शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

मुरुड, काशीद समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या दुर्घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 05:20 IST

मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते.

- संजय करडेमुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र उत्साहाच्या भरात सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षात येथील समुद्रकिनाºयावर बुडून मृत्यू होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास पर्यटक समुद्रात उतरतात. याठिकाणी लावलेल्या सूचनांकडेही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मुरुड समुद्रकिनारी जून महिन्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील नावडे येथे राहणारे अभिषेक म्हात्रे (३२) व त्यांच्या समवेत आलेली पूजा अशोक शेट्टी (२८) हे काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी उरण तालुक्यातील उलवे येथील महंमद गनी (२५ ) हा तरुण बुडाल्याची घटना घडली.काशीद समुद्रकिनारी पर्यटकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहे. पोलीस तसेच स्थानिकांकडूनही पर्यटकांना वारंवार सूचित केले जाते. मात्र उत्साहाच्या भरात ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. वीकेण्ड, सुटीच्या दिवशी मुंबई, ठाणे, पुणे येथून हजारो पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी येतात. मात्र उधाणामुळे प्रवाहाचा अंदाज येत नाही आणि बाहेरून येणाºया व्यक्तींना भरती-ओहोटीच्या वेळांचीही माहिती नसल्याने नाहक जीव गमवावा लागतो.मुरुड बीचवर १९९१ मध्ये महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या ७ कामगारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ६ जुलै २०१४ रोजी चेंबूर येथील ६ व्यावसायिकांना पोहताना जलसमाधी मिळाली . फेब्रुवारी २०१६ मध्ये सहलीसाठी आलेल्या पुण्यातील आबिदा इनामदार कॉलेजच्या१४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर शालेय सहलींवर एकप्रकार निर्बंध घालण्यात आले होते.काशीद ग्रामपंचायतीतर्फे बीचवर ठळकपणे खोल समुद्रात पोहणे धोकादायक असल्याचे सूचना फलक लावण्यात आले असले तरी पोलिसांना गुंगारा देऊन पर्यटक खोल समुद्रात जात असल्याने बुडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.- समुद्रकिनारी शनिवार व रविवारी पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणे मेरीटाइम बोर्डाकडून सुरक्षा कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. पावसाळ्यात जलवाहतूक बंद असते, त्याचप्रमाणे पर्यटकांना पोहण्यासही बंदी घालावी अशी मागणी होत आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्याशी संपर्क साधला असता, अनेकदा पर्यटक मद्यपान करून समुद्रात उतरतात. अनेकांना पोहताही येत नसते. उत्साहाच्या भरात ते प्रवाहाबरोबर वाहत जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड