शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सामाजिक सलोखा राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:41 IST

प्रमोद बाबर : श्रीवर्धन पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा

श्रीवर्धन : आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक सुखाने व आनंदाने सलोख्याचे जीवन जगत आहेत. समाजातील सलोखा अबाधित ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आह,े असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी केले. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बाबर यांनी श्रीवर्धनमधील विविध प्रश्नांवर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.

समाजातील प्रत्येक घटकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आपण वर्षभर अनेक सण, उत्सव व कार्यक्रम आयोजित करत असतो. प्रत्येकाचा हेतू व उद्देश चांगला असतो, त्यामुळे आपण सर्व एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतो, तेव्हा प्रत्येक कार्यक्रम शांततेने पार पडावा, असे बाबर यांनी सांगितले. श्रीवर्धनमधील वाहतूककोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, त्यानुसार पोलीस प्रशासन कार्यवाही करत आहे. जनतेने सहकार्य करावे, जेणेकरून वाहतूककोंडीची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल. रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शहर परिसरात उपद्रवी मोकाट जनावरांच्या मालकांना योग्य समज देऊन शहर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे बाबर यांनी सांगितले. या शांतता समितीच्या बैठकीसाठी श्रीवर्धन तालुक्यातील विविध समाज समितीचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, पत्रकार व पोलीस प्रशासनातील सहायक पोलीस निरीक्षक जे. जे. पाटील, जे. जी. पेडवी व डी. एल. पाटील आदी उपस्थित होते.शांतता अबाधित राहण्यासाठी सहकार्य करावे- बापूराव पवारम्हसळा : मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण १० नोव्हेंबर रोजी, तर १२ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती हा सण येत असल्याने म्हसळा तालुक्यात सर्वधर्मीय शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार यांनी केले.श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बैठकीला म्हसळा पोलीस निरीक्षक ए. बी. खेडकर, नायब तहसीलदार के. टी. भिंगारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड