शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

पारंपरिक वाळू व्यावसायिकांवर उपासमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:58 IST

सावित्री नदीमध्ये खाडीचा काही भाग असल्याने सावित्री नदीला खाडीचे स्वरूप आले आहे.

दासगाव : महाड तालुक्यातील सावित्री नदी पात्रात गेली अनेक वर्षे वाळू व्यवसाय सुरू आहे. यामध्ये दासगावमधील भोई समाज बुडी मारून वाळू काढण्यात तरबेज आहेत. मात्र, गेली काही वर्षांपासून शासनाने अव्वाच्या सवा रॉयल्टी सुरू केल्याने पारंपरिक वाळू व्यावसायिकाला निविदा भरणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत दासगावमधील पारंपरिक वाळू व्यवसायिक दिलीप उकिर्डे यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

सावित्री नदीमध्ये खाडीचा काही भाग असल्याने सावित्री नदीला खाडीचे स्वरूप आले आहे. या खाडीमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी खाडीलगत सोडण्यास सुरुवात झाली आणि सावित्री नदीचे पाणी प्रदूषित झाले. यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आणि वाळू व्यवसायाकडे स्थानिक ग्रामस्थांनी कल वळविला. 

वाळू उद्योगातील व्याप्ती पाहता, यामध्ये भांडवलदारांचा शिरकाव झाला आणि शासनानेही महसूल वाढवण्यासाठी याच प्रक्रियेला पाठबळ दिले. या प्रक्रियेत स्थानिक वाळू व्यावसायिक तग धरू शकला नाही, याचा फायदा अन्य व्यावसायिकांनी घेत वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी शासकीय नियमांचे उल्लंघन करत, संक्शन पंप आणि प्रमाणापेक्षा होड्या खाडीत सोडून वाळू उपसा सुरू केला गेला. शासनाने स्थानिक वाळू व्यावसायिकांसाठी हातपाटीने उपसा करण्याचा परवाना देण्याचे धोरण सुरू केले. 

टॅग्स :raigad-pcरायगड