शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

मुलींच्या जन्मदरात वाढ; हजार मुलांमागे 988 मुली, रायगड जिल्ह्यात नवजात बालकांचे दगावण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 01:10 IST

Raigad : मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी विविध उपाययोजना केल्यामुळे रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.

-   निखिल म्हात्रे

अलिबाग : वैद्यकीय सोयीसुविधांमुळे प्रसूतीदरम्यान नवजात बालकांचे दगावण्याचे प्रमाण घटत असले तरी रायगड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर काही प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराची आकडेवारी लक्षात घेतली तर रायगड जिल्ह्यातही कोवळ्या कळ्यांना उमलायला वाव मिळाला आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात नेहमीच लिंग गुणोत्तराचे प्रमाण चांगले राहिले आहे. मात्र, वाढत्या वैद्यकीय सोयीसुविधांपाठोपाठ आता हे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता कोकणातही गर्भलिंगनिदान करून गर्भपात केले जात नाहीत ना, असे प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत.मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी विविध उपाययोजना केल्यामुळे रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.  गरोदरपणातच गर्भाचे लिंगनिदान करून गर्भपात करण्याच्या घटना वाढल्याने सोनोग्राफी सेंटरवर निर्बंध घातले आहे.. १५ वर्षांत १५ सोनोग्राफी सेंटर्सवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी ६ प्रकरणात सोनोग्राफी सेंटर्स चालवणाऱ्या डॉक्टरांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. तर ४ डॉक्टरांचा मेडिकल कौन्सिलने दिलेला परवाना ५ वर्षांसाठी रद्द केला. उर्वरित डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आल्या. ही सर्व प्रकरणे अनियमिततेशी निगडित होती. यात प्रामुख्याने रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, परवान्यांचे नूतनीकरण न करणे अशा स्वरूपाचे होते. जननी सुरक्षा योजना १०० टक्के केंद्र सरकारद्वारा प्रायोजित करण्यात आली. या योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात कालावधीत स्वतःची काळजी घेता यावी यासाठी आर्थिक मदत दिली जाते. यामुळे त्यांना संस्थेत बाळंतपण करणे शक्य होईल.

योजनेचा मुख्य हेतूमहिलांसाठी जननी सुरक्षा योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. डॉक्टर, नर्स यांसारख्या कुशल व्यक्तींकडून आरोग्य संस्थेतच बाळंतपण करवून घेण्यास प्रोत्साहन मिळावे, ज्यामुळे माता मृत्यू व नवजात अर्भक मृत्युदर कमी करावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली.

समाज प्रबोधनाची गरजगर्भनिदान रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कायद्याच्या दहशतीबरोबरच जन्मदाती खंबीर राहिली तर स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार थांबतील, असे मत विधी समुपदेशक अ‍ॅड्. नीता कोळी यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील सुशिक्षित कुटुंब पीसीपीएनडीटीसारख्या कायद्याचे उल्लंघन करण्यास डॉक्टरांशी संगनमत करतात. अशा प्रकारे कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर किंवा अन्य कोणी कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तशी माहिती देणाऱ्या व्यक्तीला २५ हजार बक्षीस देण्यात येणार आहे.- डाॅ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Raigadरायगड