शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

सरकारी निधीविना स्वबळावर घरोघर पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:06 IST

पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे.

अलिबाग : पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे. समाजहितासाठी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून एखादा तरु ण पुढाकार घेतो, वेळप्रसंगी कर्ज काढून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण गाव उभे राहते. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावात ‘लोकमत’चे वार्ताहर सुनील बुरुमकर यांनी हे शक्य करून दाखवले आहे.शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने घरोघर नळाने पाणीपुरवठा योजना राबविणारे परहूरपाडा गाव राज्यातील पहिले आदर्शवत गाव आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी केले.ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्याने परहूरपाडा गावातील घरोघर नळाने पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सेवाशक्ती पतसंस्थेचे चेअरमन सीताराम कवळे, जाखमाता पतसंस्थेचे चेअरमन जे. पी. घरत, परहूरपाडा पाणीपुरवठा समितीचे सदस्य सुभाष पाटील, सुधीर नाईक, आशा नाईक आदी उपस्थित होते.बुरुमकर यांनी पुढाकार घेऊन ३३० घरांना घरपोच नळपाणी योजना केवळ १३ लाख २५ हजार रुपये खर्चामध्ये राबविली. यासाठी आठ लाख २५ हजार रुपये लोकवर्गणी आणि उर्वरित पाच लाख रु पये स्वत: कर्ज काढून योजना पूर्ण केली. ग्रामस्थांच्या या एकीचे कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही योजना पाणीटंचाईवर मात करीत संजीवनी ठरली असून, आनंदाची झुळूक देणारी योजना आहे. शासकीय योजना लोकसहभागाच्या अभावामुळे कुचकामी ठरत असताना परहूरपाडा ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता ती पूर्ण केली. सर्व ग्रामस्थांना बरोबर घेत १०० टक्के लोकसहभागातून राबविलेल्या या योजनेचा अभ्यास इतर गावांनीही करण्यासारखा असल्याचेही सांगितले.योजनेसाठी कर्ज काढून पुढाकारज्येष्ठ ग्रामस्थ रमेश पाटील म्हणाले, सुनील बुरुमकर यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कर्ज काढून पुढाकार घेतल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये एकीची भावना निर्माण झाली. यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा समितीने कोणतीही राजकीय मदत न घेता केलेले काम आदर्शवत आहे.महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवलामहिला ग्रामस्थ वैष्णवी खोपकर म्हणाल्या, महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवून ग्रामस्थांनी एकप्रकारे महिलांचा सन्मानच केला आहे. गावासाठी प्रत्येकाला काहीतरी करण्याची ऊर्मी असते; परंतु त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असते. परहूरपाड्यामध्ये सुनील बुरु मकर यांनी पुढाकार घेऊन समाजासाठी नवा आदर्श घालून दिला आहे.परहूरपाडा गावात राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनेची माहिती उपस्थितांना दिली. सामाजिक भावना मनाशी बाळगून भावी पिढीमध्ये चांगल्या गोष्टीचा संदेश जावा, या हेतूने पुढाकार घेतला. योजनेसाठी कमी पडणाºया पैशांसाठी ५ लाख रुपये कर्ज काढावे लागले. मात्र, ग्रामस्थ विशेषत: येथील महिलांच्या चेहºयावरील समाधान त्याहून लाखमोलाचे आहे.- सुनील बुरुमकर, अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, परहूरपाडा