शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार कायद्यांविरोधात तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 01:01 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखला : रस्त्यावर ठिय्या देत अन्यायकारक कायदे रद्द करण्याची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककासा : केंद्र सरकारच्या शेतकरी तसेच कामगार कायद्यांविरोधात मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक्यावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील शेतकरी, कामगारांनी आंदोलन केले. या वेळी अर्धा तास महामार्ग रोखला होता. यात तलासरी व डहाणू तालुक्यातील तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले होते.

अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी, कामगारांनी देशव्यापी आंदोलन पुकारले होते. त्याचा एक भाग म्हणून चारोटी येथे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी सकाळी ११ वाजल्यापासून शेतकरी, कामगार हातात लालबावटे घेऊन मोठ्या संख्येने डहाणू, तलासरी भागातून जमा झाले होते. या आंदोलनामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.केंद्र सरकारने पास केलेले तीन शेतकरी कायदे रद्द करा, कामगार विधेयक रद्द करा, या प्रमुख मागण्यांबरोबरच विजबिल कायद्यातील बदल, वनाधिकारी कायद्याची अंमलबजावणी करा, खावटी कर्जासाठी मंजूर केलेली रक्कम महिलांच्या खात्यात जमा करा, रोजगार हमी योजना अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगारविरोधी धोरणाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी महामार्ग अर्धा तास रोखून धरला होता. या वेळी आंदोलनकर्त्यांकडून हे कायदे मोठ्या भांडलवलदारासाठी फायद्याचे असल्याचे आरोपही करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, डहाणूचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष बारक्या मांगात, सचिव रडका कलगडा व अनेक कार्यकर्ते हजर होते.मनोर : शेतकरीविरोधी विधेयके आणि वीजबिल कायद्यातील बदलांविरुद्ध शुक्रवारी मुंबई-अहमदाबाद महामार्ग चिल्हारफाटा येथे अखिल भारतीय किसान सभेतर्फे देशव्यापी प्रतिकार आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.जनता दल (से) उपोषण : विरार : केंद्र सरकारने कृषी विधेयकाचे रूपांतर कायद्यांत करून भारतातील सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांना गुलामीत ढकलले आहे. कोरोनाकाळात घाईगडबडीत दोन्ही सभागृहांत हा कायदा संमत करून घेऊन संपूर्ण शेती क्षेत्र मूठभर भांडवलदार व्यापाऱ्यांना खुले केले आहे. याविरोधात जनता दल सेक्युलरच्या पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाश लवेकर, प्रदेश सरचिटणीस मानवेल तुस्कानो, अरविंद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते.केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांसाठी लागू केलेले कायदे रद्द करावेत. तसेच स्थानिक वन, रोजगाराबाबतच्या समस्या तत्काळ सोडविल्या पाहिजे. अन्यथा, पुन्हा आंदोलन केले जाईल.- अशोक ढवळे, राष्ट्रीय अध्यक्ष, किसान सभातलासरीत बंदला१०० टक्के प्रतिसादतलासरी : केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकºयांना हमीभाव नाकारणारे, बाजार समित्यांचे अस्तित्व पुसणारे आणि शेतकºयांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारे विधेयक पारित केले आहे. केंद्राची ही भूमिका शेतकºयांच्या विरोधात आहे. त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला तलासरीत १०० टक्के प्रतिसाद लाभला. शेतकरीविरोधी विधेयके आणि वीजबिल कायद्यातील बदलांविरुद्ध अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी आणि कामगारांनी पुकारलेल्या देशव्यापी प्रतिकार आंदोलनाला तलासरीत १०० टक्के प्रतिसात मिळाला. तलासरी उधवा येथील बाजारपेठा पूर्ण बंद होत्या. बंददरम्यान तलासरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला.