शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

स्वतंत्र कोकण राज्याची मागणी अयोग्य

By admin | Updated: May 2, 2017 03:04 IST

१०५ हुतात्म्यांच्या रक्तातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. अद्यापही संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झालेले नाही. अशा परिस्थितीत

महाड : १०५ हुतात्म्यांच्या रक्तातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. अद्यापही संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झालेले नाही. अशा परिस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करणे, अयोग्य असल्याचे मत महाड येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण बाळ यांनी सोमवारी लाडवली येथील नवयुग विद्यापीठ ट्रस्टमध्ये व्याख्यानादरम्यान बोलताना व्यक्त केले. स्वतंत्र कोकण राज्यापेक्षा बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होण्यावर अधिक भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.नवयुग तरुण मंडळ, लायन्स क्लब महाड आणि नवयुग विद्यापीठ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी नवयुग विद्यापीठ ट्रस्टमध्ये रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे महाड नगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि पत्रकार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने, ‘संयुक्त महाराष्ट्र एक चळवळ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बाळ व्याख्यानात म्हणाले की, ‘आज ‘कामगार दिन’ आणि ‘महाराष्ट्र दिन’ आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जे आंदोलन उभे राहिले होते, त्या आंदोलनात मुंबईतील गिरणी कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आणि म्हणूनच महाराष्ट्रात कामगार दिनाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. भाषावार प्रांत रचना करताना, तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी जी भूमिका घेतली हाती, त्यामुळेच आजही अनेक मराठी भाषक भाग हा कर्नाटकमध्ये आहे. जोपर्यंत बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत नाही, तोपर्यंत ही चळवळ संपणार नाही,’ असेही ते म्हणाले.या कार्यक्र माला नवयुग विद्यापीठ ट्रस्ट आणि नवयुग तरुण मंडळाचे संस्थापक अ‍ॅड. विजयसिंह जाधवराव, अध्यक्ष रणजितसिंह जाधवराव, माजी नगरसेवक बिपीन म्हामुणकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष कैलास जंगम, लादूलाल जैन, बाबूलाल जैन, मोहन शेठ, पत्रकार प्रवीण कुलकर्णी, मनोज खांबे, श्रीकांत सहस्रबुद्धे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकांनीही हजेरी लावली होती. (वार्ताहर)