शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बड्या नेत्यांच्या सभांऐवजी संवादावर उमेदवारांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:02 IST

मावळ लोकसभा : झोपडपट्टीबहुल असलेला संमिश्र मतदारसंघ

नारायण बडगुजर 

पिंपरी : मावळ लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. पिंपरी विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे. कोणतीही मोठी सभा येथे घेण्याऐवजी उमेदवारांनी थेट संवादावर भर दिला आहे. महायुती, महाआघाडीसह वंचित बहुजन आघाडीकडेही येथील मतदारांचे लक्ष आहे. झोपडपट्टीबहुल असला, तरी प्राधिकरणासह काही भाग नव्याने विकसित झाला असल्याने हा मतदारसंघ संमिश्र आहे. त्यामुळे २००९ मध्ये राष्ट्रवादी, तर २०१४ मध्ये शिवसेनेचा विजय झाला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. महायुतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाईसाठी बराच कालावधी गेला. मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी या काळात राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर बारणे यांनीही वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. वंचित बहुजन आघाडीबाबतही येथील मतदारांत उत्सुकता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सुमारे सहा लाख दलित व मुस्लिम मते आहेत. त्यातील सुमारे दीड लाख मते पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहेत.युती । प्लस पॉइंट काय आहेत?मतदारसंघात शिवसेनेसह भाजपा आणि आरपीआयनेही (आठवले गट) प्रचारासाठी यंत्रणा कामाला लावली आहे़ मतदारसंघात आमदार शिवसेनेचा आहे. त्यांच्याकडून आणि भाजपा नगरसेवकांकडून कोपरा सभांवर भर देण्यात येत आहे.युती । वीक पॉइंट काय आहेत?मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. त्यातच शिवसेनेचे केवळ चारच नगरसेवक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. त्यासाठी त्यांची भाजपावर मदार आहे.आघाडी । प्लस पॉइंट काय आहेत?पिंपरी विधासभेतून पहिला आमदार राष्ट्रवादीचा झाला होता. तसेच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले बडे पदाधिकारी या मतदारसंघात आहेत. त्यांना महाआघाडीने गळ घातली आहे. महाआघाडीचे एकदिलाने काम सुरू आहे.आघाडी । वीक पॉइंट काय आहेत?विधानसभेचा हा मतदारसंघ आरक्षित असल्याने येथे मागासवर्गीय मतदारांची संख्या जास्त आहे. या मतदारांचे वंचित बहुजन आघाडी आणि महाआघाडीमध्ये मोठे विभाजन होऊ शकते. त्याचा फटका महाआघाडीला बसू शकतो.मागच्या दोन लोकसभांमध्ये काय होता निकाल?2009च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ५७,२८९, राष्ट्रवादीला ५२,५०१ तर बसपाला ५०३३ मते मिळाली होती. अपक्ष मारुती भापकर यांना ३९५० मते मिळाली होती. ४७८८ मताधिक्य शिवसेनेला होते.2014च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभेतून शिवसेनेला ९५,८८९ मते मिळाली होती, तर शेकापला ३८,३५९ मते होती. तिसºया क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीला २१,०७१ मते मिळाली होती.मागच्या निवडणुकीत २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी ५१,०९६ मते मिळवीत राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे (४८,७६१ मते) यांचा पराभव केला होता़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019