शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भरपाई टाळणाऱ्या विमा कंपनीला वठणीवर आणणार- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:57 IST

आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे, तसेच विमाधारक शेतकºयांकडून पैशाची मागणीही करत असल्याने संबंधित अधिकाºयांना वठणीवर आणण्यात येईल, असा इशारा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला.अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता ४०० कोटींची मदत दिली आहे. नारळ, सुपारी आणि कोकम या पिकांना नुकसानीच्या व्याख्येते आधी घेतले नव्हते. मात्र, त्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यानंतर, त्याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय काढला. त्यामुळे आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.मासेमारी व्यावसायिकांना नोव्हेंबर, २०१९ पासून विविध आपत्तीला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांच्यासाठी लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोल्ट्री व्यावसायिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या मदतीसाठीही सरकार मदतीचा हात पुढे करणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.>बैठकीत जाब विचारणाररायगड जिल्ह्यातील बागायतदारांनी आपल्या फळ झाडांचा विमा काढला होता. ओरिएंटल विमा कंपनी आता बागायतदारांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.काही ठिकाणी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाºयांकडून परताव्याची रक्कम देण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. शेतकºयांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका घेणाºया ओरिएंटल विमा कंपनीस वठणीवर आणण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय योजना करण्यासाठी विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत ओरिएंटल विमा कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.>वन संपदेचे पंचनामे करणारनिसर्ग चक्रीवादळामुळे वन्य संपदेचेही आतोनात नुकसान झाले आहे. त्याबाबत वन विभागाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत. त्यांनीही तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निसर्ग वादळामध्ये सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. त्या नुकसान भरपाईसाठी सरकारमार्फत पुढील आठ दिवसांमध्ये मदत येणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ