शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत वाढ

By admin | Updated: June 26, 2017 01:39 IST

रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत एकूण ७३६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासून अंबा आणि कुंडलिका नद्यांची

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत एकूण ७३६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासून अंबा आणि कुंडलिका नद्यांची जलपातळी वाढल्याने दोन्ही नदीकिनारच्या १६ गावांतील ग्रामस्थांना सतर्कता व दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंबा नदीची जलपातळी नागोठणे केटी बंधाऱ्याजवळ ८ मीटर या पूररेषेपेक्षा वाढून ८.५० मीटर झाली आहे. तर कुंडलिका नदीची जलपातळी रोहा येथे २३.९० मीटर झाली आहे. कुंडलिका नदीची रोहा येथील पूरसीमा २३.९५ मीटर आहे. झपाट्याने वाढणाऱ्या जलपातळीच्या पार्श्वभूमीवर रोहा तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचेही पाठक यांनी सांगितले.रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून पुढील २४ तासांत संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर सोमवार, २६ जून २०१७ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पुढील १२० तासांत कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगितले.रविवारीही सकाळपासूनच पावासाने तुफान हजेरी लावल्याने काही क्षणांमध्ये अलिबाग शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. सकाळपासून पाऊस सुरू असल्याने अलिबागच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. सुट्टी असल्याने अलिबागच्या समुद्रकिनारी उंच लाटा पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी हजेरी लावली होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते.कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळ गंगा, उल्हास आणि गाढई नदीच्या क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने त्या खळाळून वाहत होत्या. भिरा धरण क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २१.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर १ जूनपासून २४ जूनपर्यंत ४७७.४० मि.मी. पाऊस पडला आहे. पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी खोळंबलेली कामे सुरू केली आहेत. जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्पातील धरणांमध्ये सरासरी २५.८० दलघमी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी आणि रविवारी बरसणाऱ्या पावसामुळे अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली होती; परंतु दुपारीच्या कालावधीत पावसाने काही काळ उघडीप दिल्याने ती काही अंशी कमी झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कर्जत तालुक्यामध्ये एक वृक्ष पडला होता. त्याला तातडीने काढण्यात आल्याचेही पाठक यांनी स्पष्ट केले. येत्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणातील जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २६ जूनच्या सकाळपासूनच धडाकेबाज पावसाला सुरुवात होणार असल्याने खबरदारीच्या उपाययोजना घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी दिल्या आहेत.