शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी निधीविना स्वबळावर घरोघर पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:06 IST

पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे.

अलिबाग : पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे. समाजहितासाठी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून एखादा तरु ण पुढाकार घेतो, वेळप्रसंगी कर्ज काढून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण गाव उभे राहते. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावात ‘लोकमत’चे वार्ताहर सुनील बुरुमकर यांनी हे शक्य करून दाखवले आहे.शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने घरोघर नळाने पाणीपुरवठा योजना राबविणारे परहूरपाडा गाव राज्यातील पहिले आदर्शवत गाव आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी केले.ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्याने परहूरपाडा गावातील घरोघर नळाने पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सेवाशक्ती पतसंस्थेचे चेअरमन सीताराम कवळे, जाखमाता पतसंस्थेचे चेअरमन जे. पी. घरत, परहूरपाडा पाणीपुरवठा समितीचे सदस्य सुभाष पाटील, सुधीर नाईक, आशा नाईक आदी उपस्थित होते.बुरुमकर यांनी पुढाकार घेऊन ३३० घरांना घरपोच नळपाणी योजना केवळ १३ लाख २५ हजार रुपये खर्चामध्ये राबविली. यासाठी आठ लाख २५ हजार रुपये लोकवर्गणी आणि उर्वरित पाच लाख रु पये स्वत: कर्ज काढून योजना पूर्ण केली. ग्रामस्थांच्या या एकीचे कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही योजना पाणीटंचाईवर मात करीत संजीवनी ठरली असून, आनंदाची झुळूक देणारी योजना आहे. शासकीय योजना लोकसहभागाच्या अभावामुळे कुचकामी ठरत असताना परहूरपाडा ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता ती पूर्ण केली. सर्व ग्रामस्थांना बरोबर घेत १०० टक्के लोकसहभागातून राबविलेल्या या योजनेचा अभ्यास इतर गावांनीही करण्यासारखा असल्याचेही सांगितले.योजनेसाठी कर्ज काढून पुढाकारज्येष्ठ ग्रामस्थ रमेश पाटील म्हणाले, सुनील बुरुमकर यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कर्ज काढून पुढाकार घेतल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये एकीची भावना निर्माण झाली. यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा समितीने कोणतीही राजकीय मदत न घेता केलेले काम आदर्शवत आहे.महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवलामहिला ग्रामस्थ वैष्णवी खोपकर म्हणाल्या, महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवून ग्रामस्थांनी एकप्रकारे महिलांचा सन्मानच केला आहे. गावासाठी प्रत्येकाला काहीतरी करण्याची ऊर्मी असते; परंतु त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असते. परहूरपाड्यामध्ये सुनील बुरु मकर यांनी पुढाकार घेऊन समाजासाठी नवा आदर्श घालून दिला आहे.परहूरपाडा गावात राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनेची माहिती उपस्थितांना दिली. सामाजिक भावना मनाशी बाळगून भावी पिढीमध्ये चांगल्या गोष्टीचा संदेश जावा, या हेतूने पुढाकार घेतला. योजनेसाठी कमी पडणाºया पैशांसाठी ५ लाख रुपये कर्ज काढावे लागले. मात्र, ग्रामस्थ विशेषत: येथील महिलांच्या चेहºयावरील समाधान त्याहून लाखमोलाचे आहे.- सुनील बुरुमकर, अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, परहूरपाडा