शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा बनल्या ‘त्यांच्या’ उदरनिर्वाहाचे साधन

By admin | Updated: February 14, 2016 02:56 IST

घरी शेती आहे, मात्र पाणी नाही, पोट कसं भरायचे हाच प्रश्न. बिगारी काम आणि सेंटरिंंगचे काम सुरू केले, मात्र मुकादम दोन-दोन महिने पैसेच देत नाही. शेवटी गाव सोडून कुटुंबासह कोकणात आलो.

-जयंत धुळप,  अलिबागघरी शेती आहे, मात्र पाणी नाही, पोट कसं भरायचे हाच प्रश्न. बिगारी काम आणि सेंटरिंंगचे काम सुरू केले, मात्र मुकादम दोन-दोन महिने पैसेच देत नाही. शेवटी गाव सोडून कुटुंबासह कोकणात आलो. पावसाळा संपल्यानंतर कोकणात देवांच्या मोठमोठ्या यात्रा भरतात. त्यात फुगे आाणि खेळण्यांचा धंदा करतो आणि कसेबसे पोट भरतो, अशी आपली जीवनकहाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त उमदी गावातून बल्लाळेश्वराच्या माघी गणेशोत्सव यात्रेत व्यवसाय करण्यासाठी आलेल्या सुनील काळेने दिली.सह वर्षांपूर्वी दुष्काळ पडल्यावर कामधंदा, मजुरीचे काम मिळेल या आशेने काळे कुटुंब मुंबईत दाखल झाले. गोवंडीमध्ये सरकारच्या योजनेतून छोटेसे घरही मिळाले; पण कामधंदा नाही, खायचे काय, असा प्रश्न पडला. अखेर गोवंडीतील घर विकले. त्यातून आलेल्या पैशातून चायनीज खेळणी आणि फुगे घेऊन व्यवसाय सुरू केला. आता कोकणातील यात्रांमध्ये पारधी समाजातील १० - १२ जण मिळून व्यवसाय करीत असल्याचे काळे यांनी सांगितले. यात्रेच्या पूर्वी मुंबईतून चार ते १२ हजारांचा माल ते खरेदी करतात. एका यात्रेत तीन ते साडेतीन हजार मिळतात. कसाबसा खर्च भागत असल्याचे लखनदादा सांगतात.शासनाच्या पारधी समाजासाठी काही योजना आहेत, पण आम्ही पोटासाठी सतत फिरत असतो; गावात राहू शकत नाही. त्यामुळे योजनांचा लाभ घेता येत नाही. व्यवसायाकरिता सरकारने भांडवल देणारी योजना सुरू केल्यास पोटासाठी गाव सोडून बाहेर पडलेल्या शेकडो कुटुंबाना फायदा होईल, असे काळे सांगतात.पारधी समाजासाठी सांगली जिल्ह्यासाठी ४०० घरकुले मंजूर होती. त्यातील काही घरांचे जत तालुक्यात बांधकाम पूर्ण आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात ४०, मिरज तालुक्यात १०८, जत तालुक्यात ३६६, तासगाव तालुक्यात १७, पलूस तालुक्यात ५, शिराळा तालुक्यात ४, आटपाडी तालुक्यात २७ अशी एकूण ५६७ पारधी कुटूंबे आहेत. परंतु दुष्काळ व अन्य कारणास्तव त्यातील अनेक कुटुंबे आपल्या गावात राहत नाहीत. या पारधी कुटुंबांची पोटासाठीची भ्रमंती थांबविणारी शासकीय योजना जोपर्यंत अमलात येत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी माहिती या विषयातील अभ्यासक श्रमिक मुक्ती दलाचे राज्य समन्वयक सतीश लोंढे यांनी दिली.भटकंतीवरील पारध्यांचे सर्वेक्षण शक्यराज्यातील पारधी समाजाच्या पुनर्वसनाचा विषय अनेक वर्षांपासून रखडला आहे. पारधी समाज राज्यात अस्तित्वाने आहे, पण सरकारी नोंदीत कोठेही नाही. त्यांच्या समस्या, मागण्या प्रशासनासमोर असल्या तरी त्या सुटण्याचे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून नाहीत. राज्यातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पारधी कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यास नेमका तपशील समोर येऊन, त्यांच्या समस्या सोडविण्याचा नवा मार्ग सापडू शकेल, असा विश्वास पाली-सुधागड येथील जे. एन. पालीवाला महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांनी व्यक्त केला आहे.आषाढ महिन्यात परतणार गावी पाली बल्लाळेश्वराची यात्रा आटोपून ही १० ते १२ पारधी कुटुंबे आता ठाणे जिल्ह्यातील बदलापूरकरिता रवाना झाली आहेत. त्यांनतर ही कुटुंबे महाड, चिपळूण आणि रत्नागिरी करत करत अखेरीस आषाढ महिन्यात आपल्या गावच्या मरूबाईच्या यात्रेस आपल्या गावी परतणार आहेत.