शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मुरुड, काशीद समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या दुर्घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 05:20 IST

मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते.

- संजय करडेमुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र उत्साहाच्या भरात सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षात येथील समुद्रकिनाºयावर बुडून मृत्यू होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास पर्यटक समुद्रात उतरतात. याठिकाणी लावलेल्या सूचनांकडेही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मुरुड समुद्रकिनारी जून महिन्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील नावडे येथे राहणारे अभिषेक म्हात्रे (३२) व त्यांच्या समवेत आलेली पूजा अशोक शेट्टी (२८) हे काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी उरण तालुक्यातील उलवे येथील महंमद गनी (२५ ) हा तरुण बुडाल्याची घटना घडली.काशीद समुद्रकिनारी पर्यटकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहे. पोलीस तसेच स्थानिकांकडूनही पर्यटकांना वारंवार सूचित केले जाते. मात्र उत्साहाच्या भरात ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. वीकेण्ड, सुटीच्या दिवशी मुंबई, ठाणे, पुणे येथून हजारो पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी येतात. मात्र उधाणामुळे प्रवाहाचा अंदाज येत नाही आणि बाहेरून येणाºया व्यक्तींना भरती-ओहोटीच्या वेळांचीही माहिती नसल्याने नाहक जीव गमवावा लागतो.मुरुड बीचवर १९९१ मध्ये महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या ७ कामगारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ६ जुलै २०१४ रोजी चेंबूर येथील ६ व्यावसायिकांना पोहताना जलसमाधी मिळाली . फेब्रुवारी २०१६ मध्ये सहलीसाठी आलेल्या पुण्यातील आबिदा इनामदार कॉलेजच्या१४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर शालेय सहलींवर एकप्रकार निर्बंध घालण्यात आले होते.काशीद ग्रामपंचायतीतर्फे बीचवर ठळकपणे खोल समुद्रात पोहणे धोकादायक असल्याचे सूचना फलक लावण्यात आले असले तरी पोलिसांना गुंगारा देऊन पर्यटक खोल समुद्रात जात असल्याने बुडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.- समुद्रकिनारी शनिवार व रविवारी पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणे मेरीटाइम बोर्डाकडून सुरक्षा कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. पावसाळ्यात जलवाहतूक बंद असते, त्याचप्रमाणे पर्यटकांना पोहण्यासही बंदी घालावी अशी मागणी होत आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्याशी संपर्क साधला असता, अनेकदा पर्यटक मद्यपान करून समुद्रात उतरतात. अनेकांना पोहताही येत नसते. उत्साहाच्या भरात ते प्रवाहाबरोबर वाहत जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड