शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने पोलादपुरात घरांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 01:52 IST

पोलादपूर शहरात महामार्गाच्या भूमिगत मार्गाचे काम सुरू असल्यामुळे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या कमानीपासून ते सडवली फाटा पर्यंत भूमिगत रस्त्याचे काम सुरू आहे

प्रकाश कदम

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरण कामाने वेग घेतला असून सद्यस्थितीत पोलादपूर शहरातही काम वेगाने सुरू आहे. मात्र या कामामुळे पोलादपूर शहरातील महामार्गालगतच्या घरांना हादरे बसून बहुसंख्य घरांना तडे गेल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

पोलादपूर शहरात महामार्गाच्या भूमिगत मार्गाचे काम सुरू असल्यामुळे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या कमानीपासून ते सडवली फाटा पर्यंत भूमिगत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे ३० फूट खोल खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे महामार्गालगतच्या घरांना प्रचंड प्रमाणात हादरे बसत आहेत. त्यामुळे घरांना तडे जाऊन नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण? असा प्रश्न महामार्गालगत राहणारे नागरिक विचारत आहेत. मात्र संबंधित ठेकेदार कंपनी आणि नॅशनल हायवेचे अधिकारी वर्ग कानावर हात ठेवून आहेत असा आरोप नागरिकांतून केला जात आहे. याबाबत येथील समाजसेवक राजेश धुमाळ म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग ६६ हा शहरातून जाणारा रस्ता क्रॉस आहे तो सरळ जायला पाहिजे होता परंतु ज्या बाजूने वस्ती आहे त्या बाजूला जादा भूसंपादन करण्यात आले आहे. तसेच डिमार्केशन वस्तीच्या बाजूने झाल्यामुळे रस्ता घरांच्या जवळून जात आहे हेच जर दोन्ही बाजूने समांतर घेतले असते तर हा धोका काही अंशी टाळता आला असता. सद्यस्थितीत ओव्हर पास कामामुळे जवळ जवळ ३० ते ३२ फूट खोल खोदाई करून रस्त्याचा मेन ट्रॅक आहे तो नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ओव्हर पास स्लॅबचा भाग सोडता अन्य ठिकाणी जो खड्डा तयार झाला आहे त्याला कुठेही संरक्षण भिंतीचे बांधकाम न करता फक्त जाळी टाकून ते काम मजबूत आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता येथील संपूर्ण भुसभुशीत माती असल्यामुळे हे खोदकाम करताना आजूबाजूच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.

कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे येथील पावसाच्या पाण्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

महामार्गाच्या कामामुळे प्रचंड प्रमाणात हादरे बसून घराला तडे जाऊन घरात रात्री झोपणेही अवघड झाले आहे. याबाबत तहसीलदार यांना सांगून लेखी तक्रार अर्ज देऊनही काही कार्यवाही होत नाही. शासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का ?-  निरंजन मोरे, ग्रामस्थ, पोलादपूर

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा