शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:30 IST

निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा : सरकारविरोधात १ आॅगस्टपासून रस्त्यावर उतरणार

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या रिक्षा व्यावसायिकांना १ आॅगस्टपूर्वी रिक्षाला परवानगी द्यावी. अन्यथा १ आॅगस्टपासून उरणमधील हजारो रिक्षा चालक काळ्या फिती लावून शासनाविरोधात रस्त्यावर उतरून प्रवासी वाहतूक सुरू करून निषेध आंदोलन करतील, असा निर्वाणीचा इशारा उरण नवनिर्माण रिक्षा चालक-मालक सेना संघटनेचे संस्थापक संदेश ठाकूर, अध्यक्ष दिनेश हळदणकर यांनी शासनाला पत्रकाद्वारे दिला आहे.सरकार लॉकडाऊनसारख्या कठीण काळात रिक्षा चालकांच्या पाठीशी उभे राहिले नाही. या दरम्यान, रिक्षा चालकांना कोणतीही आर्थिक मदत केली नाही. उलट सक्तीने त्यांना रिक्षा बंद ठेवायला भाग पाडून शासनाने समस्त रिक्षा चालकांवर एक प्रकारचा अन्यायच केला आहे. वारंवार प्रवासी वाहतूक करण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करूनही परवानगी देण्यास दिरंगाईच केली आहे. यामुळे रिक्षा चालक-मालकांचे संसार उघड्यावर आले आहेत.रायगड जिल्हा व नवी मुंबई शहराला लागून असलेल्या उरण तालुक्यामध्ये रिक्षांची संख्या सुमारे सहा हजारांहून जास्त आहे. अनेक उच्च शिक्षित, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय किंवा खासगी कंपनीत काम न मिळाल्याने स्थानिक बेरोजगार तरुण रिक्षा व्यवसायात उतरले आहेत. निदान रिक्षा चालवून तरी आपल्यासह आपल्या कुटुंबांचा चरितार्थ चालविता येईल, या आशेने नाईलाजाने स्थानिक तरुण रिक्षा व्यवसायाला लागले आहेत. मात्र, २२ मार्चपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालकांना प्रवासी वाहतुकीस परवानगी नसल्याने त्यांना विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे. मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च, रिक्षा घेतलेल्या बँकेचे कर्ज, त्याचे हप्ते, कुटुंबीयांच्या पालन पोषणाचा खर्च, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास हॉस्पिटलचा खर्च, रेशन, अन्न-धान्य आदींचा खर्च भागविण्यासाठी रिक्षा चालकाने पैसे आणायचे कुठून? या सर्वाचा ताण कुटुंब प्रमुख असलेल्या रिक्षा चालकावर पडत आहे.या रिक्षा चालकांना कुणाचाच आधार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातही रिक्षा चालकांनी तहसील व पोलीस प्रशासनाला आपल्या रिक्षा बंद ठेवून सहकार्य केले.मात्र, आता लॉकडाऊन वरचेवर वाढत जात असल्याने रिक्षा चालकांची चिंता आता आणखीनच वाढत असून, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, हा प्रश्न आहे.महिना १० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई पोटी द्यावेत : शासनाने सामाजिक बांधिलकी जपत कुठेतरी रिक्षा चालकांचा विचार करावा. शासनाने विविध सामाजिक संस्थानी रिक्षा चालकांच्या मदतीसाठी पुढे यावे, अशी भावना उरणमधील हजारो रिक्षा चालक व्यक्त करीत होते. अनेक रिक्षा संघटनेने शासनाशी पत्रव्यवहार करून रिक्षा चालकांना महिना १० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाईपोटी द्यावेत, अशी मागणी केली होती, पण अद्यापही कोणतेही अनुदान किंवा आर्थिक नुकसान भरपाई सोडाच कोणताही सकारात्मक प्रतिसादही रिक्षा चालकांना मिळालेले नाही. घोर आर्थिक संकटात सापडलेल्या या स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बेरोजगारांना शासनाकडून, तसेच विविध सामाजिक संस्थेकडूनही मदतीची, सहकार्याची अपेक्षा होती. रिक्षा चालक रस्त्यावर उतरून शासनाचा काळ्या फिती लावून निषेध आंदोलनही करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्माण रिक्षा चालक मालक सेना संघटनेचे संस्थापक संदेश ठाकूर, अध्यक्ष दिनेश हळदणकर यांनी दिली.