शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाने दिलेली मदत म्हणजे कोकणवासीयांची क्रूर थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 02:02 IST

मुरुड संघर्ष समिती व बागायतदार आक्रमक । मुख्यमंत्र्यांसह इतरांनाही पाठविले निवेदन

आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील नारळ, सुपारी, आंबा आदी बागायती पार उद्ध्वस्त होऊन बागायतदारांचे दहा ते बारा वर्षांत भरून येणार नाही, एवढे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने नुकसान भरपाई म्हणून नारळ प्रति झाड २५० रुपये सुपारी प्रति झाड ५० रुपये देऊन कोकणवासीयांची क्रूर थट्टाच केली आहे, असा आरोप करून मुरुडच्या संघर्ष समिती व बागायतदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सदर नुकसान भरपाईबाबत पुनर्विचार करण्याची मागणी एका निवेदनाजद्वारे केली आहे.

सदर बागायतदारांना शासनाने कांदा-बटाट्याच्या दरात अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई दिली आहे. एका सुपारीच्या झाडापासून वार्षिक उत्पन्न १००० रुपये, नारळाच्या झाडापासून २००० रुपये, आंबा ८ ते दहा हजार, फणस, चिकू, पेरू आदीपासून १००० ते १२००रुपये, तर केळीच्या झाडापासून ५०० रुपये उत्पन्न मिळते. कोकणातील बहुतांशी बागायतदारांचे ते उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन आहे. कांदा-बटाट्याचे पीक वर्षातून दोनदा येते, परंतु सुपारी, नारळ, आंबा पिकांना दहा ते बारा वर्षे लागतात. म्हणजेच एवढ्या वर्षाचे उत्पन्न बुडाल्यात जमा आहे.मुरुडमधील पंचनामे योग्य तºहेने केले गेलेले नाहीत. शासनाने दिलेली भरपाई ही कोणत्या कृषी तज्ज्ञाकडून माहिती घेऊन दिलेली आहे, असा सवालही करण्यात आला आहे. निवेदनाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे यांना पाठविण्यात आल्या आहेत.असे झाले आहेनुकसाननुकसानग्रस्त झालेली नारळाची झाडे तोडून उचलण्यास प्रत्येकी2000रुपये,सुपारी झाडास100रुपये प्रत्येक झाडाला,तर आंबा व अन्य झाडांस4000रुपयेअसा खर्च झाला आहे. त्या मानाने दिलेली भरपाई ही अत्यंत तुटपुंजी आहे.

टॅग्स :Raigadरायगड