शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय, किनारे गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 01:01 IST

Janjira fort : दिघी व राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर सुट्यांच्या दिवशी शेकडो पर्यटक जात असतात. त्यात वृद्ध, महिला व बालकांचादेखील समावेश असतो.

- गणेश प्रभाळे

दिघी : नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची रेलचेल आतापासूनच सुरू झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वरसोबत पाण्यातील किल्ला जंजिरा पाहण्याचा बेत करत अनेक पर्यटकांची या आठवड्यापासूनच गर्दी दिसून आली. बऱ्याच कालावधीनंतर येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजू लागले आहेत. येथील जंजिरा किल्ल्यावरदेखील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, किल्ल्यात जाण्यासाठी शिडांच्या बोटीतून उतरताना पर्यटकांची गैरसोय होत असून जीवाशी खेळ सुरू आहे.दिघी व राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर सुट्यांच्या दिवशी शेकडो पर्यटक जात असतात. त्यात वृद्ध, महिला व बालकांचादेखील समावेश असतो. राजपुरी किंवा दिघी येथून पर्यटकांना मेकॅनिक बोटीमधून बसून किल्ल्यानजीक आणले जाते व किल्ल्यानजीक शिडांच्या वेगळ्या होडींमधून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ नेले जाते. जंजिरा किल्ल्यात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांलगतच शिडांच्या होडीतून उतरून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. मात्र, किल्ल्यालगत कोणताही धक्का नसल्याने वृद्ध, महिला व बालकांना उतरण्यास त्रास होतो. बोटींवर असलेले स्थानिक तरुण हात देऊन पर्यटकांना बोटींतून उतरण्यास व चढण्यास मदत करतात. मात्र, लाटांचा मारा असल्याने मानवी आधारदेखील कुचकामी ठरतो. बऱ्याच वेळा बोटीतून चढताना अथवा उतरताना पर्यटक पडल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या पर्यटकांना समुद्राचे मोठे अप्रूप असते. अशातच समुद्राच्या अजस्र लाटा पाहून त्यांचे मन थबकते. अचानक समुद्रात पडण्याची भीती त्यांच्या मनावर आघात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पर्यटकांना पाणी व शौचालय सुविधा हवीकिल्ला बघण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून प्रत्येकी २५ रु. आकारले जातात.  मात्र, किल्ल्यात पाणी व अद्ययावत स्वच्छतागृहाची सुविधा नाही. त्याचबरोबर पर्यटकास किल्ल्यासंबंधित हवी असलेली माहिती प्रशिक्षित गाइडकडून मिळावी, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

जंजिरा किल्ल्याच्या दरवाजापासून ५० मीटरचा जरी धक्का बांधण्यात आला तरी पर्यटकांना चढताना वा उतरताना सोयीचे असेल. यासाठी मालवण किल्ल्याच्या धर्तीवर जेट्टी तयार करण्याबाबत २०१७ साली संघटनेतर्फे पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप काम झाले नाही .         - श्रीकांत सुर्वे, अध्यक्ष, प्रवासी संघटना 

 किल्ल्याजवळ बांधण्यात येणाऱ्या जेट्टीसाठी पुरातत्त्व विभागाकडे कागदोपत्री पूर्तता करण्यात आली. मात्र, किल्ल्याजवळ जेट्टी बांधण्यास संबंधित विभागाने काही तांत्रिक कारणास्तव प्रस्ताव थांबवल्याने तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला.  - सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, मेरीटाइम बोर्ड

टॅग्स :FortगडRaigadरायगड