शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मर्कटलीलांनी बागायतदार हवालदिल, फळांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 01:07 IST

फळांचे नुकसान : वनविभागाने कारवाई करण्याची मागणी

अभय आपटे

रेवदंडा : अलिबाग तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या निसर्गरम्य आक्षी, नागांव, चौल आणि रेवदंडा गावातील बागांमध्ये माकडांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. ही माकडे काही फळे खातात तर त्यापेक्षा अधिक फेकून देतात. त्यामुळे या मर्क टलीलांनी बागायतदार हवालदिल झाले आहेत. यामुळे वनविभागाने योग्य करवाई करून बंदोबस्त करावा, अशी मागणी के ली जात आहे.

नारळ-सुपारीच्या बागा हे नागाव-रेवदंडा परिसराचे वैशिष्ट्य आहे. मुरुड-अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांना या बाजा भुरळ घालतात. त्यामुळेच येथील धार्मिक स्थळे पाहिल्यानंतर पर्यटक काही वेळ बागांच्या सानिध्यात विसावतात. आंबा, फणस, चिकू, पेरू, अननस, पपनीस, केळी, रामफळ, पपई आदी फळांची झाडेही येथे आहेत. चाफा, गुलाब, मोगरा, आबोली ही फुलेही बहरतात, तर वाल, पावटा, कडधान्ये पिकवली जातात. गेली अनेक वर्षे बागा व शेतीला नैसर्गिक आपत्तीची दृष्ट लागली असताना. कोळे रोगामुळे सुपारी गळून नुकसान होत आहे. चार वर्षांपासून इरीफाइड रोगाचा नारळाला प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे या फळाला आकार कमी होत असल्याने उत्पन्नात घट होत आहे. काही वर्षांपासून बागायतीला आणि शेतीला माकडांच्या उच्छादामुळे फटका बसला आहे. माकडांच्या टोळ्या फळझाडे झोडपून काढतात. अशा विविध कारणाने शेतकरी सतत अडचणीत येत आहे. चौल-रेवदंडा परिसरात माकडांचा उच्छाद पाहता बागांचे होणारे नुकसान पाहता त्यांना वनीकरण विभागाने पकडून भीमाशंकर, फणसाड व कर्नाळा अशा जवळच्या अभयारण्यात सोडण्यात यावे, अशी मागणी चौल चौकी परिसरातील बागायतदार विश्वास जोशी यांनी केली आहे.बाजारपेठांमध्येही मुक्तसंचारबागायतदारांचे, शेतीचे नुकसान करणारी माकडे आता मानवी वस्तीत घुसून बाजारपेठेतील एका घरावरून दुसºया घरावर उड्या मारतात. वेळ पडली तर वीज वितरण कंपनीच्या वीजवाहिनींचा आधार घेतात, त्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. काही प्रसंगी एका घरावरून दुसºया घरावर उडी मारताना रस्त्यावर पडून अपघातही घडत आहेत. दूरध्वनी वाहिन्यांवरून उड्या मारत असल्याने दूरध्वनी बंद पाडतात. घरांवरील पत्रे, कौले यांच्या नुकसानीची गणतीच नाही, यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत.

टॅग्स :MonkeyमाकडRaigadरायगड