शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सरकारी निधीविना स्वबळावर घरोघर पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:06 IST

पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे.

अलिबाग : पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे. समाजहितासाठी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून एखादा तरु ण पुढाकार घेतो, वेळप्रसंगी कर्ज काढून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण गाव उभे राहते. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावात ‘लोकमत’चे वार्ताहर सुनील बुरुमकर यांनी हे शक्य करून दाखवले आहे.शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने घरोघर नळाने पाणीपुरवठा योजना राबविणारे परहूरपाडा गाव राज्यातील पहिले आदर्शवत गाव आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी केले.ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्याने परहूरपाडा गावातील घरोघर नळाने पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सेवाशक्ती पतसंस्थेचे चेअरमन सीताराम कवळे, जाखमाता पतसंस्थेचे चेअरमन जे. पी. घरत, परहूरपाडा पाणीपुरवठा समितीचे सदस्य सुभाष पाटील, सुधीर नाईक, आशा नाईक आदी उपस्थित होते.बुरुमकर यांनी पुढाकार घेऊन ३३० घरांना घरपोच नळपाणी योजना केवळ १३ लाख २५ हजार रुपये खर्चामध्ये राबविली. यासाठी आठ लाख २५ हजार रुपये लोकवर्गणी आणि उर्वरित पाच लाख रु पये स्वत: कर्ज काढून योजना पूर्ण केली. ग्रामस्थांच्या या एकीचे कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही योजना पाणीटंचाईवर मात करीत संजीवनी ठरली असून, आनंदाची झुळूक देणारी योजना आहे. शासकीय योजना लोकसहभागाच्या अभावामुळे कुचकामी ठरत असताना परहूरपाडा ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता ती पूर्ण केली. सर्व ग्रामस्थांना बरोबर घेत १०० टक्के लोकसहभागातून राबविलेल्या या योजनेचा अभ्यास इतर गावांनीही करण्यासारखा असल्याचेही सांगितले.योजनेसाठी कर्ज काढून पुढाकारज्येष्ठ ग्रामस्थ रमेश पाटील म्हणाले, सुनील बुरुमकर यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कर्ज काढून पुढाकार घेतल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये एकीची भावना निर्माण झाली. यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा समितीने कोणतीही राजकीय मदत न घेता केलेले काम आदर्शवत आहे.महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवलामहिला ग्रामस्थ वैष्णवी खोपकर म्हणाल्या, महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवून ग्रामस्थांनी एकप्रकारे महिलांचा सन्मानच केला आहे. गावासाठी प्रत्येकाला काहीतरी करण्याची ऊर्मी असते; परंतु त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असते. परहूरपाड्यामध्ये सुनील बुरु मकर यांनी पुढाकार घेऊन समाजासाठी नवा आदर्श घालून दिला आहे.परहूरपाडा गावात राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनेची माहिती उपस्थितांना दिली. सामाजिक भावना मनाशी बाळगून भावी पिढीमध्ये चांगल्या गोष्टीचा संदेश जावा, या हेतूने पुढाकार घेतला. योजनेसाठी कमी पडणाºया पैशांसाठी ५ लाख रुपये कर्ज काढावे लागले. मात्र, ग्रामस्थ विशेषत: येथील महिलांच्या चेहºयावरील समाधान त्याहून लाखमोलाचे आहे.- सुनील बुरुमकर, अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, परहूरपाडा