शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

अवैध खोदकाम व झाडांची कत्तल, कुरुळच्या महिला आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन

By निखिल म्हात्रे | Updated: October 9, 2023 18:26 IST

काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटूंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महीलां याबाबत आवाज उठवायला सुरुत केली आहे. 

अलिबाग - कुरुळ गावातील महिला गेले अनेक वर्ष खाडीतील कालवे, शिवल्या खणून आपले चरीतार्थ चालवित. मात्र आता कोकण बार्ज या कंपनीने या खाडीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत उत्खनन करीत आहे. त्यामुळे या गावातील महीलांचा चरीतार्थावरच घाव घातला आहे. काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटुंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महिला याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 

सोमवारी कुरुळ येथील महिला एकत्र येत कोकण बार्ज कंपनी विरोधात अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन दिले. तसेच आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी कुरुळ गावच्या सरपंच अॅड. सुलभा पाटील, सदस्य भुषण बिर्जे, अवधूत पाटील, आकाश घाडगे, अॅड. योगेश घाडगे, अभिजीत घाडगे, वंदना घाडगे, रंजना पाटील, आलका म्हात्रे, सुजाता कार्लेकर, नलीनी पाटील आदी उपस्थित होते.

कुरुळ खाडीतुन मिळणा-या उत्पनावर या महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना काळात संपुर्ण व्यवहार बंद असताना खाडीतील शिवल्या व कालवे विकून उदरनिर्वाह चालविला होता. आता मागील वीस दिवसांपासून कोकण बार्ज कंपनीमध्ये मोठी जहाजे बनतात सध्या कंपनी खाडीच्या क्षमतेपेक्षा मोठी जहाजे खाडीतुन येत आहेत. 

कंपनीने ग्रामस्थांना विश्वासास न घेता अवैध रित्या खाडीमध्ये मँग्रोज ची मोठी प्रमाणात तोड करीत कुरुळ खाडीतील सुमारे १५०० ब्रास वाळू मिश्रीत रेती चे उत्खनन केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. या वाळु मिश्रित रेती मध्येच तिस-या व कालवे यांचे नैसर्गिक रित्या उत्पादन होते. जर असेच अवैध रित्या उत्खनन चालु राहिले तर कुरुळ गावातील व परिसरातील सुमारे २०० हुन अधिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.

मागील साठ वर्षांपासून आमच्या गावातील महीला खाडीतील शिवळ्या व काळवे विकून कुटूंबाचा चरीतार्थ चालवितात. मात्र हि कोकण बार्ज कंपणी आमच्या महीलांचा रोजगार हिरावून घेत आहे. सतत होणारे खाडीतील खोदकाम थांबविण्यासाठी आम्ही कंपणी प्रसासनासोबत बतचीत हि केली मात्र कंपणीच्या अधिकाऱ्यांनी थातूक-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली.- अॅड. सुलभा पाटील, सरपंच.

कोकण बार्ज कंपणी कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा समजूतीने घेऊनही या कंपणीने हम करे सो कायदा चालविला आहे. सतत असेच होत राहील्यास कोणताही अनुसुचित प्रकार घडला तर कायदा व व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी हि प्रशासनाची असेल. कंपणी प्रशासना विरोधात केलेल्या अर्जाचा आपण जाणीव पुर्वक विचार करून आम्हा गावकऱ्यांना योग्य तो न्याय दयावा.- भुषण बिर्जे, सदस्य.

आमच्यावर अन्याय करणाऱ्या कंपणीवर कायदेशिर कारवाई झाली नाही तर आम्ही महिला आपल्या कार्यालया समारे उपोषणास बसु. आमच्या न्याय व हक्कासाठी आम्ही असाच लढा देत राहू.- रेश्मा घाडगे, गावकरी महिला.

टॅग्स :alibaugअलिबाग