शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

विहीर आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तासभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:25 IST

आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे.

- विजय मांडे कर्जत : तालुक्यातील आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने शिवकालीन पेठ किल्ल्यावरील कुंडातून पाणी खाली आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी डिझेल पंप लावून पाणी खाली लोकवस्तीत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.कर्जतपासून अंबिवली गाव ४३ किलोमीटर अंतरावर आहे, तर पुढे दोन किमीवर डोंगरात चालत जाऊन पेठ गावात जाता येते. गावालगत मागे शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर उभा असलेला किल्ला आहे. पेठ किल्ल्यावरील विहिरीवरच गावातील रहिवाशांची तहान भागते. मात्र, सध्या ती आटल्याने गावातील महिलांना जामरुख गावाकडे डोंगर उतरून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगराखाली असलेल्या नदीमध्ये ग्रामस्थ डवरे खोदून पाणी भरतात आणि पुन्हा डोंगर चढून गावात पोहोचतात. म्हणजे हंडाभर पाण्यासाठी त्यांना तासभराची पायपीट करावी लागते.कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी २१ मे रोजी पेठ गावातील पाणीसमस्या जाणून घेतली. या ठिकाणी कोणतेही वाहन जात नसल्याने २ किलोमीटरची पायपीट करीत जामरुख ग्रामपंचायतचे प्रभारी प्रशासक सुनील आयरे यांच्यासह गावातील विहिरीचीही पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत चर्चा करून पेठ किल्ल्यावर असलेल्या शिवकालीन पाण्याच्या कुंडांची पाहणी केली. तीनपैकी दोन कुंडांमध्ये पाणी आहे; पण ते खाली कसे आणायचे? असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामस्थांची मागणी योग्य असल्याने तत्काळ ग्रामपंचायतीला आदेश देऊन किल्ल्यावरील पाणी खाली गावात आणण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यास सूचित करण्यात आले.>पेठ गावातील पाणीटंचाईची दाहकता लक्षात आली असून, किल्ल्यावरील पाणी खाली आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेठ गावात एक विहीर नव्याने खोदली जात असून त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघू शकेल.- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी