शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रायगडच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:43 IST

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : कोरोनाचा पडला विसर

अलिबाग : सोमवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांच्या या आततायीपणामुळे पोलीस प्रशासनही या रांगा बघून हतबल झाल्याचे दिसले. बाजारपेठा, दुकाने या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याबाबतचे नियम धाब्यावर बसवण्यात आले.

नागरिक कुठलेही कारण सांगून घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी अशी गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार कसा रोखणार, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र शासनाकडून देशभरातील लॉकडाऊनमध्ये ३० पर्यंत वाढ केली होती. रायगड जिल्ह्यातील काही भागातच कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून घरांमध्ये अडकून पडलेले नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. खरेदीसाठी त्यांनी दुकानांबाहेर गर्दी केली होती. काहीच दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच वादळही येऊन गेल्याने घरांच्या छपरावर ताडपत्री, प्लॅस्टिकचा कागद टाकणे गरजेचे असल्याने अशा वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याचे दिसत होते. मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी असल्याने एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखण्यात त्यांना अपयश आले अथवा तो नियम त्यांनी पायदळी तुडवल्याचे स्पष्ट दिसत होते.एका रस्त्यावरील किंवा गल्लीमधील दुकानातही गर्दी केली जात आहे. त्याचबरोबर सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच ही दुकाने सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित कालावधीमध्ये संचारबंदी लागू राहणार आहे.सरकारी कार्यालयांसह विविध खासगी कंपन्या, खाजगी कार्यालयांमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ओसाड पडलेल्या रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. मार्केटमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीसही वेळोवेळी बाजारपेठेत जाऊन नागरिकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन करीत होते.