शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जेएनपीटीतील रासायनिक जेट्टीच्या जनसुनावणीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:15 IST

अधिकाऱ्यांचे आश्वासन : आमदार, सरपंच, ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका

उरण : जेएनपीटीच्या रासायनिक जेट्टीची लांबी वाढविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी बोलाविलेल्या जनसुनावणीत आमदार, सरपंच, ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली. विविध ग्रामपंचायतींचे संतप्त सरपंच, ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी जेएनपीटी आणि राज्य, केंद्र सरकारवरचा निषेध करीत अधिकाºयांना धारेवर धरले. या वेळी वरिष्ठांमार्फत सरकारला अहवाल सादर करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी देत जनसुनावणीचे काम संपवले.

जेएनपीटीची रासायनिक द्रव पदार्थ वाहतूक करण्यासाठी जेट्टी सध्या अपुरी पडत आहे, त्यामुळे ४.५ दशलक्ष क्षमतेची आणि ३०९ कोटी खर्चाची, नव्याने जेट्टीची लांबी वाढविण्याचा जेएनपीटीचा प्रस्ताव आहे. वाढीव जेट्टीमुळे पर्यावरणाची होणारी हानी आणि इतर अत्यावश्यक दुष्परिणामांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी जनसुनावणी ठेवली होती. उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी विभागाचे सदस्य अनंत हर्षवर्धन, एमपीसीबीचे संयोजक राहुल मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.

जेएनपीटी बंदराची उभारणी १९८९ करण्यात आली. तेव्हापासून बंदराच्या विकासाच्या नावाखाली आणखी दोन बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरातील सर्वाधिक लांबीचे तसेच क्षमतेचे चौथे बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड मातीचे भराव केले आहेत. भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच जेएनपीटीने २०२९ कोटी खर्चाच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्याच्या कामालाही सुरुवात केली आहे. १५ मीटरपर्यंत समुद्र चॅनेलची खोली वाढविण्याच्या दुसºया टप्प्यातील कामामुळे आणि भरावाच्या कामामुळे समुद्राचे पाणी घारापुरी बेटांवरील गावांत शिरत आहे. जेएनपीटीच्या या कामांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे.

  • च्प्रकल्पग्रस्तांना नोकºयांमध्ये प्राधान्य मिळत नाही. साडेबारा टक्के भूखंडाचा अद्यापही पत्ता नाही. नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
  • च्जसखार, पाणजे, फुंडे, सोनारी, डोंगरी, सावरखार, क रळ आदी ग्रामपंचायतीचीं कोट्यवधींची मालमत्ता कराची रक्कम देण्यास जेएनपीटी त्या विरोधात न्यायालयात दाद मागून वेळ मारून नेत आहे. स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना नोकºया दिल्या जात आहेत.
  • च्प्रकल्पग्रस्त शेतकरी, भूमिपुत्रांना दिलेली आश्वासने ३२ वर्षांनंतरही अद्याप प्रलंबित आहेत. ग्रामस्थांचे प्रश्न निकाली निघाल्याशिवाय जेएनपीटीचा प्रकल्पच होऊ देणार नसल्याचा कडक इशाराही संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या वेळी दिला. यामध्ये महिला रणरागिणीही सहभागी झाल्या होत्या.

शासकीय अधिकाºयांनी जेएनपीटी अधिकाºयांना झापलेच्जेएनपीटीचा कोट्यवधीचा सीएसआर फंड उरणकरांना डावलून इतर जिल्ह्यात खर्च होत असल्याची तक्रार बैठकीत ग्रामस्थांनी केली. तक्रारीनंतर जेएनपीटी अधिकारी विश्वनाथ घरत यांनी त्यास कबुली दिली. या वेळी फंडाच्या पैशाचा वापर करून उरणकरांना, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवा. त्यानंतर सीएसआर फंड इतरत्र खर्च करा, अशी तंबीही प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी जेएनपीटी अधिकाºयांना दिली.

टॅग्स :JNPTजेएनपीटी