शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

बहिष्काराच्या प्रथेने काढले डोके वर

By admin | Updated: October 8, 2015 00:05 IST

व्यापक प्रमाणात राबविलेल्या मोहिमेमुळे सामाजिक बहिष्कारांच्या प्रथा बंद झाल्याचे सांगत पाठ थोपटून घेणाऱ्या रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.

- आविष्कार देसाई,  अलिबागव्यापक प्रमाणात राबविलेल्या मोहिमेमुळे सामाजिक बहिष्कारांच्या प्रथा बंद झाल्याचे सांगत पाठ थोपटून घेणाऱ्या रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. परजातीमध्ये विवाह केल्याने श्रीवर्धन तालुक्यात निगडी येथील गावपंचायतीने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी ३१ जणांविरोधात रायगडच्या पोलीस अधीक्षकांमार्फत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेने वाळीत प्रथा बंद झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र या घटनेने खरे चित्र समोर आले असल्याचे बोलले जाते.दिलीप बाळाराम जावळेकर आणि अमोल सदानंद जावळेकर हे दोघेही सुतार समाजातील असून ते श्रीवर्धन तालुक्यातील निगडी गावात राहतात. दिलीप यांचा मुलगा राजू जावळेकर याने मराठा समाजातील मुली (रा. कोळे, ता.म्हसळा) बरोबर रजिस्टर मॅरेज केले. त्यांना एक मुलगी आहे. त्याचप्रमाणे अमोल जावळेकर यांनी कुणबी समाजातील मुली (रा. मुहुलवाडी, ता. देवगड, जि.रत्नागिरी) बरोबर रीतसर लग्न केले असून त्यांना एक मुलगा आहे.गावकीने याचा जाब जावळेकर कुटुंबाला विचारला. त्यांच्या विरोधाला न जुमानल्यामुळे परजातीमध्ये लग्न केल्याने गावकीचे पित्त खवळले. गावकीने प्रथम त्यांची गावकीसाठी घेण्यात येणारी वर्गणी बंद केली. पूजेसाठी लागणारी गावकीच्या मालकीची भांडीही दिली नाहीत आणि पूजेलाही आले नसल्याचे दिलीप आणि अमोल जावळेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. काकीच्या भरणी श्राध्दाच्या विधीतून गावकीने हाकलून लावल्याचेही तक्रार अर्जात नमूद आहे. राजमार्गावर कुंपण घालून येण्या-जाण्याची वहिवाटही बंद करण्यात आली होती. त्यानंतर कायदेशीर मार्गाने तो मार्ग मोकळा करुन घेतल्याचे दिलीप जावळेकरांचे म्हणणे आहे. लग्न कार्यासाठी भांडी न देणे, लग्नाला न येणे अशा प्रकारे समाजातून एक प्रकारे बहिष्कृत करीत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सामाजिक बहिष्काराच्या प्रथेमुळे गावकीचे पंच भारतीय संविधानाला विरोध करीत समांतर न्याय व्यवस्था निर्माण करीत असून ती सर्वच समाजातील नागरिकांना आणि पर्यायाने लोकशाहीला घातक आहे. सामाजिक बहिष्काराची कीड वेळीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पावले टाकणे गरजेचे आहे. सामाजिक बहिष्कारचे बिल लवकरच पारित झाले, तर अशा घटनांना निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे.पोलीस अधीक्षकांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते कामानिमित्त मुंबईमध्ये होते.मोलमजुरी करणारे कुटुंब अडचणीत१जावळेकर कुटुंबाला मदत करणारे सुनिता जावळेकर, सुजाता पानवलकर, रजनी कातळकर, नम्रता पालवणकर आणि शालिनी जोगळेकर यांचीही वर्गणी घेण्याचे बंद केले असून त्यांनाही वाळीत टाकल्याचा दावा जावळेकर कुटुंबाने तक्रारीत केला आहे. ५० हजार रुपयांचा दंड भरा आणि समाजात परत या, असे गावकीकडून धमकावले जात आहे. ५० हजार रुपये दंड भरता येत नसल्याने १५ हजार रुपयांच्या दंडाची मागणी करीत असल्याचेही जावळेकर म्हणाले.३सामाजिक बहिष्काराच्या प्रथेमुळे गावकीचे पंच भारतीय संविधानाला विरोध करीत समांतर न्याय व्यवस्था निर्माण करीत असून ती सर्वच समाजातील नागरिकांना आणि पर्यायाने लोकशाहीला घातक आहे. सामाजिक बहिष्काराची कीड वेळीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पावले टाकणे गरजेचे आहे. सामाजिक बहिष्कारचे बिल लवकरच पारित झाले, तर अशा घटनांना निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे.दिलीप बाळाराम जावळेकर आणि अमोल सदानंद जावळेकर हे दोघेही सुतार समाजातील असून ते निगडी गावात राहतात. दिलीप यांचा मुलगा राजू जावळेकर याने मराठा समाजातील मुली बरोबर रजिस्टर मॅरेज केले आहे.