शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ उपक्रमाअंतर्गत जेएनपीएचे पीरवाडी बीच स्वच्छता अभियान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 21:51 IST

प्लॅस्टिकच्या वापरामुळे आपले सागरी जीवन कसे नष्ट होत आहे याविषयीही जनजागृती केली

मधुकर ठाकूर

उरण  : जेएनपीए बंदराने बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या "स्वच्छ सागर, सुरक्षित सागर, स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र" उपक्रमांतर्गत उरण येथील पीरवाड बीचवर स्वच्छता मोहीम राबवली होती.या मोहिमेत जेएनपीएचे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह ७५ कामगार सहभागी झाले होते. त्यांनी पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आदी सुमारे दोन टेम्पो कचरा जमा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली.

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.जेएनपीए बंदराने बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत  सागरी किनारपट्टीच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाअंतर्गत किनारपट्टीच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ७५ स्वयंसेवकांसह देशभरातील ७५ समुद्रकिनाऱ्यांवर किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.याच उपक्रमाअंतर्गत गुरुवारी (२५) उरण येथील पीरवाडी  समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.या मोहिमेत पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आदी सुमारे दोन टेम्पो कचरा जमा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी समुद्र किनारा वाचविणे, संरक्षित करणे आणि स्वच्छ ठेवण्यासाठी समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या स्थानिक समुदायाशी या अधिकाऱ्यांनी संवाद साधला.त्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणासाठी स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण केली.

प्लॅस्टिकच्या वापरामुळे आपले सागरी जीवन कसे नष्ट होत आहे याविषयीही जनजागृती केली.प्लॅस्टिक कचरा आणि इतर कचऱ्याचा सागरी जीवनावर होणारा नकारात्मक परिणाम याविषयी सामाजिक संदेशासह स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पथनाट्याचेही सादरीकरण केले.