शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पालकत्व निभावणे हे सर्वात अवघड काम

By admin | Updated: January 1, 2017 03:33 IST

‘आपल्या पाल्यांना पठडीबाज शिक्षण दिले तर ते एकांगी होईल, या जगात त्याचा निभाव लागणे कठीण होऊन बसेल. मुलांकडे बघायला पालकांना वेळ मिळत नाही, त्यातच

कर्जत : ‘आपल्या पाल्यांना पठडीबाज शिक्षण दिले तर ते एकांगी होईल, या जगात त्याचा निभाव लागणे कठीण होऊन बसेल. मुलांकडे बघायला पालकांना वेळ मिळत नाही, त्यातच एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. मुलांच्या कलाने घ्या, त्यांचे हट्ट पुरवा, त्यांच्यासाठी वेळ द्या. त्यांना वाचनाची सवय लावा. वाचनातच व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती दडली आहे. हल्ली पालकत्व निभावणे हे जगातील सर्वात अवघड काम होऊन बसले आहे. त्यामुळे पालकांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली पाहिजे,’ असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ बालकवी अनंत भावे यांनी येथे दिला. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशुमंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत भावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे आणि संत विचारावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.आज अनेक क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलांना केवळ नोकरी कर, असे म्हणणे चुकीचे असून त्यांच्या कलागुणांना वाव तसेच प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही भावे यांनी सूचित केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश वैद्य, शालेय समिती अध्यक्षा अनुपमा कुलकर्णी, सदस्या सविता मुजुमदार, अरविंद पड्याळ, मुख्याध्यापिका उमा डोंगरे आदी उपस्थित होते. स्नेहसंमेलन प्रमुख भारती जोशी व पल्लवी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे झाडाचे रोप व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. उमा डोंगरे यांनी प्रास्ताविकात ‘सत्तावीस वर्षांपूर्वी शाळा सुरू करताना केवळ शंभर विद्यार्थी होते, परंतु आज शाळेत पंधराशे विद्यार्थी आहेत यावरूनच शाळेची गुणवत्ता दिसून येते’, असे स्पष्ट केले. अनंत भावे यांनी अब्राहम लिंकन, सचिन तेंडुलकर, अकबर-बिरबल आदी गोष्टींतून त्यांच्या पालकत्वाचा अनुभव सांगितला. त्यानंतर अनेक बालकविता सादर केल्या. गणेश वैद्य यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता जोशी व मंजूषा सोनावणे यांनी केले.