शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गोवा महामार्गावरील दुभाजक बंद करण्याचा वाद चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:11 IST

गेली आठ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे.

पाली : गेली आठ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे. मात्र याचवेळी महामार्गावरील अनेक गावांसाठी उपयुक्त असे यूटर्न बंद करण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांना साकडे घातले असून न्याय मिळवून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोंडगावसह पायरवाडी, कातळावाडी, भपकेवाडी, एकलघर या आदिवासी वाड्यांसह नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी ही सर्व गावे व आदिवासी वाड्यांमधील लोकसंख्या सुमारे ३ हजार ५०० आहे. या सर्वांना बाजारपेठचे जवळचे मुख्य ठिकाण असलेल्या नागोठण्यात महामार्गावरूनच यावे लागते. त्यामुळे या गावांतून महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक व यूटर्न बंद झाल्यास या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आदींना नागोठण्यात येण्या- जाण्यासाठी दूरवर ठेवण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा एकमेव पर्याय आहे. गावांकडे जाणाºया महामार्गालगतच्या जोड रस्त्याजवळ यूटर्न ठेवण्याची मागणी कोंडगावचे तत्कालीन सरपंच कृष्णा धामणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे एका निवेदनाद्वारे डिसेंबर २०१२ केली होती. कोंडगावमधील शेकापचे युवा कार्यकर्ते नितीन राजीवले यांनी या विषयाचा पाठपुरावाही केला होता. मात्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखलही घेतली नाही.सद्यस्थितीत महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने महामार्ग एकेरी झाल्यास ग्रामस्थांना नागोठण्यात जाण्या-येण्यासाठी दूर अंतरावरून वळसा घालून जावे लागणार आहे. तसेच शेतीचे व इतर कामासाठी साहित्य ने-आण करताना बैलगाडीचा वापर करणेही शक्य होणार नाही. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे व त्याचा अधिक त्रास लहान बालकांसह वयोवृद्ध नागरिकांना होणार आहे. पनवेल येथील महामार्गाच्या कार्यालयात तीन ते चार वेळा जाऊन पाठपुरावा देखील केला आहे, परंतु यावेळी आम्हाला संबंधितांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप सरपंच अनंत वाघ यांनी केला आहे. दरम्यान, या ग्रामस्थांना नागोठण्यात येण्या-जाण्यासाठी रेल्वे प्रशासनानेही पूल टाकून खालून रस्ता ठेवलेला आहे. त्यामुळे भविष्यातील त्रास टाळण्याकरिता आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खा. तटकरेंकडे ग्रामस्थांनी केली आहे.