शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

भारत, बेल्जियमचा प्रकल्प आचारसंहितेच्या कचाट्यात

By admin | Updated: February 1, 2017 00:40 IST

उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरामध्ये नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पोर्ट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आचारसंहितेत अडकले आहे.

- आविष्कार देसाई, अलिबाग

उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरामध्ये नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पोर्ट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आचारसंहितेत अडकले आहे. बेल्जियमचे उपपंतप्रधान अ‍ॅलेक्झांडर डिक्रो यांच्यासह अन्य मान्यवर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असल्याने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला तातडीने परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र जेएनपीटीच्या पोर्ट प्लॅनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या मुख्य व्यवस्थापकांनी दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीबाबत राज्य निवडणूक आयोग आणि मुख्यकार्यकारी अधिकारी कार्यालयाला संदर्भित केल्याने कार्यक्रम आचारसंहितेत अडकला आहे. त्यामुळे भाजपाला याचे श्रेय घेण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बोलले जाते.राज्यामध्ये महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. निवडणूक काळात कोणतेही विकासकाम अथवा त्याचे उद्घाटन करण्यावर निर्बंध आहेत. पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प सादर करुन भाजपा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याने विरोधकांचा त्याला विरोध होता. मात्र विरोधकांनी मांडलेल्या भूमिकेला फाटा देत अर्थसंकल्प १ फेब्रुवारीपासून सादर केला जाणार आहे.जेएनपीटी बंदरामध्ये नव्याने एपीईसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि गेस्ट हाऊसची उभारणी केली आहे. भारत सरकार आणि बेल्जियम या दोन देशाने मिळून हा संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. दोन्ही देशातील ट्रेड आणि शिपिंग उद्योगासाठी हे महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. ट्रेनिंग सेंटर आणि गेस्ट हाऊसचे काम पूर्ण झाले आहे. राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारला माहिती असताना देखील ट्रेनिंग सेंटर आणि गेस्ट हाऊसच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला बेल्जियमचे उपपंतप्रधान अ‍ॅलेक्झांडर डिक्रो, पोर्टचे अध्यक्ष मार्क व्हेन पील, यांच्यासह भारत सरकारचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे असल्याने रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाला तातडीने परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र जेएनपीटीच्या पोर्ट प्लॅनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या मुख्य व्यवस्थापकांनी ३० जानेवारी दिले होते.राज्यात तसेच रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विकासकामे, त्यांचे उद्घाटन करता येणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग आणि मुख्यकार्यकारी अधिकारी कार्यालयास संदर्भित केले असल्याचे रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे हा कार्यक्रमच रद्द करुन नंतर घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.