शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

नद्यांचे रक्षण केले तर पर्यावरण संवर्धन होईल

By admin | Updated: February 2, 2016 02:03 IST

नद्यांमध्ये होणारे पाणी प्रदूषण कमी करण्याची गरज आहे, तसे न झाल्यास नद्यांचे जिवंतपण हरवून जाईल आणि प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होईल

नेरळ : नद्यांमध्ये होणारे पाणी प्रदूषण कमी करण्याची गरज आहे, तसे न झाल्यास नद्यांचे जिवंतपण हरवून जाईल आणि प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होईल, त्यामुळे जिवंत नद्यांचे रक्षण करण्याचे आवाहन जीवित नदी अभियानाच्या शैलजा देशपांडे यांनी केले. नेरळ येथे नद्या जिवंत ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम उघडली आहे, त्यावेळी पर्यावरणप्रेमी देशपांडे बोलत होत्या.पुणे येथे जीवित नदी अभियान राबविणाऱ्या शैलजा देशपांडे यांच्या अभियानाचे काम कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्या संध्या देवसस्थळे यांनी सुरु केले आहे. त्या माध्यमातून नेरळच्या कोतवालवाडी ट्रस्ट येथे महिलांना आणि नेरळ ग्रामपंचायतमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांना नद्या जिवंत कशा ठेवायच्या याबद्दल शैलजा देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याआधी जीवितनदी अभियान अंतर्गत जनजागृती कार्यशाळा नेरळ मधील विद्या विकास शाळेत आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी, पर्यवेक्षिका अरु णा जोगळेकर, तसेच अनेक शिक्षक,विद्यार्थी आणि पुढाकार घेणाऱ्या संध्या देवसस्थळे उपस्थित होत्या. विद्यार्थी यांच्या माहितीसाठी पुणे येथील मुठा नदीमध्ये या अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. तर नंतर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या शैलजा देशपांडे यांनी नेरळ विद्या विकास शाळेत विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.देशपांडे यांनी देशातील सर्वच नद्या मृत झाल्या असल्याचा दावा त्यावेळी केला. ज्यावेळी नद्या उगम पावते त्यावेळी ती जिवंत असते परंतु पठारावर गेल्यानंतर ती मृत होते अशी माहिती त्यांनी दिली. मृत झालेली नदी कशी ओळखायची याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देतांना त्यांनी ज्या ठिकाणी नदीमध्ये जलपर्णी वाढते तेथे मोठ्या प्रमाणात बगळे आणि कावळे जमा झालेले असतात.त्यावरून ती नदी मृत आहे असे समजावे अशी माहिती देशपांडे यांनी दिली.(वार्ताहर)