शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखांची मदत

By admin | Updated: September 5, 2015 22:57 IST

फेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर

- सिकंदर अनवारे,  दासगांवफेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर ही मोठ्या प्रमाणात गळूण गेला होता. याची भरपाई म्हणून महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान पोटी ३ करोड ६५ लाखाची मदत जाहीर केली असूनही मदतीची रक्कम महाड तहसिल कार्यालयात वर्ग करण्यात आली आहे.पावसाळ्यात कोकणातील बळीराजा हा निसर्गावर अवलंबून राहून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असतो आणि पावसाळा संपता संपता कडधान्याची ठोकणी व पेरणी करुन जवळपास मार्च महिन्यापर्यंत दुबार कडधान्याचेही पिक काढतो.मात्र यंदा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या काळावधीमध्ये संपूर्ण महाड तालुक्यात अवेळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकाऊन नेला होता. यामुळे पावटा, वाल, तूर, मुंग, हरभरा, मटकी अशी अनेक कडधान्याची पिके या पावसामुळे नासधुस झाली होती. यावेळी तलाठ्यांमार्फत प्रत्येक विभागाचे नुकसानीचा पंचनामे करण्यात आले होते. शासनाने याची दखल घेत महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखाची मदत जाहीर केली असून शेतकऱ्यांना वाटपासाठी ही रक्कम महाड तहसिल कार्यालयाकडे वर्ग केली आहे.या नुकसानाचे निकष काढत शासनाने ज्या शेतकऱ्यांचे आंबा व काजू पिकाचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर ज्या शेतकऱ्यांचे कडधान्याचे नुकसान झाले आहे. त्यांना हेक्टरी एक हजार अशी मदत देण्यास जाहीर केली आहे. या लागणाऱ्या पावसामध्ये २५०३ अंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर ४९७१ कडधान्याचे नुकसान झाल्याचे शेतकरी होते. फेब्रुवारी व मार्चमध्ये महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांचे आंबापिके व कडधान्याचे नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडून पाठवण्यात आले होते. त्याप्रमाणे ३ कोटी ६५ लाखाची मदत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे. पंचनाम्याच्यावेळी ७/१२ किंवा पासबूक झेरॉक्स घेण्यात आली नव्हती. लाभार्थी शेतकऱ्यांची नावे प्रत्येक सजेतील तलाठ्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. त्यांनी ७/१२, बँकखाते पासबूक झेरॉक्स जमा केल्यावर लगेच पैसे वर्ग होतील.- संदीप कदम, तहसीलदार, महाड