शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

स्वतंत्र कोकण राज्याची मागणी अयोग्य

By admin | Updated: May 2, 2017 03:04 IST

१०५ हुतात्म्यांच्या रक्तातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. अद्यापही संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झालेले नाही. अशा परिस्थितीत

महाड : १०५ हुतात्म्यांच्या रक्तातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. अद्यापही संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झालेले नाही. अशा परिस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करणे, अयोग्य असल्याचे मत महाड येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण बाळ यांनी सोमवारी लाडवली येथील नवयुग विद्यापीठ ट्रस्टमध्ये व्याख्यानादरम्यान बोलताना व्यक्त केले. स्वतंत्र कोकण राज्यापेक्षा बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होण्यावर अधिक भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.नवयुग तरुण मंडळ, लायन्स क्लब महाड आणि नवयुग विद्यापीठ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी नवयुग विद्यापीठ ट्रस्टमध्ये रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे महाड नगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि पत्रकार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने, ‘संयुक्त महाराष्ट्र एक चळवळ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बाळ व्याख्यानात म्हणाले की, ‘आज ‘कामगार दिन’ आणि ‘महाराष्ट्र दिन’ आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जे आंदोलन उभे राहिले होते, त्या आंदोलनात मुंबईतील गिरणी कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आणि म्हणूनच महाराष्ट्रात कामगार दिनाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. भाषावार प्रांत रचना करताना, तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी जी भूमिका घेतली हाती, त्यामुळेच आजही अनेक मराठी भाषक भाग हा कर्नाटकमध्ये आहे. जोपर्यंत बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत नाही, तोपर्यंत ही चळवळ संपणार नाही,’ असेही ते म्हणाले.या कार्यक्र माला नवयुग विद्यापीठ ट्रस्ट आणि नवयुग तरुण मंडळाचे संस्थापक अ‍ॅड. विजयसिंह जाधवराव, अध्यक्ष रणजितसिंह जाधवराव, माजी नगरसेवक बिपीन म्हामुणकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष कैलास जंगम, लादूलाल जैन, बाबूलाल जैन, मोहन शेठ, पत्रकार प्रवीण कुलकर्णी, मनोज खांबे, श्रीकांत सहस्रबुद्धे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकांनीही हजेरी लावली होती. (वार्ताहर)