शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

माणुसकीचे अतुलनीय दर्शन : मदतीसाठी सरसावले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:26 IST

माणुसकीचे अतुलनीय दर्शन : पुरात अडकलेल्यांची सुखरूप सुटका

कांता हाबळे 

नेरळ : गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेकडो लोक अडकून पडले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक कोलमडून पडल्याने आता करायचं काय असा प्रश्न या पूर सदृश्य परिस्थितीत अडकून पडलेल्या नागरिकांना पडलेला असताना त्यांच्यासाठी असंख्य हात सरसावले आहेत. जेवण आणि राहण्याची सोय उपलब्ध झाल्याने या सगळ्यातून माणुसकीचे अतुलनीय दर्शन घडले आहे.

२६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर २६ जुलै ही तारीख महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात धडकी भरावणारी ठरली. यावर्षीही असाच २६ जुलै शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने प्रत्येकाच्या मनात धडकी भरवली; आणि ज्याची भीती होती तेच झाले. शुक्रवार सायंकाळपासून रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाहता-पाहता रस्त्यात पाणी साठायला लागले तर रेल्वे रुळांवरही पाणी भरले. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आणि त्याबरोबर प्रमुख राज्य मार्ग व महामार्गही ठप्प झाले. या सगळ्यात प्रवास करणारे प्रवासी नागरिक अडकून पडले. शुक्रवारी सुरू झालेला पाऊस शनिवारी सायंकाळपर्यंत मुसळधार सुरूच राहिल्याने अडकून पडलेल्या नागरिकांसाठी सर्व स्तरातून मदतीसाठी अनेक हात पुढे आले.नेरळ रेल्वे स्थानकात व परिसरात अडकलेल्या नागरिकांसाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी साळुंके व उपसरपंच अंकुश शेळके यांनी ग्रामपंचायतीची दालने मोकळी केली. त्यांची ग्रामपंचायतीत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तर नेरळमधील आगरी समाज संस्थेने हुतात्मा हिराजी पाटील सभागृह नागरिकांसाठी उघडे केले, त्याठिकाणीही जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कर्जत जैन बांधव संघटनेतर्फे असिफ मिर्झा, गिरीश कांबळे व रोटरी क्लब कर्जतचे कार्येकर्ते यांच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या मेल गाड्यांमधील प्रवाशांना जेवण, नाष्टा, चहा, बिस्कीट देण्यात आली. कर्जत शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिक व प्रवाशांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवन येथे व्यवस्था करण्यात आली होती. तर कोंढाणा ग्रुप या सोशल मीडिया ग्रुपचे अडमिन व सदस्य यांनीही प्रवाशाची आस्थेने विचारपूस करून बिस्कीट, पाणी व जेवणाची व्यवस्था केली.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक जण अडकून पडले होते. काहींच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे असल्याने या आपत्तीत मदतीसाठी अनेक हात सरसावले. या कार्यात अनेक संस्था व व्यक्ती सारसावल्याने सर्व स्तरातून या माणुसकीचे दर्शन घडले. 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड