शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दीड तासांच्या प्रयत्नांती तरुणाला वाचविण्यात यश

By admin | Updated: July 16, 2017 02:53 IST

उमरोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नदी पार करूनच घरी पोहोचावे लागते. जीवावर उदार होऊन येथील ग्रामस्थांना

- लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : उमरोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नदी पार करूनच घरी पोहोचावे लागते. जीवावर उदार होऊन येथील ग्रामस्थांना नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून जावे लागते. याच पुलावरून शनिवारी दुपारी एक तरुण जात असताना पाय घसरल्याने पाण्यात पडला. धुवाधार पावसामुळे त्याला बाहेर येणे शक्य झाले नाही. अखेर अग्निशमन दल व तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने त्याचा जीव वाचवला.जवळपास हजारो लोकवस्ती असलेले उमरोली गाव गाढी नदीच्या किनारी वसलेले आहे. गावातील नागरिकांना नदीवरील छोट्याशा फरशी पुलावरून जावे लागते. पावसाळ्यात फरशीवरून जाताना नागरिकांची तारांबळ उडते. या ठिकाणी पाय घसरून पडल्याने कित्येक जण जखमी झाले आहेत. तर काहींना जीव गमवावा लागला आहे. शनिवारी दुपारी ३च्या सुमारास झारखंड येथे राहणारा २२ वर्षीय युवक अजय सिंग हा हरीग्राम येथील इमारतीवरील काम आटोपून उमरोली गावात जात होता. नदीला आलेला पूर पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला नदीतून न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही त्याने फरशीवरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नदीतून जात असताना त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला व वाहून जाऊ लागला. अग्निशमक दलाचे अनिल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक शालिग्राम, शैलेश ठाकूर यांच्या मदतीने अग्निशमक दलाच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने मोठ्या प्रयत्नाने दोरीच्या साहाय्याने एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अजय सिंग याचा जीव वाचविला. या वेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.जवळपास १०० फूट पुढे असलेल्या कातळावर सिंग अडकला. आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब अग्निशमक दलाला कळविले व सिडको व महापालिकेची अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.