शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पुनर्वसनासाठी JNPA समुद्र चॅनल बंद; आंदोलनावर वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 19:08 IST

आंदोलन रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाची बळाचा वापराची तयारी : पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता

मधुकर ठाकूर

उरण : हनुमान कोळीवाडा फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर मंगळवारी (११) बोलाविण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए प्रशासनाने ग्रामस्थांच्या सर्वच अटी-शर्थी  मान्य करून याप्रकरणातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रलंबित प्रश्न दोन महिन्यांच्या कालावधीत सोडविण्याचे ठोस आश्वासनही दिले आहे. पोलिस, जेएनपीए प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही मात्र  हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा हेका कायम ठेवल्याने पोलिसांनीही आंदोलन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

वेळप्रसंगी बळाचा वापर करून आंदोलनापुर्वीच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.यामुळे पुनर्वसनाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे. जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन मिळावी या मागणीसाठी मागील ३५ संघर्ष सुरू आहे.या ३५ वर्षांच्या संघर्षानंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील २५६ कुटुंबीयांचे जुन्या फुंडे- जसखार गाव दरम्यान जेएनपीटीच्या मालकीच्या १०.०६ हेक्टर भुखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या विकसित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ६,९,१२ मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यालाही जेएनपीएने मान्यता दिली आहे.भुखंड विकसित करण्याच्या कामासाठी आवश्यक खर्चाची ५ कोटी ५९ लाखांची रक्कमही जेएनपीए प्रशासनाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहे.मात्र जेएनपीए, जिल्हाधिकारी, सिडको यांच्यातच सुरू असलेल्या अंतर्गत घोळामुळे वारंवार दिलेल्या आश्वासनानंतरही  हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना अद्यापही विकसित भुखंडाचा ताबा मिळालेला नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी जेएनपीए समुद्र चॅनल बंद करून मालवाहू जहाजे भर समुद्रात रोखून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशाऱ्यानंतर मंगळवारी (११) रोजी जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांची बैठक झाली.प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक झालेल्या बैठकीतुन ग्रामस्थांच्या सर्वच अटी-शर्थी मान्य केल्या आहेत. तसेच या प्रकरणातील काही बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आहेत.केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रलंबित प्रश्न दोन महिन्यांच्या कालावधीत सोडविण्याचे ठोस आश्वासनही दिले आहे.मात्र ग्रामस्थांचे समाधान झाले नसल्याने गावकऱ्यांशी चर्चा करूनच आंदोलनाबाबत निर्णय घेण्याचा निर्णय हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी बैठकीत जाहीर केला होता.त्यानुसार मंगळवारी (११) संध्याकाळी हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी घेतलेल्या समुद्र चॅनल बंद आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला असल्याची माहिती हनुमान कोळीवाडा सरपंच परमानंद कोळी व ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे मात्र जेएनपीए, पोलिस, जिल्हा प्रशासना विरोधात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र पोलिस, जेएनपीए प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद” आंदोलनाचा   हेका कायम ठेवला आहे.यामुळे पोलिसांनीही नाईलाजाने आंदोलन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.वेळप्रसंगी बळाचा वापर करून आंदोलनापुर्वीच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. याआधीही पोलिसांनी  आंदोलनं रोखण्यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तसेच  धरपकडीची कारवाई केली होती.मात्र त्यानंतरही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत गनिमीकाव्याने आंदोलन करुन मालवाहू जहाजे रोखून धरली होती.