शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्यार्थ्यांनीच रचला होता मुरूडमधील अपहरणाचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:12 IST

पोलीस तपासात निष्पन्न; शाळेला उशीर झाल्याने दिली खोटी माहिती

आगरदांडा : मुरूड तालुक्यातील एकदरा गावातील दोन शाळकरी मुलांना काही तृतीयपंथी लोकांनी तोंडावर हात ठेवून जबरदस्तीने व्हॅनमध्ये कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा बनाव रचण्यात आला होता. परंतु मुरूड पोलीस ठाण्याचे साहाय्य्क पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी व शोध घेतल्यावर हे प्रकरण बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती साहाय्य्क पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या वेळी त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ उपस्थित होते.‘शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण’ ही बातमी विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात या प्रकारामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. जो तो पालक आपल्या मुलाची काळजी घेताना दिसत होता. या प्रकरणाची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी स्वत: घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन जाधव व गुन्हे अन्वेषण खात्याच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची उकल करण्यासाठी पाठविण्यात आले होते.या प्रकरणाचा तपास करताना प्रथम आम्ही तृतीय पंथी लोकांचा कसून तपास केला, त्या वेळी आमच्या लक्षात आले की, मुरूड शहर व काही ग्रामीण भागात तृतीय पंथी लोक हे आठवड्यातून ठरावीक वाराला येत असतात. ते ज्या वाराला येतात त्या वाराला ही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. मग पथकाने व्हॅनचा शोध घेण्याचे ठरविले, ही घटना सकाळी सातची असल्याने आम्ही मुरूड - अलिबाग या मुख्य रस्त्यावर असणाºया विविध शाळा अथवा ग्रामपंचायत शाळा यांचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची मोहीम हाती घेतली; परंतु या वेळेत कोणतीही व्हॅन गेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा तपास शालेय विद्यार्थी यांच्याकडे वळविण्यात आल्याची माहिती तांबोळी यांनी दिली.या लहान मुलांना व त्यांच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन सिव्हिल ड्रेसमध्ये प्रेमाने व आपुलकीने चौकशी करण्यात आली. त्या वेळी या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिसांना शाळेत जाण्यास उशीर झाला होता व शाळेचा कंटाळा आला असल्याने आम्ही आमच्या आई-वडिलांना सर्व खोटे सांगितल्याचे कबूल के ले. त्यामुळे हे अपहरण बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.अपहरणाचे प्रकरण बोगस असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आता कोणीही या प्रकरणाची अफवा पसरवू नये; अन्यथा आम्हाला त्या व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी लागेल. या प्रकरणामुळे मुरूड पोलीस सतर्क झाले असून तृतीयपंथी लोकांवर कडक नजर ठेवणे, त्याचप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर अधिक लक्ष केंद्रित करून जो कोणी संशयित आढळेल त्याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. अफवा पसरवू नये, असे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक तांबोळी यांनी के ले आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण