शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

दुरुस्ती केलेल्या सबमरीन केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड; ४ दिवसांपासून बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2023 21:36 IST

ऐतिहासिक जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरच्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे  ग्रहण

-मधुकर ठाकूर

उरण : जागतिक ऐतिहासिक एलिफंटा बेटावर महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे  ग्रहण लागले आहे.समुद्रातील दुरुस्ती केलेला सबमरीन केबल्सच्या जाइंटच्या बिघाडामुळे एलिफंटा बेटवासियांवर मागील चार दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

ऐतिहासिक जगप्रसिद्ध एलिफंटा बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्या २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली होती.त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर ही तीनही गावे अंधारात बुडली होती. त्यानंतर महावितरणच्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रातील नादुरुस्त झालेल्या सबमरीन केबल्सच्या जाइंटची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर एलिफंटा बेटावरील वीजपुरवठा मोठ्या प्रयासाने सुरळीत सुरू झाला होता.

समुद्रातील दुरुस्ती झालेल्या सबमरीन केबल्सच्या एका जाइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. यामुळे मागील चार दिवसांपासून एलिफंटा बेटवासियांवर पुन्हा एकदा अंधारात चाचपडण्याची पाळी येऊन ठेपली आहे.वीजपुरवठा खंडित होत असल्याने बेटावरील पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप बंद पडले आहेत.यामुळे तीनही गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.त्याचबरोबर दररोजच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लघु उद्योजक, व्यावसायिकांनाही अनेक समस्यांना सामोरं जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

याबाबत महावितरणकडे घारापुरी ग्रामपंचायतीने महावितरणचे कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती सरपंच मीना भोईर यांनी दिली.तर नादुरुस्त केबल्सची अथवा  खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आगाऊ माहिती महावितरणचे अधिकारी ग्रामपंचायतीला कधीच  देत नाहीत.त्यांचा बेटावर कर्मचारीही राहात नसल्याने माहितीही उपलब्ध होत नाही . महावितरणच्या या गळथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळेच एलिफंटा बेटवासियांवर मागील चारपाच दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

समुद्राखालील सबमरीन केबल्सच्या जांइंटची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात आली होती.मात्र दुरुस्ती करण्यात आलेल्या केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे.यासाठी आवश्यक असलेले स्पेशल जाइंटचे मटेरियल उपलब्ध झाले आहे.जांइंट दुरुस्तीचे काम येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे.यामुळे पुढील आठवड्यात एलिफंटा बेटवासियांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.- देविदास बैकर. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग

टॅग्स :electricityवीज