शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

नापीकऐवजी ‘ओसाड’चे शिक्के, शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 03:10 IST

तालुक्यातील खारेपाटात उधाणामुळे संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून ती नापीक झाली आहे. मात्र, नुकसान झालेल्या शेतकºयांच्या सात-बारा उताºयांवर महसूल विभागाने ‘नापीक’ऐवजी ‘ओसाड’शेती असे शिक्के मारले आहेत.

- जयंत धुळपअलिबाग : तालुक्यातील खारेपाटात उधाणामुळे संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून ती नापीक झाली आहे. मात्र, नुकसान झालेल्या शेतकºयांच्या सात-बारा उताºयांवर महसूल विभागाने ‘नापीक’ऐवजी ‘ओसाड’शेती असे शिक्के मारले आहेत. परिणामी, शेतकºयांना शासनाने नुकसानभरपाई मंजूर केली तरी ती मिळू शकत नसल्याचे समोर येत आहे. महसूल विभागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी संगनमताने ‘ओसाड’ शिक्के मारण्याचे कारस्थान करीत असल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी केला आहे.शासनाच्या नव्या औद्योगिक धोरणानुसार, औद्योगिक कारखाने वा अन्य प्रकल्पाकरिता शेतकºयांच्या ‘ओसाड’ शेतजमिनी संपादित करता येतात. मात्र, ‘नापीक’ शेतजमिनी संपादित करता येत नाहीत. खारेपाटातील जमिनींवर ‘ओसाड’ शिक्के मारल्यावर, त्यातील पिकाची वा जमिनीची नुकसानी कोणत्याही कारणास्तव झाल्यास शेतकºयाला शासकीय नुकसानभरपाई मिळू शकत नाही, अशी कायदेशीर तरतूद आहे. परिणामी, शेतकरी कंटाळून कवडीमोल किमतीला जमीन विकण्याच्या मानसिकतेला येतो. अशा प्रकारे जमिनी विकून भूमिहीन झालेले अनेक शेतकरी परिसरात आहेत. वरिष्ठ पातळीवर चाललेले हे मोठे कारस्थान असल्याचे भगत यांनी सांगितले.मे २०१६ मध्ये उधाणाच्या भरतीने बंधारे फुटून खारे पाणी भातशेतीमध्ये घुसल्याने अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील ५४० शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून नुकसानीची भरपाई मिळावी, याकरिता नुकसानग्रस्त शेतकºयांनी १६ मे २०१६ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते.नुकसानग्रस्त शेतकºयांची मागणी मान्य करून, २६ मे २०१६ रोजी संयुक्त बैठक खारभूमी विभागाच्या अलिबाग कार्यालयात झाली. बैठकीस श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक भगत व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार लता गुरव व सुविधा पाटील, कृषी खात्याच्या कृषी पर्यवेक्षक नीलिमा वसावे, खारभूमी विभागाचे सहा. कार्यकारी अभियंता एस. पी. पवार, शाखा अभियंता सु. ज. शिरसाठ व एन. जी. पाटील हे उपस्थित होते.‘ओसाड’ जमिनीला नुकसानभरपाई नाहीखारेपाटातील शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर ‘ओसाड’ शिक्का मारल्याबाबत शेतकºयांनी विचारणा केली असता, ‘ओसाड’ आणि ‘नापीक’ यातील फरक स्पष्ट करण्यात आला. ज्या जमिनीत कधीही पीक घेतले नाही ती जमीन ‘ओसाड’ तर पूर्वी सुपीक होती, त्यात पीक घेतले जात असे; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे आता पीक घेता येत नाही, अशी जमीन म्हणजे ‘नापीक’अशी व्याख्या नायब तहसीलदार लता गुरव यांनी स्पष्ट केली.खारेपाटातील मेढेखार, काचळी, पिटकरी, कातळपाडा या गावांतील या ५४० शेतकºयांनी नुकसानभरपाईकरिता अर्ज दाखल केले आहेत. मात्र, या शेतकºयांच्या सात-बारा उताºयांवर ‘ओसाड’ शिक्के असल्याने नुकसानभरपाई मिळू शकणार नसल्याचे नायब तहसीलदार गुरव यांनी स्पष्ट केले.शिक्का बदलण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्तांना५४० शेतकºयांच्या पिकत्या शेतजमिनी समुद्र संरक्षक बंधारे फुटण्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे ‘नापीक’ झाल्या आहेत. परिणामी, सात-बारावरील ‘ओसाड’चे शिक्के बदलून ‘नापीक’चे मारून मिळावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली.शासनाच्या सात-बारा उतारा नोंदीच्या आॅनलाइन सॉफ्टवेअरमध्ये ‘एडिट’मोड (बदल करण्याची सुविधा) नसल्याने ‘ओसाड’ शिक्क्याचा ‘नापीक’ असा बदल करता येऊ शकत नसल्याचे नायब तहसीलदार गुरव यांनी सांगितले.सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे अधिकार राज्याच्या जमाबंदी आयुक्तांना असल्याने, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भारत शितोळे यांनी जमाबंदी आयुक्तांना या बदलाबाबतचे पत्र २५ मार्च २०१८ रोजी पाठविले आहे.‘विशेष बाब’ म्हणून आर्थिक मदतमंजूर करण्याचा अहवालगेल्या २१ फेब्रवारी २०१८ रोजी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे अवर सचिव यांना खारेपाटातील शेतकºयांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर करण्यास कोणतीही अडचण नाही, असे सकारात्मक पत्र पाठवून कळविले आहे.केंद्र शासनाच्या निकषामध्ये ‘समुद्राचे उधाण’याचा नैसर्गिक आपत्तीत समावेश केला आहे. खारभूमी विभागाने संरक्षक बंधारे न बांधणे, त्यांची देखभाल न करणे, यामुळे शेतीत खारे पाणी जाऊन नुकसान झाल्याने व नुकसानग्रस्त बाधित व्यक्तींना नुकसानभरपाईची रक्कम देय होत नसल्याने या प्रकरणी ‘विशेष बाब’म्हणून आर्थिक मदत मंजूर होण्यासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या अहवालात नमूद केले.

टॅग्स :Raigadरायगड