुक्यातील आगरदांडा तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी ही गावे जोडली गेली. तसेच श्रीवर्धन तालुक्यातील बाणकोट खाडी ते रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास ही गावे जोडली गेल्याने रायगड व रत्नागिरी जिल्हे एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे जंगल जेट्टी वरदान ठरत आहे.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथून जंगल जेट्टीमुळे नागरिकांच्या चारचाकी गाड्यांसह दुचाकी वाहनांची अगदी सहज वाहतूक होऊन प्रवास करणे सोपे जात आहे. पुणे येथून येणारे पर्यटक दिवेआगर व श्रीवर्धन येथून तो मुरुड येथे सुद्धा येऊन आता वस्ती करू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यात जंगल जेट्टीचे सुद्धा सहकार्य लाभत आहे. या जंगल जेट्टीमुळे रत्नागिरी, पुणे व कोल्हापूर येथील पर्यटकांना या भागात येणे सोपे झाले आहे. पूल झाला नसला तरी जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.वेळ आणि पैशाची होतेय बचत

सागरी किनाऱ्यावर वसलेली गावे; परंतु खाडीचा परिसर असल्याने दळणवळणाच्या साधनात येणारा व्यत्यय पार करत जंगल जेट्टीद्वारे विकास करण्यास मदत होत आहे. रस्त्याने रत्नागिरीचे अंतर अधिक आहे, परंतु तेच जंगल जेट्टीचा वापर केल्यास हे अंतर खूप कमी पडून इंधनाची व वेळेची सुद्धा बचत होत आहे.

प्रत्येक तालुक्याचे अंतर कमी होऊन तालुके एकमेकांना जोडले जाऊन वाहतूक अंतर कमी होत आहे. तालुके एकमेकांना जोडल्यामुळे जिल्हे सुद्धा जवळ आले आहेत.जंगल जेट्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या मेरीटाइम बोर्डास प्रत्येक प्रवाशामागे लेवी कराद्वारे भरघोस उत्पन्नसुद्धा मिळत आहे. पर्यटक व स्थानिक नागरिक यांना प्रवासाचे उत्तम साधन मिळून प्रवास हा जवळचा बनला असून बहुसंख्य पर्यटक आता जंगल जेट्टीद्वारे प्रवास करताना दिसत आहेत.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग