शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

भरपाई टाळणाऱ्या विमा कंपनीला वठणीवर आणणार- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:57 IST

आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे, तसेच विमाधारक शेतकºयांकडून पैशाची मागणीही करत असल्याने संबंधित अधिकाºयांना वठणीवर आणण्यात येईल, असा इशारा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला.अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता ४०० कोटींची मदत दिली आहे. नारळ, सुपारी आणि कोकम या पिकांना नुकसानीच्या व्याख्येते आधी घेतले नव्हते. मात्र, त्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यानंतर, त्याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय काढला. त्यामुळे आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.मासेमारी व्यावसायिकांना नोव्हेंबर, २०१९ पासून विविध आपत्तीला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांच्यासाठी लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोल्ट्री व्यावसायिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या मदतीसाठीही सरकार मदतीचा हात पुढे करणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.>बैठकीत जाब विचारणाररायगड जिल्ह्यातील बागायतदारांनी आपल्या फळ झाडांचा विमा काढला होता. ओरिएंटल विमा कंपनी आता बागायतदारांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.काही ठिकाणी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाºयांकडून परताव्याची रक्कम देण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. शेतकºयांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका घेणाºया ओरिएंटल विमा कंपनीस वठणीवर आणण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय योजना करण्यासाठी विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत ओरिएंटल विमा कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.>वन संपदेचे पंचनामे करणारनिसर्ग चक्रीवादळामुळे वन्य संपदेचेही आतोनात नुकसान झाले आहे. त्याबाबत वन विभागाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत. त्यांनीही तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निसर्ग वादळामध्ये सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. त्या नुकसान भरपाईसाठी सरकारमार्फत पुढील आठ दिवसांमध्ये मदत येणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ