शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दुरुस्ती केलेल्या सबमरीन केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड; ४ दिवसांपासून बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2023 21:36 IST

ऐतिहासिक जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरच्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे  ग्रहण

-मधुकर ठाकूर

उरण : जागतिक ऐतिहासिक एलिफंटा बेटावर महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे  ग्रहण लागले आहे.समुद्रातील दुरुस्ती केलेला सबमरीन केबल्सच्या जाइंटच्या बिघाडामुळे एलिफंटा बेटवासियांवर मागील चार दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

ऐतिहासिक जगप्रसिद्ध एलिफंटा बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्या २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली होती.त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर ही तीनही गावे अंधारात बुडली होती. त्यानंतर महावितरणच्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रातील नादुरुस्त झालेल्या सबमरीन केबल्सच्या जाइंटची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर एलिफंटा बेटावरील वीजपुरवठा मोठ्या प्रयासाने सुरळीत सुरू झाला होता.

समुद्रातील दुरुस्ती झालेल्या सबमरीन केबल्सच्या एका जाइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. यामुळे मागील चार दिवसांपासून एलिफंटा बेटवासियांवर पुन्हा एकदा अंधारात चाचपडण्याची पाळी येऊन ठेपली आहे.वीजपुरवठा खंडित होत असल्याने बेटावरील पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप बंद पडले आहेत.यामुळे तीनही गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.त्याचबरोबर दररोजच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लघु उद्योजक, व्यावसायिकांनाही अनेक समस्यांना सामोरं जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

याबाबत महावितरणकडे घारापुरी ग्रामपंचायतीने महावितरणचे कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती सरपंच मीना भोईर यांनी दिली.तर नादुरुस्त केबल्सची अथवा  खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आगाऊ माहिती महावितरणचे अधिकारी ग्रामपंचायतीला कधीच  देत नाहीत.त्यांचा बेटावर कर्मचारीही राहात नसल्याने माहितीही उपलब्ध होत नाही . महावितरणच्या या गळथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळेच एलिफंटा बेटवासियांवर मागील चारपाच दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

समुद्राखालील सबमरीन केबल्सच्या जांइंटची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात आली होती.मात्र दुरुस्ती करण्यात आलेल्या केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे.यासाठी आवश्यक असलेले स्पेशल जाइंटचे मटेरियल उपलब्ध झाले आहे.जांइंट दुरुस्तीचे काम येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे.यामुळे पुढील आठवड्यात एलिफंटा बेटवासियांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.- देविदास बैकर. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग

टॅग्स :electricityवीज