शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हरिहरेश्वर - मारळ मार्गावर दरड कोसळली

By admin | Updated: June 14, 2017 01:03 IST

तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दक्षिण काशी हरिहरेश्वर ते श्रीवर्धन मार्गावर मारळ गावानजीक रस्त्यावर मंगळवारी सकाळी दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दक्षिण काशी हरिहरेश्वर ते श्रीवर्धन मार्गावर मारळ गावानजीक रस्त्यावर मंगळवारी सकाळी दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.सकाळी सुमारे ६.३०च्या सुमारास दरड कोसळली असून, तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घटनास्थळी पोहचून रास्ता मोकळा के ला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. या वेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पंचायत समिती गटविकास अधिकारी हंबीर, पोलीस आदी यंत्रणा उपस्थित होती. श्रीवर्धन ते हरिहरेश्वर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते, मात्र दरड कोसळली त्या वेळी सुदैवाने येथे कोणीही नसल्यामुळे मोठी हानी टळली. रत्नागिरी व रायगड या दोन कोकणातील जिल्ह्यांना जोडणारी बागमांडला बाणकोट खाडी हरिहरेश्वरपासून काहीच अंतरावर असल्यामुळे या मार्गावरून वाहने धावत असतात. मारळ येथे दरड पडल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर ते श्रीवर्धनमधील शेखाडी मार्ग दरड कोसळण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र मारळमध्ये प्रथमच असा प्रकार घडला असून, अशा ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना तहसीलदार सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्या आहेत.