शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाने दिलेली मदत म्हणजे कोकणवासीयांची क्रूर थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 02:02 IST

मुरुड संघर्ष समिती व बागायतदार आक्रमक । मुख्यमंत्र्यांसह इतरांनाही पाठविले निवेदन

आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील नारळ, सुपारी, आंबा आदी बागायती पार उद्ध्वस्त होऊन बागायतदारांचे दहा ते बारा वर्षांत भरून येणार नाही, एवढे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने नुकसान भरपाई म्हणून नारळ प्रति झाड २५० रुपये सुपारी प्रति झाड ५० रुपये देऊन कोकणवासीयांची क्रूर थट्टाच केली आहे, असा आरोप करून मुरुडच्या संघर्ष समिती व बागायतदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सदर नुकसान भरपाईबाबत पुनर्विचार करण्याची मागणी एका निवेदनाजद्वारे केली आहे.

सदर बागायतदारांना शासनाने कांदा-बटाट्याच्या दरात अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई दिली आहे. एका सुपारीच्या झाडापासून वार्षिक उत्पन्न १००० रुपये, नारळाच्या झाडापासून २००० रुपये, आंबा ८ ते दहा हजार, फणस, चिकू, पेरू आदीपासून १००० ते १२००रुपये, तर केळीच्या झाडापासून ५०० रुपये उत्पन्न मिळते. कोकणातील बहुतांशी बागायतदारांचे ते उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन आहे. कांदा-बटाट्याचे पीक वर्षातून दोनदा येते, परंतु सुपारी, नारळ, आंबा पिकांना दहा ते बारा वर्षे लागतात. म्हणजेच एवढ्या वर्षाचे उत्पन्न बुडाल्यात जमा आहे.मुरुडमधील पंचनामे योग्य तºहेने केले गेलेले नाहीत. शासनाने दिलेली भरपाई ही कोणत्या कृषी तज्ज्ञाकडून माहिती घेऊन दिलेली आहे, असा सवालही करण्यात आला आहे. निवेदनाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे यांना पाठविण्यात आल्या आहेत.असे झाले आहेनुकसाननुकसानग्रस्त झालेली नारळाची झाडे तोडून उचलण्यास प्रत्येकी2000रुपये,सुपारी झाडास100रुपये प्रत्येक झाडाला,तर आंबा व अन्य झाडांस4000रुपयेअसा खर्च झाला आहे. त्या मानाने दिलेली भरपाई ही अत्यंत तुटपुंजी आहे.

टॅग्स :Raigadरायगड