शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने पोलादपुरात घरांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 01:52 IST

पोलादपूर शहरात महामार्गाच्या भूमिगत मार्गाचे काम सुरू असल्यामुळे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या कमानीपासून ते सडवली फाटा पर्यंत भूमिगत रस्त्याचे काम सुरू आहे

प्रकाश कदम

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरण कामाने वेग घेतला असून सद्यस्थितीत पोलादपूर शहरातही काम वेगाने सुरू आहे. मात्र या कामामुळे पोलादपूर शहरातील महामार्गालगतच्या घरांना हादरे बसून बहुसंख्य घरांना तडे गेल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

पोलादपूर शहरात महामार्गाच्या भूमिगत मार्गाचे काम सुरू असल्यामुळे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या कमानीपासून ते सडवली फाटा पर्यंत भूमिगत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे ३० फूट खोल खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे महामार्गालगतच्या घरांना प्रचंड प्रमाणात हादरे बसत आहेत. त्यामुळे घरांना तडे जाऊन नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण? असा प्रश्न महामार्गालगत राहणारे नागरिक विचारत आहेत. मात्र संबंधित ठेकेदार कंपनी आणि नॅशनल हायवेचे अधिकारी वर्ग कानावर हात ठेवून आहेत असा आरोप नागरिकांतून केला जात आहे. याबाबत येथील समाजसेवक राजेश धुमाळ म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग ६६ हा शहरातून जाणारा रस्ता क्रॉस आहे तो सरळ जायला पाहिजे होता परंतु ज्या बाजूने वस्ती आहे त्या बाजूला जादा भूसंपादन करण्यात आले आहे. तसेच डिमार्केशन वस्तीच्या बाजूने झाल्यामुळे रस्ता घरांच्या जवळून जात आहे हेच जर दोन्ही बाजूने समांतर घेतले असते तर हा धोका काही अंशी टाळता आला असता. सद्यस्थितीत ओव्हर पास कामामुळे जवळ जवळ ३० ते ३२ फूट खोल खोदाई करून रस्त्याचा मेन ट्रॅक आहे तो नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ओव्हर पास स्लॅबचा भाग सोडता अन्य ठिकाणी जो खड्डा तयार झाला आहे त्याला कुठेही संरक्षण भिंतीचे बांधकाम न करता फक्त जाळी टाकून ते काम मजबूत आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता येथील संपूर्ण भुसभुशीत माती असल्यामुळे हे खोदकाम करताना आजूबाजूच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.

कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे येथील पावसाच्या पाण्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

महामार्गाच्या कामामुळे प्रचंड प्रमाणात हादरे बसून घराला तडे जाऊन घरात रात्री झोपणेही अवघड झाले आहे. याबाबत तहसीलदार यांना सांगून लेखी तक्रार अर्ज देऊनही काही कार्यवाही होत नाही. शासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का ?-  निरंजन मोरे, ग्रामस्थ, पोलादपूर

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा