शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

पालकत्व निभावणे हे सर्वात अवघड काम

By admin | Updated: January 1, 2017 03:33 IST

‘आपल्या पाल्यांना पठडीबाज शिक्षण दिले तर ते एकांगी होईल, या जगात त्याचा निभाव लागणे कठीण होऊन बसेल. मुलांकडे बघायला पालकांना वेळ मिळत नाही, त्यातच

कर्जत : ‘आपल्या पाल्यांना पठडीबाज शिक्षण दिले तर ते एकांगी होईल, या जगात त्याचा निभाव लागणे कठीण होऊन बसेल. मुलांकडे बघायला पालकांना वेळ मिळत नाही, त्यातच एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. मुलांच्या कलाने घ्या, त्यांचे हट्ट पुरवा, त्यांच्यासाठी वेळ द्या. त्यांना वाचनाची सवय लावा. वाचनातच व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती दडली आहे. हल्ली पालकत्व निभावणे हे जगातील सर्वात अवघड काम होऊन बसले आहे. त्यामुळे पालकांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली पाहिजे,’ असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ बालकवी अनंत भावे यांनी येथे दिला. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशुमंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत भावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे आणि संत विचारावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.आज अनेक क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलांना केवळ नोकरी कर, असे म्हणणे चुकीचे असून त्यांच्या कलागुणांना वाव तसेच प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही भावे यांनी सूचित केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश वैद्य, शालेय समिती अध्यक्षा अनुपमा कुलकर्णी, सदस्या सविता मुजुमदार, अरविंद पड्याळ, मुख्याध्यापिका उमा डोंगरे आदी उपस्थित होते. स्नेहसंमेलन प्रमुख भारती जोशी व पल्लवी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे झाडाचे रोप व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. उमा डोंगरे यांनी प्रास्ताविकात ‘सत्तावीस वर्षांपूर्वी शाळा सुरू करताना केवळ शंभर विद्यार्थी होते, परंतु आज शाळेत पंधराशे विद्यार्थी आहेत यावरूनच शाळेची गुणवत्ता दिसून येते’, असे स्पष्ट केले. अनंत भावे यांनी अब्राहम लिंकन, सचिन तेंडुलकर, अकबर-बिरबल आदी गोष्टींतून त्यांच्या पालकत्वाचा अनुभव सांगितला. त्यानंतर अनेक बालकविता सादर केल्या. गणेश वैद्य यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता जोशी व मंजूषा सोनावणे यांनी केले.