शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

गोवा महामार्गावरील दुभाजक बंद करण्याचा वाद चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:11 IST

गेली आठ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे.

पाली : गेली आठ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे. मात्र याचवेळी महामार्गावरील अनेक गावांसाठी उपयुक्त असे यूटर्न बंद करण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांना साकडे घातले असून न्याय मिळवून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोंडगावसह पायरवाडी, कातळावाडी, भपकेवाडी, एकलघर या आदिवासी वाड्यांसह नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी ही सर्व गावे व आदिवासी वाड्यांमधील लोकसंख्या सुमारे ३ हजार ५०० आहे. या सर्वांना बाजारपेठचे जवळचे मुख्य ठिकाण असलेल्या नागोठण्यात महामार्गावरूनच यावे लागते. त्यामुळे या गावांतून महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक व यूटर्न बंद झाल्यास या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आदींना नागोठण्यात येण्या- जाण्यासाठी दूरवर ठेवण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा एकमेव पर्याय आहे. गावांकडे जाणाºया महामार्गालगतच्या जोड रस्त्याजवळ यूटर्न ठेवण्याची मागणी कोंडगावचे तत्कालीन सरपंच कृष्णा धामणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे एका निवेदनाद्वारे डिसेंबर २०१२ केली होती. कोंडगावमधील शेकापचे युवा कार्यकर्ते नितीन राजीवले यांनी या विषयाचा पाठपुरावाही केला होता. मात्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखलही घेतली नाही.सद्यस्थितीत महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने महामार्ग एकेरी झाल्यास ग्रामस्थांना नागोठण्यात जाण्या-येण्यासाठी दूर अंतरावरून वळसा घालून जावे लागणार आहे. तसेच शेतीचे व इतर कामासाठी साहित्य ने-आण करताना बैलगाडीचा वापर करणेही शक्य होणार नाही. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे व त्याचा अधिक त्रास लहान बालकांसह वयोवृद्ध नागरिकांना होणार आहे. पनवेल येथील महामार्गाच्या कार्यालयात तीन ते चार वेळा जाऊन पाठपुरावा देखील केला आहे, परंतु यावेळी आम्हाला संबंधितांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप सरपंच अनंत वाघ यांनी केला आहे. दरम्यान, या ग्रामस्थांना नागोठण्यात येण्या-जाण्यासाठी रेल्वे प्रशासनानेही पूल टाकून खालून रस्ता ठेवलेला आहे. त्यामुळे भविष्यातील त्रास टाळण्याकरिता आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खा. तटकरेंकडे ग्रामस्थांनी केली आहे.