शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:36 IST

आयुष्यातील करिअरचा महत्त्वाचा टप्पा असणा-या बारावी परीक्षेचा प्रारंभ बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने

अलिबाग : आयुष्यातील करिअरचा महत्त्वाचा टप्पा असणाºया बारावी परीक्षेचा प्रारंभ बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) बारावी परीक्षेकरिता जिल्ह्यात ४२ परीक्षा केंद्रांवर ३२ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.येत्या १ मार्चपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) दहावीची परीक्षा प्रारंभ होणार आहे. दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यात ६९ परीक्षा केंद्रे असून, त्यावर ३९ हजार ५५९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा व गैरमार्ग प्रकरणास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.परीक्षेला जाताना, परीक्षा हॉलमध्ये व परीक्षेनंतर काय करावे, याचे असंख्य मेसेज वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये फिरताहेत; पण यात एक मुद्दा सगळेच विसरताहेत तो म्हणजे तुम्ही आनंदी राहा. पेपरच्या टेन्शनने मूड बदलण्याची शक्यता असते. तेव्हा सतत पेपर, परीक्षा, मार्क याचा विचार करू नका. आपला पेपर चांगला जाणार आहेच, हा विचार मनात कायम ठेवा, सकारात्मक विचार करा व नकारात्मक विचारांना दूर करा, असे आवाहन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना समुदेशक ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी केले.