शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जयंत पाटील हाजिर हो!

By admin | Updated: June 16, 2017 01:40 IST

सरकारी परवानगीच्या बनावट कागदपत्र प्रकरणी शेकाप नेते आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल पाटील आणि तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज

- लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : सरकारी परवानगीच्या बनावट कागदपत्र प्रकरणी शेकाप नेते आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल पाटील आणि तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांना १० जुलै रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. गुरु वारी या प्रकरणात प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली.आ. जयंत पाटील, नृपाल पाटील व बंदर विभागाचे अधिकारी कॅ. भटनागर यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात दिले होते. न्यायालयाने फौजदारी प्रक्रि या संहितेनुसार फिर्यादीने दिलेल्या तक्र ारीची तपासणी करून शेकाप आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल जयंत पाटील, तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्याविरुद्ध आदेश पारित करून न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स काढले होते. या आदेशास आ. जयंत पाटील यांच्यातर्फे बुधवारी (१४ जून) रायगड सेशन कोर्टात रिव्हिजन अपील दाखल करून आरोपींनी स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु सेशन कोर्टाने आरोपींना कोणत्याही प्रकारे दिलासा दिला नाही. गुरु वारी या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात सुरू झाली. त्या वेळी फिर्यादी द्वारकानाथ नामदेव पाटील आणि दर्शन आत्माराम जुईकर हे न्यायालयात उपस्थित होते.आरोपी हे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे ते बाहेर आहेत, असे आरोपींचे वकील अ‍ॅड. सचिन जोशी यांनी न्यायालयाला सांगितले. प्रतयक्षात आरोपींच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्यातर्फेजामीन अर्ज दाखल करण्याचा प्रयत्नही आरोपींच्या वकिलांनी केला, परंतु न्यायालयाने कायद्यातील तरतुदींनुसार व न्यायालयाच्या समन्सनुसार आरोपींनी न्यायालयात हजर राहणे गरजेचे आहे असे नमूद केले आहे. न्यायालयाने आता ही सुनावणी १० जुलै रोजी निश्चित केली आहे. या तारखेस आरोपी न्यायालयात हजर राहतील असे म्हणणे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडले असल्याची माहिती फिर्यादी द्वारकानाथ पाटील यांचे वकील अ‍ॅड. महेश ठाकूर आणि अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांनी दिली. प्रकरणाची पार्श्वभूमीशहाबाज धरमतर येथील बंदर विभागाच्या अखत्यारीतील जागेमध्ये महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मोरा बंदर समूहाचे तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्या सहीची बनावट कागदपत्रे बनवून बंदर उद्योगासाठी अनधिकृत जेट्ट्या व त्याच बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून सुमारे ५६ कोटींचे कर्ज मिळविल्याप्रकरणी रायगड जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली. दाखल फिर्यादीत खोटे सरकारी दस्तऐवज तयार करून ते खरे आहेत असे भासवून अनधिकृत बांधकाम अधिकृत केल्याचा व राष्ट्रीयीकृत बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतल्याचा आरोप तक्र ारदारांनी फिर्यादीत केला होता.त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आ. जयंत पाटील, नृपाल जयंत पाटील, तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्याविरु द्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या फिर्यादीचे फौजदारी खटल्यामध्ये रूपांतर करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.