शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्ती केलेल्या सबमरीन केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड; ४ दिवसांपासून बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2023 21:36 IST

ऐतिहासिक जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरच्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे  ग्रहण

-मधुकर ठाकूर

उरण : जागतिक ऐतिहासिक एलिफंटा बेटावर महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे  ग्रहण लागले आहे.समुद्रातील दुरुस्ती केलेला सबमरीन केबल्सच्या जाइंटच्या बिघाडामुळे एलिफंटा बेटवासियांवर मागील चार दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

ऐतिहासिक जगप्रसिद्ध एलिफंटा बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्या २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली होती.त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर ही तीनही गावे अंधारात बुडली होती. त्यानंतर महावितरणच्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रातील नादुरुस्त झालेल्या सबमरीन केबल्सच्या जाइंटची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर एलिफंटा बेटावरील वीजपुरवठा मोठ्या प्रयासाने सुरळीत सुरू झाला होता.

समुद्रातील दुरुस्ती झालेल्या सबमरीन केबल्सच्या एका जाइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. यामुळे मागील चार दिवसांपासून एलिफंटा बेटवासियांवर पुन्हा एकदा अंधारात चाचपडण्याची पाळी येऊन ठेपली आहे.वीजपुरवठा खंडित होत असल्याने बेटावरील पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप बंद पडले आहेत.यामुळे तीनही गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.त्याचबरोबर दररोजच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लघु उद्योजक, व्यावसायिकांनाही अनेक समस्यांना सामोरं जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

याबाबत महावितरणकडे घारापुरी ग्रामपंचायतीने महावितरणचे कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती सरपंच मीना भोईर यांनी दिली.तर नादुरुस्त केबल्सची अथवा  खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आगाऊ माहिती महावितरणचे अधिकारी ग्रामपंचायतीला कधीच  देत नाहीत.त्यांचा बेटावर कर्मचारीही राहात नसल्याने माहितीही उपलब्ध होत नाही . महावितरणच्या या गळथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळेच एलिफंटा बेटवासियांवर मागील चारपाच दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

समुद्राखालील सबमरीन केबल्सच्या जांइंटची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात आली होती.मात्र दुरुस्ती करण्यात आलेल्या केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे.यासाठी आवश्यक असलेले स्पेशल जाइंटचे मटेरियल उपलब्ध झाले आहे.जांइंट दुरुस्तीचे काम येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे.यामुळे पुढील आठवड्यात एलिफंटा बेटवासियांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.- देविदास बैकर. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग

टॅग्स :electricityवीज