शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

अवैध खोदकाम व झाडांची कत्तल, कुरुळच्या महिला आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन

By निखिल म्हात्रे | Updated: October 9, 2023 18:26 IST

काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटूंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महीलां याबाबत आवाज उठवायला सुरुत केली आहे. 

अलिबाग - कुरुळ गावातील महिला गेले अनेक वर्ष खाडीतील कालवे, शिवल्या खणून आपले चरीतार्थ चालवित. मात्र आता कोकण बार्ज या कंपनीने या खाडीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत उत्खनन करीत आहे. त्यामुळे या गावातील महीलांचा चरीतार्थावरच घाव घातला आहे. काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटुंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महिला याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 

सोमवारी कुरुळ येथील महिला एकत्र येत कोकण बार्ज कंपनी विरोधात अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन दिले. तसेच आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी कुरुळ गावच्या सरपंच अॅड. सुलभा पाटील, सदस्य भुषण बिर्जे, अवधूत पाटील, आकाश घाडगे, अॅड. योगेश घाडगे, अभिजीत घाडगे, वंदना घाडगे, रंजना पाटील, आलका म्हात्रे, सुजाता कार्लेकर, नलीनी पाटील आदी उपस्थित होते.

कुरुळ खाडीतुन मिळणा-या उत्पनावर या महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना काळात संपुर्ण व्यवहार बंद असताना खाडीतील शिवल्या व कालवे विकून उदरनिर्वाह चालविला होता. आता मागील वीस दिवसांपासून कोकण बार्ज कंपनीमध्ये मोठी जहाजे बनतात सध्या कंपनी खाडीच्या क्षमतेपेक्षा मोठी जहाजे खाडीतुन येत आहेत. 

कंपनीने ग्रामस्थांना विश्वासास न घेता अवैध रित्या खाडीमध्ये मँग्रोज ची मोठी प्रमाणात तोड करीत कुरुळ खाडीतील सुमारे १५०० ब्रास वाळू मिश्रीत रेती चे उत्खनन केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. या वाळु मिश्रित रेती मध्येच तिस-या व कालवे यांचे नैसर्गिक रित्या उत्पादन होते. जर असेच अवैध रित्या उत्खनन चालु राहिले तर कुरुळ गावातील व परिसरातील सुमारे २०० हुन अधिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.

मागील साठ वर्षांपासून आमच्या गावातील महीला खाडीतील शिवळ्या व काळवे विकून कुटूंबाचा चरीतार्थ चालवितात. मात्र हि कोकण बार्ज कंपणी आमच्या महीलांचा रोजगार हिरावून घेत आहे. सतत होणारे खाडीतील खोदकाम थांबविण्यासाठी आम्ही कंपणी प्रसासनासोबत बतचीत हि केली मात्र कंपणीच्या अधिकाऱ्यांनी थातूक-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली.- अॅड. सुलभा पाटील, सरपंच.

कोकण बार्ज कंपणी कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा समजूतीने घेऊनही या कंपणीने हम करे सो कायदा चालविला आहे. सतत असेच होत राहील्यास कोणताही अनुसुचित प्रकार घडला तर कायदा व व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी हि प्रशासनाची असेल. कंपणी प्रशासना विरोधात केलेल्या अर्जाचा आपण जाणीव पुर्वक विचार करून आम्हा गावकऱ्यांना योग्य तो न्याय दयावा.- भुषण बिर्जे, सदस्य.

आमच्यावर अन्याय करणाऱ्या कंपणीवर कायदेशिर कारवाई झाली नाही तर आम्ही महिला आपल्या कार्यालया समारे उपोषणास बसु. आमच्या न्याय व हक्कासाठी आम्ही असाच लढा देत राहू.- रेश्मा घाडगे, गावकरी महिला.

टॅग्स :alibaugअलिबाग