शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

श्रीवर्धन तालुक्याला वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:03 IST

तालुक्यातील बोर्ली पंचतन, दिवेआगर, वडवली, दिघी, भरडखोल, दांडगुरी या परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला.

श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्ली पंचतन, दिवेआगर, वडवली, दिघी, भरडखोल, दांडगुरी या परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. वादळामुळे दिवेआगर येथे नारळ व सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने प्रचंड नुकसान झाले तर पर्यटनासाठी आलेल्या पुणे मुंबई येथील पर्यटकांच्या चारचाकी वाहनांवर नारळाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे बोर्लीपंचतन येथील एसटी स्टॅण्डजवळील रोहिदास नगरमध्ये जुनाट आंब्याचे झाड कोसळले तर काही ठिकाणी घरांच्या छपरांचेही मोठे नुकसान झाले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. दिवेआगर येथे ९ घरांचे तर भरडखोल येथे २ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रु पयांचे नुकसान या वादळाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. वाºयाच्या प्रचंड वेगामुळे शेखाडी येथे श्रीवर्धन - बोर्ली मार्गावर मोठमोठी सुरूची झाडे उन्मळून पडल्याने सकाळी १० वाजेपर्यंत येथील वाहतूक पूर्णत: ठप्प होती, यामुळे वाहतूक दांडगुरी मार्गावरून चालू होती. वादळी वाºयामुळे समुद्रकिनारी असलेल्या सुवर्ण गणेश नगरीमध्ये म्हणजेच दिवेआगर येथे नारळ सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. यामध्ये सलग तीन दिवस सुट्टी असल्याने दिवेआगरमध्ये पर्यटकांची गर्दी होती. यातच समर्थनगर येथील कोको हट रिसॉर्ट येथे पर्यटकांच्या गाडीवरच नारळाचे झाड पडल्याने तीन गाड्यांचे नुकसान झाले. यामध्ये मुंबई येथून आलेल्या मोगसीन शेख यांच्या चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर नवी मुंबई येथील योगेश शेजुळ यांच्या व पुणे येथून आलेल्या स्वप्निल पंडित यांच्या गाड्यांचेही नुकसान झाले.दिवेआगर येथील भट्टी विभाग येथील सुरेश शितप, बांद्रे, तळाणी विभाग येथील बाळाराम वाणी यांच्या घरांचे नुकसान झाले, तर नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून लवकरच मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. तर मध्यरात्रीच्या या वादळीवाºयामुळे वीजतारांवर झाडे पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वितरणाचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असून रात्रीपर्यंत तरी सर्व गावांतील वीजपुरवठा सुरू होण्यास वेळ लागेल असे सांगितले.