शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:30 IST

निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा : सरकारविरोधात १ आॅगस्टपासून रस्त्यावर उतरणार

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या रिक्षा व्यावसायिकांना १ आॅगस्टपूर्वी रिक्षाला परवानगी द्यावी. अन्यथा १ आॅगस्टपासून उरणमधील हजारो रिक्षा चालक काळ्या फिती लावून शासनाविरोधात रस्त्यावर उतरून प्रवासी वाहतूक सुरू करून निषेध आंदोलन करतील, असा निर्वाणीचा इशारा उरण नवनिर्माण रिक्षा चालक-मालक सेना संघटनेचे संस्थापक संदेश ठाकूर, अध्यक्ष दिनेश हळदणकर यांनी शासनाला पत्रकाद्वारे दिला आहे.सरकार लॉकडाऊनसारख्या कठीण काळात रिक्षा चालकांच्या पाठीशी उभे राहिले नाही. या दरम्यान, रिक्षा चालकांना कोणतीही आर्थिक मदत केली नाही. उलट सक्तीने त्यांना रिक्षा बंद ठेवायला भाग पाडून शासनाने समस्त रिक्षा चालकांवर एक प्रकारचा अन्यायच केला आहे. वारंवार प्रवासी वाहतूक करण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करूनही परवानगी देण्यास दिरंगाईच केली आहे. यामुळे रिक्षा चालक-मालकांचे संसार उघड्यावर आले आहेत.रायगड जिल्हा व नवी मुंबई शहराला लागून असलेल्या उरण तालुक्यामध्ये रिक्षांची संख्या सुमारे सहा हजारांहून जास्त आहे. अनेक उच्च शिक्षित, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय किंवा खासगी कंपनीत काम न मिळाल्याने स्थानिक बेरोजगार तरुण रिक्षा व्यवसायात उतरले आहेत. निदान रिक्षा चालवून तरी आपल्यासह आपल्या कुटुंबांचा चरितार्थ चालविता येईल, या आशेने नाईलाजाने स्थानिक तरुण रिक्षा व्यवसायाला लागले आहेत. मात्र, २२ मार्चपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालकांना प्रवासी वाहतुकीस परवानगी नसल्याने त्यांना विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे. मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च, रिक्षा घेतलेल्या बँकेचे कर्ज, त्याचे हप्ते, कुटुंबीयांच्या पालन पोषणाचा खर्च, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास हॉस्पिटलचा खर्च, रेशन, अन्न-धान्य आदींचा खर्च भागविण्यासाठी रिक्षा चालकाने पैसे आणायचे कुठून? या सर्वाचा ताण कुटुंब प्रमुख असलेल्या रिक्षा चालकावर पडत आहे.या रिक्षा चालकांना कुणाचाच आधार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातही रिक्षा चालकांनी तहसील व पोलीस प्रशासनाला आपल्या रिक्षा बंद ठेवून सहकार्य केले.मात्र, आता लॉकडाऊन वरचेवर वाढत जात असल्याने रिक्षा चालकांची चिंता आता आणखीनच वाढत असून, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, हा प्रश्न आहे.महिना १० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई पोटी द्यावेत : शासनाने सामाजिक बांधिलकी जपत कुठेतरी रिक्षा चालकांचा विचार करावा. शासनाने विविध सामाजिक संस्थानी रिक्षा चालकांच्या मदतीसाठी पुढे यावे, अशी भावना उरणमधील हजारो रिक्षा चालक व्यक्त करीत होते. अनेक रिक्षा संघटनेने शासनाशी पत्रव्यवहार करून रिक्षा चालकांना महिना १० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाईपोटी द्यावेत, अशी मागणी केली होती, पण अद्यापही कोणतेही अनुदान किंवा आर्थिक नुकसान भरपाई सोडाच कोणताही सकारात्मक प्रतिसादही रिक्षा चालकांना मिळालेले नाही. घोर आर्थिक संकटात सापडलेल्या या स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बेरोजगारांना शासनाकडून, तसेच विविध सामाजिक संस्थेकडूनही मदतीची, सहकार्याची अपेक्षा होती. रिक्षा चालक रस्त्यावर उतरून शासनाचा काळ्या फिती लावून निषेध आंदोलनही करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्माण रिक्षा चालक मालक सेना संघटनेचे संस्थापक संदेश ठाकूर, अध्यक्ष दिनेश हळदणकर यांनी दिली.