शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

विहीर आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तासभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:25 IST

आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे.

- विजय मांडे कर्जत : तालुक्यातील आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने शिवकालीन पेठ किल्ल्यावरील कुंडातून पाणी खाली आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी डिझेल पंप लावून पाणी खाली लोकवस्तीत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.कर्जतपासून अंबिवली गाव ४३ किलोमीटर अंतरावर आहे, तर पुढे दोन किमीवर डोंगरात चालत जाऊन पेठ गावात जाता येते. गावालगत मागे शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर उभा असलेला किल्ला आहे. पेठ किल्ल्यावरील विहिरीवरच गावातील रहिवाशांची तहान भागते. मात्र, सध्या ती आटल्याने गावातील महिलांना जामरुख गावाकडे डोंगर उतरून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगराखाली असलेल्या नदीमध्ये ग्रामस्थ डवरे खोदून पाणी भरतात आणि पुन्हा डोंगर चढून गावात पोहोचतात. म्हणजे हंडाभर पाण्यासाठी त्यांना तासभराची पायपीट करावी लागते.कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी २१ मे रोजी पेठ गावातील पाणीसमस्या जाणून घेतली. या ठिकाणी कोणतेही वाहन जात नसल्याने २ किलोमीटरची पायपीट करीत जामरुख ग्रामपंचायतचे प्रभारी प्रशासक सुनील आयरे यांच्यासह गावातील विहिरीचीही पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत चर्चा करून पेठ किल्ल्यावर असलेल्या शिवकालीन पाण्याच्या कुंडांची पाहणी केली. तीनपैकी दोन कुंडांमध्ये पाणी आहे; पण ते खाली कसे आणायचे? असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामस्थांची मागणी योग्य असल्याने तत्काळ ग्रामपंचायतीला आदेश देऊन किल्ल्यावरील पाणी खाली गावात आणण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यास सूचित करण्यात आले.>पेठ गावातील पाणीटंचाईची दाहकता लक्षात आली असून, किल्ल्यावरील पाणी खाली आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेठ गावात एक विहीर नव्याने खोदली जात असून त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघू शकेल.- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी