शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने पोलादपुरात घरांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 01:52 IST

पोलादपूर शहरात महामार्गाच्या भूमिगत मार्गाचे काम सुरू असल्यामुळे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या कमानीपासून ते सडवली फाटा पर्यंत भूमिगत रस्त्याचे काम सुरू आहे

प्रकाश कदम

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरण कामाने वेग घेतला असून सद्यस्थितीत पोलादपूर शहरातही काम वेगाने सुरू आहे. मात्र या कामामुळे पोलादपूर शहरातील महामार्गालगतच्या घरांना हादरे बसून बहुसंख्य घरांना तडे गेल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

पोलादपूर शहरात महामार्गाच्या भूमिगत मार्गाचे काम सुरू असल्यामुळे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या कमानीपासून ते सडवली फाटा पर्यंत भूमिगत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे ३० फूट खोल खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे महामार्गालगतच्या घरांना प्रचंड प्रमाणात हादरे बसत आहेत. त्यामुळे घरांना तडे जाऊन नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण? असा प्रश्न महामार्गालगत राहणारे नागरिक विचारत आहेत. मात्र संबंधित ठेकेदार कंपनी आणि नॅशनल हायवेचे अधिकारी वर्ग कानावर हात ठेवून आहेत असा आरोप नागरिकांतून केला जात आहे. याबाबत येथील समाजसेवक राजेश धुमाळ म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग ६६ हा शहरातून जाणारा रस्ता क्रॉस आहे तो सरळ जायला पाहिजे होता परंतु ज्या बाजूने वस्ती आहे त्या बाजूला जादा भूसंपादन करण्यात आले आहे. तसेच डिमार्केशन वस्तीच्या बाजूने झाल्यामुळे रस्ता घरांच्या जवळून जात आहे हेच जर दोन्ही बाजूने समांतर घेतले असते तर हा धोका काही अंशी टाळता आला असता. सद्यस्थितीत ओव्हर पास कामामुळे जवळ जवळ ३० ते ३२ फूट खोल खोदाई करून रस्त्याचा मेन ट्रॅक आहे तो नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ओव्हर पास स्लॅबचा भाग सोडता अन्य ठिकाणी जो खड्डा तयार झाला आहे त्याला कुठेही संरक्षण भिंतीचे बांधकाम न करता फक्त जाळी टाकून ते काम मजबूत आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता येथील संपूर्ण भुसभुशीत माती असल्यामुळे हे खोदकाम करताना आजूबाजूच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.

कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे येथील पावसाच्या पाण्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

महामार्गाच्या कामामुळे प्रचंड प्रमाणात हादरे बसून घराला तडे जाऊन घरात रात्री झोपणेही अवघड झाले आहे. याबाबत तहसीलदार यांना सांगून लेखी तक्रार अर्ज देऊनही काही कार्यवाही होत नाही. शासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का ?-  निरंजन मोरे, ग्रामस्थ, पोलादपूर

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा