शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भरपाई लवकर न मिळाल्यास धरणे; पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:15 IST

चक्रीवादळामध्ये मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलचे नुकसान

आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळामध्ये मुरुड समुद्रकिनारी असलेल्या सर्व स्टॉल्स जमीनदोस्त झाले. वादळानंतर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त स्टॉल्सची पंचनाम केले. रविवारी त्या पंचनाम्याला ६७ दिवस झाले, तरी भरपाई मिळाली नाही. भरपाई न मिळाल्याने पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेने १५ आॅगस्टला धरणे आंदोलनाचा इशारा दिला असून, त्याचे रीतसर निवेदन मुरुड तहसीलदार गमन गावित यांना देण्यात आला आहे.मुरुड नगरपरिषदेचे ५० अधिकृत स्टॉल्स असून, स्टॉलमालक नगरपरिषदेला वार्षिक ८,००० रुपये भरतात, यामुळे दरवर्षी जवळजवळ चार लाखांचा महसूल मिळत आहे. नगरपरिषदेने स्टॉल्सधारकांची करारपत्रे व इतर कागदपत्रे तहसीलदार कार्यालयाकडे सुपुर्द केली आहेत; परंतु वादळ होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले, तरी एकाही स्टॉलधारकांना भरपाई मिळालेली नाही. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्टॉल बंद आहेत. त्यात या वादळाने स्टॉल्सचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत स्टॉलधारकांनी खायचे काय? हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे असूनही मुरुड तहसील कार्यालयाकडून याबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे, आम्ही सर्व येत्या १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसू, असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक स्टॉलधारक संघटनेने दिला आहे. मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडित यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.स्टॉलधारकांवर उपासमारीची वेळपद्मदुर्ग व्यावसायिक संघटना उपाध्यक्षा दिव्या सतविडकर यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सरसकट व लवकारात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, परंतु सर्व स्टॉलधारकांना अद्याप भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले आहे, चार महिने लॉकडाऊनमुळे स्टॉल्स बंद होते.स्टॉल्स उभा करण्याकरिता कोणी आपले दागिने विकले, तर कोणी कर्ज काढून स्टॉल्स उभे केले. शासनाने काही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने, पुन्हा आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करून स्टॉल्स चालू केले; परंतु निसर्गाच्या उद्रेकाने पुन्हा स्टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती मिळाली नाही. त्यामुळे स्टॉलधारकांवर उपासमारीची पाळी आली आहे असे सांगितले.याबाबत मुरुड तहसीलदार गमन गावीत यांना विचारणा केली असता, त्यावेळी म्हणाले की, सदर टपरीधारक हे समुद्रकिनाºयापासून सीआरझेडच्या क्षेत्रामधील आहेत. हे निवेदन सीआरझेडच्या क्षेत्रामधील असल्यामुळे शासकीय मान्यता नसल्यामुळे, हे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांकडून आदेश आल्यास, त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात येईल.- गमन गावीत, तहसीलदार, मुरुड