शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

जिल्ह्यात कोरोनाकाळात घटले डेंग्यू तापाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 02:26 IST

उपाययोजनेसाठी ग्रामपंचायतस्तरावर आरोग्यविषयक पथक तयार

- निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनाकाळात इतर आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच या कालावधीत डेंग्यूला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर आरोग्यविषय़क एक पथक तयार करून उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असला, तरी डेंग्यू तापाचे प्रमाण घटले आहे.रायगड जिल्ह्यात जून ते फेब्रुवारी या नऊ महिन्यांच्या कालावधीत फक्त १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे दोन रुग्ण उपचार घेत आहे, तर उर्वरित पाच जण डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील डेंग्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. कोरोना कालावधीत न भासलेली पाणीटंचाई आणि कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबल्यामुळे डेंग्यू आटोक्यात आल्याचीही यामागची मुख्य कारणे आहेत.पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. पण, जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे पावसाचे पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये घराघरांत साठवून ठेवले जाते. मात्र, या पाण्याची साठवण करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. मात्र, यावर्षी डेंग्यू आटोक्यात आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. ज्या ठिकाणी बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्या ठिकाणी पाण्याची साठवण केली जात असते. या पाण्यात डासांची उत्पत्ती होते.  हिवताप आणि डेंग्यूसारखे आजार बळावतात. डेंग्यूविषयी शहरभर सर्वेक्षण; नागरिकांनी या उपाययोजना कराव्यातनागरिकांनी यावर उपाययोजना म्हणून पाणी १५ मिनिटे उकळून व गाळून प्यावे. स्वतःसह परिसराची स्वच्छता राखावी. ताजे आणि गरम अन्‍नच खावे. दिवसातून किमान पाच लीटर पाणी प्यावे. सार्वजनिक ठिकाणी रूमाल, मास्क वापरावा. सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या, घरातील भांडी स्वच्छ ठेवावी. डासांपासून स्वसंरक्षण करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, अशा उपाययोजना केल्या तर साथीचे आजार दूर राहू शकतात. कामानिमित्ताने जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण मोठे आहे. कामानिमित्ताने सातत्याने स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक सकाळी वाढणारे तापमान तर काही वेळानंतर पडलेल्या थंडीमुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. सततच्या बदलणा-या वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी कावीळ, अतिसार व घशाच्या आजाराने त्रस्त असलेले २५ ते ३० रुग्ण रोज दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या डेंग्यूच्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.-डॉ. राजीव तंबाळे, वैद्यकीय अधिकारी (सामान्य रुग्णालय)डेंग्यूची लक्षणेअचानक तीव्र ताप येणेतीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखीअशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे व तोंडाला कोरड पडणेउलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी सुरू होणेअंगावर पुरळ येणे, लाल चट्टे उठू लागतात

टॅग्स :dengueडेंग्यू