शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 04:54 IST

जनहित याचिका दाखल : कोकण आयुक्तांना २७ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

नामदेव मोरे ।नवी मुंबई : जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग उरणवासीयांसाठी डोकेदुखी बनला आहे. अपघात, वाहतूककोंडीसह खड्ड्यांच्या समस्यांनी प्रवासी व नागरिक त्रस्त असून, याविषयी उरण सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी समिती स्थापन करण्याचे आदेश कोकण आयुक्तांना दिले असून, २७ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.देशातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून पळस्पे ते जेएनपीटीचा समावेश आहे. लांबीने लहान असलेल्या महामार्गावरील समस्या मात्र गंभीर झाल्या आहेत. वर्षानुवर्ष पाठपुरावा करूनही समस्या सुटत नसल्याने उरण सामाजिक संस्थेच्या सुधाकर पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रियंका ठाकूर बाजू मांडत आहेत. उच्च न्यायालयात पोलिसांनी त्यांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये २०१७मध्ये उरण, न्हावा शेवा व गव्हाण फाटा या तीन पोलीस स्टेशनअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ५४ हजार ५५८ केसेस दाखल केल्या आहेत. एक वर्षामध्ये अवैध पार्किंगसाठी ४८४८ वाहनांवर कारवाई केली आहे. या कालावधीमध्ये ३३ अपघातांमध्ये प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ३९ गंभीर अपघात झाले आहेत. किरकोळ अपघात रोज होत आहेत. अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी एकही सरकारी रुग्णालय जवळ नाही. जेएनपीटीचे स्वत:चे रुग्णालय असून, त्याचा उपयोग जखमींवरील उपचारासाठी केला जात नाही. अपघात झाल्यानंतर जखमींना नवी मुंबई महापालिका किंवा मुंबईमध्ये उपचारासाठी न्यावे लागत असून, उपचारादरम्यानच अनेकांचा मृत्यू होत आहे. जखमींना उपचार मिळवून देण्यासाठी महामार्ग प्राधिकरण, जेएनपीटी व राज्य शासनानेही काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत.जेएनपीटी महामार्गावरून रोज किमान ३० हजार वाहनांचा राबता असतो. यामध्ये २० हजार अवजड वाहनांचा समावेश आहे. रोडवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी वाढत आहे. पळस्पे व सीबीडीवरून २० किलोमीटर अंतर पूर्ण करायला अनेक वेळा एक ते दोन तासांचा अवधी लागत आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सकाळी व सायंकाळी या मार्गावरून प्रवास करताना वाहतूककोंडीमध्ये अडकून राहावे लागत आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंना अवजड वाहने उभी केली जात आहेत. महामार्गाला सर्विस रोड बनविण्यात आलेला नाही.देशातील प्रमुख बंदर असलेल्या जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, ती सुधारण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. उच्च न्यायालयाने २३ मार्चला कोकण आयुक्तांना वाहतूक विभाग, पोलीस, जेएनपीटी, सिडको, महामार्ग प्राधिकरण, जेएनपीटी व संबंधित आस्थापनांची समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. या समितीने जेएनपीटी रोडच्या समस्येवर कायमस्वरूपी व तत्काळ काय उपाययोजना करता येतील, याविषयी अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने कोकण आयुक्तांना दिले आहेत.जेएनपीटी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक छोटी-मोठी गावे आहेत. उरण शहराचाही समावेश आहे. या परिसरातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. महामार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असून, पर्यायी सर्विस रोड नसल्याने छोटी वाहनेही महामार्गावर अडकून पडत असून, लवकरात लवकर सर्विस रोड बनविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.धुळीचे साम्राज्यजेएनपीटी रोडची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डेमय रोडमुळे पूर्ण रोडवर धुळीचे साम्राज्य पसरले. धुळीमुळे मोटारसायकलस्वार व पादचाºयांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. परिसरातील रहिवाशांनाही याचा त्रास होत असून धुळीच्या त्रासातूनही सुटका व्हावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.तत्काळ उपचार हवेतमहामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. २०१७मध्ये ३३ अपघातांमध्ये प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ३९ गंभीर अपघात झाले होते. अपघात झाल्यानंतर जखमींना उपचार मिळत नाहीत. जवळ एकही शासकीय दवाखाना नसून रुग्णांना वाशी किंवा मुंबईला घेऊन जावे लागते. यामुळे जेएनपीटीने रुग्णवाहिका सुरू करून त्यांच्या रुग्णालयात उपचाराची सुविधा देण्याची मागणी केली आहे.अवैध पार्किंगमहामार्गावर रोडच्या दोन्ही बाजूला ट्रेलर व ट्रक उभे केले जात आहेत. अवैध वाहतुकीमुळे वाहतूककोंडीच्या समस्येमध्ये भर पडत आहे. पोलिसांनी गतवर्षी ४८४८ वाहनांवर कारवाई केली होती. जनहित याचिका दाखल केल्यानंतर अवैध पार्किंग कमी झाली असली, तरी ती पूर्णपणे बंद व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा