शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये पाच पर्यटकांवर जेली फिशचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 05:17 IST

आलिबागजवळ समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच पर्यटकांवर शनिवारी जेली फिशने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : आलिबागजवळ समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच पर्यटकांवर शनिवारी जेली फिशने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पर्यटकांवर उपचार करून त्यांना रविवारी सोडण्यात आले.जेली फिशने हल्ला केलेले पर्यटक हे नवी मुंबई आणि कुर्ला परिसरातील आहेत. समीर विजय पवार (१३, नवी मुंबई), रोशन रमेश सुर्वे (१३, नवी मुंबई), साहिल अजय वावरे (१५, कुर्ला), अभिनय अनुराग गुप्ता (४, घणसोली), नारायण पाटील (३९) अशी पर्यटकांची नावे आहेत.शनिवारी समीर, रोशन, साहिल, अभिनय आणि नारायण पाटील हे अलिबागच्या समुद्रकिनारी गेले होते. त्या वेळी त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये जेलीसारखा पदार्थ तरंगताना दिसला. त्यांनी जेली फिशबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी त्याला आपल्या हातामध्ये घेतले. त्यामुळे जेली फिशने त्यांच्यावर हल्ला करीत, हाता-पायांचा चावा घेतला. त्यामुळे घाबरलेले पर्यटक पाण्याबाहेर आले. त्यांच्या अंगाला खाज सुटल्याने त्यांना तातडीने अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. समीर पवार याला अधिकच त्रास होत असल्याने, त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले.

टॅग्स :Raigadरायगड