शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत वाढ

By admin | Updated: June 26, 2017 01:39 IST

रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत एकूण ७३६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासून अंबा आणि कुंडलिका नद्यांची

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत एकूण ७३६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासून अंबा आणि कुंडलिका नद्यांची जलपातळी वाढल्याने दोन्ही नदीकिनारच्या १६ गावांतील ग्रामस्थांना सतर्कता व दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंबा नदीची जलपातळी नागोठणे केटी बंधाऱ्याजवळ ८ मीटर या पूररेषेपेक्षा वाढून ८.५० मीटर झाली आहे. तर कुंडलिका नदीची जलपातळी रोहा येथे २३.९० मीटर झाली आहे. कुंडलिका नदीची रोहा येथील पूरसीमा २३.९५ मीटर आहे. झपाट्याने वाढणाऱ्या जलपातळीच्या पार्श्वभूमीवर रोहा तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचेही पाठक यांनी सांगितले.रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून पुढील २४ तासांत संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर सोमवार, २६ जून २०१७ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पुढील १२० तासांत कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगितले.रविवारीही सकाळपासूनच पावासाने तुफान हजेरी लावल्याने काही क्षणांमध्ये अलिबाग शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. सकाळपासून पाऊस सुरू असल्याने अलिबागच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. सुट्टी असल्याने अलिबागच्या समुद्रकिनारी उंच लाटा पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी हजेरी लावली होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते.कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळ गंगा, उल्हास आणि गाढई नदीच्या क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने त्या खळाळून वाहत होत्या. भिरा धरण क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २१.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर १ जूनपासून २४ जूनपर्यंत ४७७.४० मि.मी. पाऊस पडला आहे. पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी खोळंबलेली कामे सुरू केली आहेत. जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्पातील धरणांमध्ये सरासरी २५.८० दलघमी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी आणि रविवारी बरसणाऱ्या पावसामुळे अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली होती; परंतु दुपारीच्या कालावधीत पावसाने काही काळ उघडीप दिल्याने ती काही अंशी कमी झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कर्जत तालुक्यामध्ये एक वृक्ष पडला होता. त्याला तातडीने काढण्यात आल्याचेही पाठक यांनी स्पष्ट केले. येत्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणातील जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २६ जूनच्या सकाळपासूनच धडाकेबाज पावसाला सुरुवात होणार असल्याने खबरदारीच्या उपाययोजना घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी दिल्या आहेत.