शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रोजगार मेळाव्यात ७०२ जणांना हमीपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:59 IST

९२३ जणांना मुलाखतीसाठी निमंत्रण । पनवेलमध्ये हजारो उमेदवारांनी केली नोंदणी

पनवेल : खांदा वसाहत येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात शनिवारी ७०२ जणांना जागेवरच रोजगार हमीपत्रक देण्यात आले, तर ९२३ जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेले आहे. मल्हार रोजगार व सीकेटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आयोजित ‘भव्य रोजगार मेळावा २०१९’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात विविध क्षेत्रातील ६८ अग्रगण्य कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एकूण ३६८० उमेदवारांची दुपारपर्यंत नोंदणी केली होती. यामधील ७० टक्के उमेदवार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील, तर उर्वरित उरण, पेण, कर्जत व नवी मुंबई परिसरामधून या ठिकाणी सहभागी झाले होते.सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आदी क्षेत्रात आदर्श काम करण्याबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर उल्लेखनीय कार्य करत असल्याचे विचार या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला १५ वा रोजगार मेळावा असून आजपर्यंत ७६८० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.मेळाव्यात शिक्षित-अशिक्षित, दहावी-बारावी उत्तीर्ण-अनुउत्तीर्ण, पदवीधर, अभियंता व इतर अशा शैक्षणिक पात्रतेनुसार हजारो नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आल्या. 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल