शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

भरपाई लवकर न मिळाल्यास धरणे; पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:15 IST

चक्रीवादळामध्ये मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलचे नुकसान

आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळामध्ये मुरुड समुद्रकिनारी असलेल्या सर्व स्टॉल्स जमीनदोस्त झाले. वादळानंतर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त स्टॉल्सची पंचनाम केले. रविवारी त्या पंचनाम्याला ६७ दिवस झाले, तरी भरपाई मिळाली नाही. भरपाई न मिळाल्याने पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेने १५ आॅगस्टला धरणे आंदोलनाचा इशारा दिला असून, त्याचे रीतसर निवेदन मुरुड तहसीलदार गमन गावित यांना देण्यात आला आहे.मुरुड नगरपरिषदेचे ५० अधिकृत स्टॉल्स असून, स्टॉलमालक नगरपरिषदेला वार्षिक ८,००० रुपये भरतात, यामुळे दरवर्षी जवळजवळ चार लाखांचा महसूल मिळत आहे. नगरपरिषदेने स्टॉल्सधारकांची करारपत्रे व इतर कागदपत्रे तहसीलदार कार्यालयाकडे सुपुर्द केली आहेत; परंतु वादळ होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले, तरी एकाही स्टॉलधारकांना भरपाई मिळालेली नाही. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्टॉल बंद आहेत. त्यात या वादळाने स्टॉल्सचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत स्टॉलधारकांनी खायचे काय? हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे असूनही मुरुड तहसील कार्यालयाकडून याबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे, आम्ही सर्व येत्या १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसू, असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक स्टॉलधारक संघटनेने दिला आहे. मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडित यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.स्टॉलधारकांवर उपासमारीची वेळपद्मदुर्ग व्यावसायिक संघटना उपाध्यक्षा दिव्या सतविडकर यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सरसकट व लवकारात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, परंतु सर्व स्टॉलधारकांना अद्याप भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले आहे, चार महिने लॉकडाऊनमुळे स्टॉल्स बंद होते.स्टॉल्स उभा करण्याकरिता कोणी आपले दागिने विकले, तर कोणी कर्ज काढून स्टॉल्स उभे केले. शासनाने काही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने, पुन्हा आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करून स्टॉल्स चालू केले; परंतु निसर्गाच्या उद्रेकाने पुन्हा स्टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती मिळाली नाही. त्यामुळे स्टॉलधारकांवर उपासमारीची पाळी आली आहे असे सांगितले.याबाबत मुरुड तहसीलदार गमन गावीत यांना विचारणा केली असता, त्यावेळी म्हणाले की, सदर टपरीधारक हे समुद्रकिनाºयापासून सीआरझेडच्या क्षेत्रामधील आहेत. हे निवेदन सीआरझेडच्या क्षेत्रामधील असल्यामुळे शासकीय मान्यता नसल्यामुळे, हे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांकडून आदेश आल्यास, त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात येईल.- गमन गावीत, तहसीलदार, मुरुड