शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पुनर्वसनासाठी JNPA समुद्र चॅनल बंद; आंदोलनावर वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 19:08 IST

आंदोलन रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाची बळाचा वापराची तयारी : पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता

मधुकर ठाकूर

उरण : हनुमान कोळीवाडा फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर मंगळवारी (११) बोलाविण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए प्रशासनाने ग्रामस्थांच्या सर्वच अटी-शर्थी  मान्य करून याप्रकरणातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रलंबित प्रश्न दोन महिन्यांच्या कालावधीत सोडविण्याचे ठोस आश्वासनही दिले आहे. पोलिस, जेएनपीए प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही मात्र  हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा हेका कायम ठेवल्याने पोलिसांनीही आंदोलन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

वेळप्रसंगी बळाचा वापर करून आंदोलनापुर्वीच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.यामुळे पुनर्वसनाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे. जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन मिळावी या मागणीसाठी मागील ३५ संघर्ष सुरू आहे.या ३५ वर्षांच्या संघर्षानंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील २५६ कुटुंबीयांचे जुन्या फुंडे- जसखार गाव दरम्यान जेएनपीटीच्या मालकीच्या १०.०६ हेक्टर भुखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या विकसित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ६,९,१२ मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यालाही जेएनपीएने मान्यता दिली आहे.भुखंड विकसित करण्याच्या कामासाठी आवश्यक खर्चाची ५ कोटी ५९ लाखांची रक्कमही जेएनपीए प्रशासनाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहे.मात्र जेएनपीए, जिल्हाधिकारी, सिडको यांच्यातच सुरू असलेल्या अंतर्गत घोळामुळे वारंवार दिलेल्या आश्वासनानंतरही  हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना अद्यापही विकसित भुखंडाचा ताबा मिळालेला नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी जेएनपीए समुद्र चॅनल बंद करून मालवाहू जहाजे भर समुद्रात रोखून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशाऱ्यानंतर मंगळवारी (११) रोजी जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांची बैठक झाली.प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक झालेल्या बैठकीतुन ग्रामस्थांच्या सर्वच अटी-शर्थी मान्य केल्या आहेत. तसेच या प्रकरणातील काही बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आहेत.केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रलंबित प्रश्न दोन महिन्यांच्या कालावधीत सोडविण्याचे ठोस आश्वासनही दिले आहे.मात्र ग्रामस्थांचे समाधान झाले नसल्याने गावकऱ्यांशी चर्चा करूनच आंदोलनाबाबत निर्णय घेण्याचा निर्णय हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी बैठकीत जाहीर केला होता.त्यानुसार मंगळवारी (११) संध्याकाळी हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी घेतलेल्या समुद्र चॅनल बंद आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला असल्याची माहिती हनुमान कोळीवाडा सरपंच परमानंद कोळी व ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे मात्र जेएनपीए, पोलिस, जिल्हा प्रशासना विरोधात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र पोलिस, जेएनपीए प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद” आंदोलनाचा   हेका कायम ठेवला आहे.यामुळे पोलिसांनीही नाईलाजाने आंदोलन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.वेळप्रसंगी बळाचा वापर करून आंदोलनापुर्वीच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. याआधीही पोलिसांनी  आंदोलनं रोखण्यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तसेच  धरपकडीची कारवाई केली होती.मात्र त्यानंतरही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत गनिमीकाव्याने आंदोलन करुन मालवाहू जहाजे रोखून धरली होती.