शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पुनर्वसनासाठी JNPA समुद्र चॅनल बंद; आंदोलनावर वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 19:08 IST

आंदोलन रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाची बळाचा वापराची तयारी : पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता

मधुकर ठाकूर

उरण : हनुमान कोळीवाडा फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर मंगळवारी (११) बोलाविण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए प्रशासनाने ग्रामस्थांच्या सर्वच अटी-शर्थी  मान्य करून याप्रकरणातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रलंबित प्रश्न दोन महिन्यांच्या कालावधीत सोडविण्याचे ठोस आश्वासनही दिले आहे. पोलिस, जेएनपीए प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही मात्र  हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा हेका कायम ठेवल्याने पोलिसांनीही आंदोलन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

वेळप्रसंगी बळाचा वापर करून आंदोलनापुर्वीच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.यामुळे पुनर्वसनाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे. जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन मिळावी या मागणीसाठी मागील ३५ संघर्ष सुरू आहे.या ३५ वर्षांच्या संघर्षानंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील २५६ कुटुंबीयांचे जुन्या फुंडे- जसखार गाव दरम्यान जेएनपीटीच्या मालकीच्या १०.०६ हेक्टर भुखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या विकसित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ६,९,१२ मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यालाही जेएनपीएने मान्यता दिली आहे.भुखंड विकसित करण्याच्या कामासाठी आवश्यक खर्चाची ५ कोटी ५९ लाखांची रक्कमही जेएनपीए प्रशासनाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहे.मात्र जेएनपीए, जिल्हाधिकारी, सिडको यांच्यातच सुरू असलेल्या अंतर्गत घोळामुळे वारंवार दिलेल्या आश्वासनानंतरही  हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना अद्यापही विकसित भुखंडाचा ताबा मिळालेला नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी जेएनपीए समुद्र चॅनल बंद करून मालवाहू जहाजे भर समुद्रात रोखून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशाऱ्यानंतर मंगळवारी (११) रोजी जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांची बैठक झाली.प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक झालेल्या बैठकीतुन ग्रामस्थांच्या सर्वच अटी-शर्थी मान्य केल्या आहेत. तसेच या प्रकरणातील काही बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आहेत.केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रलंबित प्रश्न दोन महिन्यांच्या कालावधीत सोडविण्याचे ठोस आश्वासनही दिले आहे.मात्र ग्रामस्थांचे समाधान झाले नसल्याने गावकऱ्यांशी चर्चा करूनच आंदोलनाबाबत निर्णय घेण्याचा निर्णय हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी बैठकीत जाहीर केला होता.त्यानुसार मंगळवारी (११) संध्याकाळी हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी घेतलेल्या समुद्र चॅनल बंद आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला असल्याची माहिती हनुमान कोळीवाडा सरपंच परमानंद कोळी व ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे मात्र जेएनपीए, पोलिस, जिल्हा प्रशासना विरोधात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र पोलिस, जेएनपीए प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद” आंदोलनाचा   हेका कायम ठेवला आहे.यामुळे पोलिसांनीही नाईलाजाने आंदोलन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.वेळप्रसंगी बळाचा वापर करून आंदोलनापुर्वीच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. याआधीही पोलिसांनी  आंदोलनं रोखण्यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची तसेच  धरपकडीची कारवाई केली होती.मात्र त्यानंतरही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत गनिमीकाव्याने आंदोलन करुन मालवाहू जहाजे रोखून धरली होती.