शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रायगडच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:43 IST

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : कोरोनाचा पडला विसर

अलिबाग : सोमवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांच्या या आततायीपणामुळे पोलीस प्रशासनही या रांगा बघून हतबल झाल्याचे दिसले. बाजारपेठा, दुकाने या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याबाबतचे नियम धाब्यावर बसवण्यात आले.

नागरिक कुठलेही कारण सांगून घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी अशी गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार कसा रोखणार, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र शासनाकडून देशभरातील लॉकडाऊनमध्ये ३० पर्यंत वाढ केली होती. रायगड जिल्ह्यातील काही भागातच कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून घरांमध्ये अडकून पडलेले नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. खरेदीसाठी त्यांनी दुकानांबाहेर गर्दी केली होती. काहीच दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच वादळही येऊन गेल्याने घरांच्या छपरावर ताडपत्री, प्लॅस्टिकचा कागद टाकणे गरजेचे असल्याने अशा वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याचे दिसत होते. मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी असल्याने एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखण्यात त्यांना अपयश आले अथवा तो नियम त्यांनी पायदळी तुडवल्याचे स्पष्ट दिसत होते.एका रस्त्यावरील किंवा गल्लीमधील दुकानातही गर्दी केली जात आहे. त्याचबरोबर सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच ही दुकाने सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित कालावधीमध्ये संचारबंदी लागू राहणार आहे.सरकारी कार्यालयांसह विविध खासगी कंपन्या, खाजगी कार्यालयांमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ओसाड पडलेल्या रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. मार्केटमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीसही वेळोवेळी बाजारपेठेत जाऊन नागरिकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन करीत होते.