शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

विहीर आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तासभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:25 IST

आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे.

- विजय मांडे कर्जत : तालुक्यातील आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने शिवकालीन पेठ किल्ल्यावरील कुंडातून पाणी खाली आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी डिझेल पंप लावून पाणी खाली लोकवस्तीत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.कर्जतपासून अंबिवली गाव ४३ किलोमीटर अंतरावर आहे, तर पुढे दोन किमीवर डोंगरात चालत जाऊन पेठ गावात जाता येते. गावालगत मागे शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर उभा असलेला किल्ला आहे. पेठ किल्ल्यावरील विहिरीवरच गावातील रहिवाशांची तहान भागते. मात्र, सध्या ती आटल्याने गावातील महिलांना जामरुख गावाकडे डोंगर उतरून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगराखाली असलेल्या नदीमध्ये ग्रामस्थ डवरे खोदून पाणी भरतात आणि पुन्हा डोंगर चढून गावात पोहोचतात. म्हणजे हंडाभर पाण्यासाठी त्यांना तासभराची पायपीट करावी लागते.कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी २१ मे रोजी पेठ गावातील पाणीसमस्या जाणून घेतली. या ठिकाणी कोणतेही वाहन जात नसल्याने २ किलोमीटरची पायपीट करीत जामरुख ग्रामपंचायतचे प्रभारी प्रशासक सुनील आयरे यांच्यासह गावातील विहिरीचीही पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत चर्चा करून पेठ किल्ल्यावर असलेल्या शिवकालीन पाण्याच्या कुंडांची पाहणी केली. तीनपैकी दोन कुंडांमध्ये पाणी आहे; पण ते खाली कसे आणायचे? असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामस्थांची मागणी योग्य असल्याने तत्काळ ग्रामपंचायतीला आदेश देऊन किल्ल्यावरील पाणी खाली गावात आणण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यास सूचित करण्यात आले.>पेठ गावातील पाणीटंचाईची दाहकता लक्षात आली असून, किल्ल्यावरील पाणी खाली आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेठ गावात एक विहीर नव्याने खोदली जात असून त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघू शकेल.- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी