शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

जयंत पाटील हाजिर हो!

By admin | Updated: June 16, 2017 01:40 IST

सरकारी परवानगीच्या बनावट कागदपत्र प्रकरणी शेकाप नेते आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल पाटील आणि तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज

- लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : सरकारी परवानगीच्या बनावट कागदपत्र प्रकरणी शेकाप नेते आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल पाटील आणि तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांना १० जुलै रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. गुरु वारी या प्रकरणात प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली.आ. जयंत पाटील, नृपाल पाटील व बंदर विभागाचे अधिकारी कॅ. भटनागर यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात दिले होते. न्यायालयाने फौजदारी प्रक्रि या संहितेनुसार फिर्यादीने दिलेल्या तक्र ारीची तपासणी करून शेकाप आमदार जयंत पाटील, त्यांचे पुत्र नृपाल जयंत पाटील, तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्याविरुद्ध आदेश पारित करून न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स काढले होते. या आदेशास आ. जयंत पाटील यांच्यातर्फे बुधवारी (१४ जून) रायगड सेशन कोर्टात रिव्हिजन अपील दाखल करून आरोपींनी स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु सेशन कोर्टाने आरोपींना कोणत्याही प्रकारे दिलासा दिला नाही. गुरु वारी या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात सुरू झाली. त्या वेळी फिर्यादी द्वारकानाथ नामदेव पाटील आणि दर्शन आत्माराम जुईकर हे न्यायालयात उपस्थित होते.आरोपी हे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे ते बाहेर आहेत, असे आरोपींचे वकील अ‍ॅड. सचिन जोशी यांनी न्यायालयाला सांगितले. प्रतयक्षात आरोपींच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्यातर्फेजामीन अर्ज दाखल करण्याचा प्रयत्नही आरोपींच्या वकिलांनी केला, परंतु न्यायालयाने कायद्यातील तरतुदींनुसार व न्यायालयाच्या समन्सनुसार आरोपींनी न्यायालयात हजर राहणे गरजेचे आहे असे नमूद केले आहे. न्यायालयाने आता ही सुनावणी १० जुलै रोजी निश्चित केली आहे. या तारखेस आरोपी न्यायालयात हजर राहतील असे म्हणणे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडले असल्याची माहिती फिर्यादी द्वारकानाथ पाटील यांचे वकील अ‍ॅड. महेश ठाकूर आणि अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांनी दिली. प्रकरणाची पार्श्वभूमीशहाबाज धरमतर येथील बंदर विभागाच्या अखत्यारीतील जागेमध्ये महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मोरा बंदर समूहाचे तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्या सहीची बनावट कागदपत्रे बनवून बंदर उद्योगासाठी अनधिकृत जेट्ट्या व त्याच बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून सुमारे ५६ कोटींचे कर्ज मिळविल्याप्रकरणी रायगड जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली. दाखल फिर्यादीत खोटे सरकारी दस्तऐवज तयार करून ते खरे आहेत असे भासवून अनधिकृत बांधकाम अधिकृत केल्याचा व राष्ट्रीयीकृत बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतल्याचा आरोप तक्र ारदारांनी फिर्यादीत केला होता.त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आ. जयंत पाटील, नृपाल जयंत पाटील, तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्याविरु द्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या फिर्यादीचे फौजदारी खटल्यामध्ये रूपांतर करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.