शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

शाळा सुरू करण्यासाठी कष्टकऱ्यांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 00:16 IST

डहाणू प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या : आदिवासी भागातील मुलांचे होते नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : कोविडमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असून पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील शिक्षण व्यवस्था अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे डहाणू प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळा तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी कष्टकरी संघटनेने डहाणू प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला.आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याबाबत संघटनेचे अध्यक्ष ब्रायन लोबो यांनी निवेदन सादर केले. या मोर्चात शेकडो विद्यार्थी, पालक व संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले.

डहाणू प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १७ वसतिगृहे व ३५ आश्रमशाळा आहेत. तसेच तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४७१ प्राथमिक व ४८ माध्यमिक शाळा आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरातील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात ऑनलाइन शिक्षण मिळाले. परंतु आदिवासी भागात ऑनलाइन व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरली. डहाणू व पालघरमधील डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना आदिवासी क्षेत्रातील शाळा अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत टिकण्यासाठी शाळा नियमित सुरू करणे हा पर्याय असल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे आहे.प्रकल्पात समाविष्ट आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेऊन त्यांना निवासी राहण्याची व्यवस्था करावी, चालू शैक्षणिक वर्ष मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवून १० दिवसांनंतर जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, इ. मागण्यांचे निवेदन कष्टकरी नेते ब्रायन लोबो, मधुबेन धोडी, सिराज बलसारा यांच्या शिष्टमंडळाने सहायक प्रकल्प अधिकारी शकुंतला मते, उमेश काशीद व पं.स.चे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी आम्हाला स्मार्टफोन द्या, कुठे आहे जंगलात नेटवर्क? ऑनलाइन शिक्षण बंद करा, आमची शाळा सुरू करा, अशा घोषणा देत शेकडो विद्यार्थ्यांनी प्रकल्प आवारात ठिय्या आंदोलन केले.

टॅग्स :Raigadरायगड