शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आरोग्य विभागालाच उपचारांची गरज, अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:39 IST

सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता : मुख्य आरोग्य अधिकारी पदही अस्थिर; अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम

नामदेव मोरे नवी मुंबई : श्रीमंती व विकासाचा ढोल वाजवणाºया नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग शहरवासीयांचा उत्तम सुविधा देण्यास सक्षम नसल्याचे पाच महिन्यांत निदर्शनास आले आहे. मुख्य आरोग्य अधिकाºयासह कोविडची जबाबदारी असणारे उपायुक्त महत्त्वाच्या क्षणी सुट्टीवर गेले आहेत. सक्षम अधिकारी नसल्याने जबाबदारीची वारंवार खांदेपालट करावी लागत आहे. आरोग्य विभागांतर्गत कुरघोडीच्या राजकारणानेही पोखरला गेला असून, या विभागालाच उपचारांची गरज निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी आरोग्य विभागावर १00 ते १५0 कोटी रुपये खर्च करत आहे. रुग्णालयीन इमारतींची बांधणी व दुरुस्तीवरही कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, परंतु एवढा खर्च करूनही शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यात अपयश येऊ लागले आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडेसोळा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. आयुक्तांसह सर्व प्रशासन महामारी रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना, ऐन मोक्याच्या क्षणी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब सोनावणे आजारी पडले आहेत. आयुक्तांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर ते अचानक अजारी पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य विभागातील पहिले उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्यावर कोविडची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, परंतु त्यांनीही महत्त्वाच्या क्षणी महानगरपालिकेतून पळ काढला आहे. सद्यस्थितीमध्ये डॉ.दयानंद कटके यांच्याकडे तात्पुरती या विभागाची जबाबदारी सोपविली आहे.वास्तविक, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून महानगरपालिकेला सक्षम अधिकारी सापडलाच नाही. वारंवार जबाबदारी बदलावी लागत आहे. सुरुवातीला परिमंडळ दोनचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली, परंतु त्यांच्यावर टीका होऊ लागल्यामुळे त्यांचे अधिकार कमी करण्यात आले. साथ नियंत्रण अधिकारी डॉ.उज्ज्वला ओतुरकर या कोविडविषयी काम पाहात होत्या. त्यांच्याकडील कामही काढून घेण्यात आले. काही दिवस डेंटिस्ट असणाºया डॉक्टरवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानंतर, पुन्हा खांदेपालट करून कोविडविषयी जबाबदारी प्रशासनाचा पुरेसा अनुभव नसलेल्या डॉ.राहुल गेठे यांच्यावर सोपविण्यात आला. तेही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. गेठे यांनी महानगरपालिकेच्या सेवेतून मुक्त करण्याचा अर्ज केला असून, त्यांनी जबाबदारीमधून पळ काढल्याची टीका होऊ लागली आहे.कर्मचाऱ्यांची कमतरताआरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही कधीच नाराजी व्यक्त केली नाही.डॉक्टर, कर्मचाºयांची कमतरता असून, आयत्या वेळी भरतीची वेळ पालिकेवर आली आहे.कुरघोडीचे राजकारणच्नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाएवढे कुरघोडीचे राजकारण इतर कोणत्याच विभागात पाहावयास मिळत नाही.च्महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचे प्रकार पाहावयास मिळतात. काही महत्त्वाच्या पदांवर वर्षानुवर्षे ठरावीक अधिकारी ठाण मांडून बसले आहेत.च्अनेकांनी मुख्यालयाच्या बाहेर फारसे काम केलेले नाही. प्रत्यक्ष रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात काम करण्यात अनेक जण नकार देतात.आरोग्य अधिकारी पदही अस्थिरमहानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी हे पदच अस्थिर झाले आहे. अनेक वेळा अधिकारी बदलले आहेत. काही दिवस डॉ.दयानंद कटके यांच्याकडे जबाबदारी दिली. शासनाकडून बाळासाहेब सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली. सद्यस्थितीमध्ये ते आजारी असल्यामुळे पुन्हा कटके यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. मुख्य आरोग्य अधिकारी पदासाठी सक्षम अधिकारी नसल्याने, शहरवासीयांना सुविधा देता येत नाहीत.

टॅग्स :Raigadरायगड