शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखांची मदत

By admin | Updated: September 5, 2015 22:57 IST

फेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर

- सिकंदर अनवारे,  दासगांवफेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर ही मोठ्या प्रमाणात गळूण गेला होता. याची भरपाई म्हणून महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान पोटी ३ करोड ६५ लाखाची मदत जाहीर केली असूनही मदतीची रक्कम महाड तहसिल कार्यालयात वर्ग करण्यात आली आहे.पावसाळ्यात कोकणातील बळीराजा हा निसर्गावर अवलंबून राहून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असतो आणि पावसाळा संपता संपता कडधान्याची ठोकणी व पेरणी करुन जवळपास मार्च महिन्यापर्यंत दुबार कडधान्याचेही पिक काढतो.मात्र यंदा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या काळावधीमध्ये संपूर्ण महाड तालुक्यात अवेळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकाऊन नेला होता. यामुळे पावटा, वाल, तूर, मुंग, हरभरा, मटकी अशी अनेक कडधान्याची पिके या पावसामुळे नासधुस झाली होती. यावेळी तलाठ्यांमार्फत प्रत्येक विभागाचे नुकसानीचा पंचनामे करण्यात आले होते. शासनाने याची दखल घेत महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखाची मदत जाहीर केली असून शेतकऱ्यांना वाटपासाठी ही रक्कम महाड तहसिल कार्यालयाकडे वर्ग केली आहे.या नुकसानाचे निकष काढत शासनाने ज्या शेतकऱ्यांचे आंबा व काजू पिकाचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर ज्या शेतकऱ्यांचे कडधान्याचे नुकसान झाले आहे. त्यांना हेक्टरी एक हजार अशी मदत देण्यास जाहीर केली आहे. या लागणाऱ्या पावसामध्ये २५०३ अंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर ४९७१ कडधान्याचे नुकसान झाल्याचे शेतकरी होते. फेब्रुवारी व मार्चमध्ये महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांचे आंबापिके व कडधान्याचे नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडून पाठवण्यात आले होते. त्याप्रमाणे ३ कोटी ६५ लाखाची मदत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे. पंचनाम्याच्यावेळी ७/१२ किंवा पासबूक झेरॉक्स घेण्यात आली नव्हती. लाभार्थी शेतकऱ्यांची नावे प्रत्येक सजेतील तलाठ्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. त्यांनी ७/१२, बँकखाते पासबूक झेरॉक्स जमा केल्यावर लगेच पैसे वर्ग होतील.- संदीप कदम, तहसीलदार, महाड