शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

महाराजांच्या मराठीवर केंद्र शासनाचा अन्याय; प्रा.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली नाराजी

By वैभव गायकर | Updated: December 28, 2023 17:09 IST

पनवेल मधील के गो लिमये वाचनालयाचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात.  

वैभव गायकर,पनवेल: शिवाजी महाराजांच्या मराठीवर केंद्र सरकार अन्याय करीत आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्याची गरज आहे.याबाबत केंद्रांची मंजुरी आवश्यक आहे.मात्र ती मिळत नसल्याने जेष्ठ साहित्यिक प्रा.श्रीपाल सबनीस यांनी नाराजी व्यक्त केली.दि.28 रोजी पनवेल मधील के गो लिमये वाचनालय व ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.      

 पनवेल मधील जेष्ठ नागरिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.यावेळी बोलताना सबनीस यांनी के गो लिमये वाचनालयाचे कौतुक केले.ग द मांडगुळकर यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले होते.आज या वाचनालयाचे 1800 सदस्य आहेत.याबाबत देखील सबनीस यांनी वाचनालयातील पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.पुढे त्यांनी वाचनालयाचे अनुदान बंद केलेल्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अशी विचारण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.मराठी हि भाकरीची भाषा व्हावी तरच मराठी टिकून राहील.देवाची ,धर्माची निष्ठा सोडत नाही तशीच सत्याची निष्ठा जोपासली पाहिजे. राजकीय व्यवस्थेचे दिवाळे निघाले आहेत. ग्रंथालय जिवंत करा तरच आम्ही मतदान करू अशी अट घालण्याची गरज  असल्याचे सबनीस म्हणाले.

कार्यक्रमाचे उदघाटक रामशेठ ठाकुर यांनी देखील वाचाल तर वाचाल असा संदेश देत.के गो लिमये वाचनालय पनवेलचे वैभव असल्याचे सांगितले.वाचनालयाच्या नव्या ईमारतीच्या उभारणीला त्यांनी दहा लाखांची मदत जाहीर केली.सकाळी के गो लिमये वाचनालय ते जेष्ठ नागरिक सभागृहा पर्यंत ग्रंथदिंडी काढुन या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अमर वार्डे यांनी देखील वाचन संस्कृती अधिक रूढ होण्याची गरज व्यक्त केली.

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड