शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

भरपाई टाळणाऱ्या विमा कंपनीला वठणीवर आणणार- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:57 IST

आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे, तसेच विमाधारक शेतकºयांकडून पैशाची मागणीही करत असल्याने संबंधित अधिकाºयांना वठणीवर आणण्यात येईल, असा इशारा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला.अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता ४०० कोटींची मदत दिली आहे. नारळ, सुपारी आणि कोकम या पिकांना नुकसानीच्या व्याख्येते आधी घेतले नव्हते. मात्र, त्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यानंतर, त्याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय काढला. त्यामुळे आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.मासेमारी व्यावसायिकांना नोव्हेंबर, २०१९ पासून विविध आपत्तीला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांच्यासाठी लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोल्ट्री व्यावसायिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या मदतीसाठीही सरकार मदतीचा हात पुढे करणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.>बैठकीत जाब विचारणाररायगड जिल्ह्यातील बागायतदारांनी आपल्या फळ झाडांचा विमा काढला होता. ओरिएंटल विमा कंपनी आता बागायतदारांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.काही ठिकाणी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाºयांकडून परताव्याची रक्कम देण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. शेतकºयांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका घेणाºया ओरिएंटल विमा कंपनीस वठणीवर आणण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय योजना करण्यासाठी विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत ओरिएंटल विमा कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.>वन संपदेचे पंचनामे करणारनिसर्ग चक्रीवादळामुळे वन्य संपदेचेही आतोनात नुकसान झाले आहे. त्याबाबत वन विभागाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत. त्यांनीही तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निसर्ग वादळामध्ये सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. त्या नुकसान भरपाईसाठी सरकारमार्फत पुढील आठ दिवसांमध्ये मदत येणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ