शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

नवसूच्या वाडीतील भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:42 IST

विहिरी आटल्या : दोन डोंगर उतरून न्यावे लागते पाणी; महिलांना करावी लागते पायपीट

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारेमध्ये असलेल्या नवसूची वाडीमध्ये भीषण पाणीटंचाईला आदिवासी ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्या वाडीतील आदिवासी लोकांना नळपाणी योजना नसल्याने आणि वाडीमधील सर्व विहिरी आटल्याने पाणी आणण्यासाठी दोन डोंगर उतरून खाली कुरुंग येथील विहिरीवर जावे लागत आहे. दरम्यान, तब्बल चार किलोमीटरची पायपीट नवसूच्या वाडीमधील महिलांना करावी लागत आहे. शासनाचे टँकर पाणी अशी पाणीटंचाई असूनदेखील पोहोचत नाहीत.

वारे ग्रामपंचायतमधील नवसूची वाडी ही आदिवासीवाडी वारे-ताडवाडी रस्त्यावर असून, मुख्य रस्त्यावरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासीवाडीमधील पिण्याच्या पाण्याची विहीर आटली आहे. ४५ घरांची वस्ती असलेल्या नवसूची वाडीमधील पिण्याचे पाणी एप्रिल महिन्यात आटले आहे.

एप्रिल महिन्यापासून नवसूच्या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वाडीमध्ये मुख्य रस्त्याने यावे लागते, येथे येण्यासाठी लागणारे दोन्ही डोंगर उतरून खाली मुख्य रस्त्यावर असलेल्या कुरुंग येथील विहिरीवर जावे लागते. ते अंतर साधारण साडेतीन ते चार किलोमीटरचे असून, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पायी जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय आदिवासी ग्रामस्थांकडे नाही. त्यामुळे साडेतीन-चार किलोमीटरचे अंतर पार करून खाली बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिला पुन्हा त्याच रस्त्याने डोंगर चढून वाडीत पोहोचतात. ही कसरत नवसूची वाडीमधील आदिवासी लोकांना दररोज करावी लागत आहे. त्या महिलांना एकदा डोंगर उतरून खाली कुरुंग येथे गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी अवघड वाट नवसूच्या वाडीची असून खाली डांबरी रस्ता आग ओकत असताना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ शासनाच्या लक्षात येत नाही.

आदिवासीवाडीमधील ग्रामस्थांनी वारे ग्रामपंचायत आणि शासनाकडे कुरुंगच्या शासकीय बोअरवेलमधून पाणी योजना करण्याची मागणी केली आहे. त्या बोअरवेलमधून नळपाणी योजना करता येत नसेल तर वाडीच्या अर्ध्या खाली आल्यानंतर असणाºया नाल्यात विहीर खोदून द्यावी आणि त्या विहिरीमधील पाणी पंप लावून वाडीमध्ये नेऊन नव्याने बांधण्यात आलेल्या साठवण टाकीमध्ये टाकावे, अशी मागणी होत आहेत.

नवसूच्या वाडीमध्ये नवीन विहीर बांधण्याचा प्रस्ताव तयार असून तो मंजूर झाल्यास नवीन नळपाणी योजना तयार करता येईल. ग्रामस्थांची सूचना आहे त्याच ठिकाणी विहीर खोदली जाईल, असे आश्वासन आम्ही ग्रामस्थांना दिले आहे. - आर. डी. कांबळे, उपअभियंता, जिल्हा लघु-पाटबंधारे विभाग

नवसूची वाडी पाणीटंचाई कृती आराखड्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त वाडी म्हणून नाव आहे. मात्र, तेथे शासनाचे टँकर पोहोचविण्याचा प्रस्ताव आला नाही. - बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती