शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

अवैध खोदकाम व झाडांची कत्तल, कुरुळच्या महिला आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन

By निखिल म्हात्रे | Updated: October 9, 2023 18:26 IST

काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटूंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महीलां याबाबत आवाज उठवायला सुरुत केली आहे. 

अलिबाग - कुरुळ गावातील महिला गेले अनेक वर्ष खाडीतील कालवे, शिवल्या खणून आपले चरीतार्थ चालवित. मात्र आता कोकण बार्ज या कंपनीने या खाडीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत उत्खनन करीत आहे. त्यामुळे या गावातील महीलांचा चरीतार्थावरच घाव घातला आहे. काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटुंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महिला याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 

सोमवारी कुरुळ येथील महिला एकत्र येत कोकण बार्ज कंपनी विरोधात अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन दिले. तसेच आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी कुरुळ गावच्या सरपंच अॅड. सुलभा पाटील, सदस्य भुषण बिर्जे, अवधूत पाटील, आकाश घाडगे, अॅड. योगेश घाडगे, अभिजीत घाडगे, वंदना घाडगे, रंजना पाटील, आलका म्हात्रे, सुजाता कार्लेकर, नलीनी पाटील आदी उपस्थित होते.

कुरुळ खाडीतुन मिळणा-या उत्पनावर या महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना काळात संपुर्ण व्यवहार बंद असताना खाडीतील शिवल्या व कालवे विकून उदरनिर्वाह चालविला होता. आता मागील वीस दिवसांपासून कोकण बार्ज कंपनीमध्ये मोठी जहाजे बनतात सध्या कंपनी खाडीच्या क्षमतेपेक्षा मोठी जहाजे खाडीतुन येत आहेत. 

कंपनीने ग्रामस्थांना विश्वासास न घेता अवैध रित्या खाडीमध्ये मँग्रोज ची मोठी प्रमाणात तोड करीत कुरुळ खाडीतील सुमारे १५०० ब्रास वाळू मिश्रीत रेती चे उत्खनन केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. या वाळु मिश्रित रेती मध्येच तिस-या व कालवे यांचे नैसर्गिक रित्या उत्पादन होते. जर असेच अवैध रित्या उत्खनन चालु राहिले तर कुरुळ गावातील व परिसरातील सुमारे २०० हुन अधिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.

मागील साठ वर्षांपासून आमच्या गावातील महीला खाडीतील शिवळ्या व काळवे विकून कुटूंबाचा चरीतार्थ चालवितात. मात्र हि कोकण बार्ज कंपणी आमच्या महीलांचा रोजगार हिरावून घेत आहे. सतत होणारे खाडीतील खोदकाम थांबविण्यासाठी आम्ही कंपणी प्रसासनासोबत बतचीत हि केली मात्र कंपणीच्या अधिकाऱ्यांनी थातूक-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली.- अॅड. सुलभा पाटील, सरपंच.

कोकण बार्ज कंपणी कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा समजूतीने घेऊनही या कंपणीने हम करे सो कायदा चालविला आहे. सतत असेच होत राहील्यास कोणताही अनुसुचित प्रकार घडला तर कायदा व व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी हि प्रशासनाची असेल. कंपणी प्रशासना विरोधात केलेल्या अर्जाचा आपण जाणीव पुर्वक विचार करून आम्हा गावकऱ्यांना योग्य तो न्याय दयावा.- भुषण बिर्जे, सदस्य.

आमच्यावर अन्याय करणाऱ्या कंपणीवर कायदेशिर कारवाई झाली नाही तर आम्ही महिला आपल्या कार्यालया समारे उपोषणास बसु. आमच्या न्याय व हक्कासाठी आम्ही असाच लढा देत राहू.- रेश्मा घाडगे, गावकरी महिला.

टॅग्स :alibaugअलिबाग