शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

भूजल पातळी खालावली

By admin | Updated: June 3, 2016 01:59 IST

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पळचिल गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तब्बल ४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्चून खोदण्यात आलेल्या

जयंत धुळप,  अलिबागरायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पळचिल गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तब्बल ४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्चून खोदण्यात आलेल्या विहिरीस पाणीच लागले नसल्याने, ग्रामस्थांची तहानही भागली नाही आणि पैसेही फुकट गेले अशी भावना ग्रामस्थांची झाली आहे. पळचिल गावचे ग्रामस्थ तथा पळचिल ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मारुती जाधव यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती प्राप्त झाली आहे.तीव्र उन्हाळ््यामुळे सध्या पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी या ग्रामस्थांवर आली आहे. पावसाचे आगमन एका आठवड्याने जरी लांबले तर पळचिल ग्रामस्थांवर स्थलांतर करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. १९८८-८९ मध्ये रायगड जिल्हा परिषदेमार्फत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले होते परंतु ती योजना गावातील लोकांसाठी अपुरी ठरली. गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधून तयार असून देखील पाण्याअभावी नवीन इमारतीतील आरोग्य केंद्र सुरु करता आलेले नाही, अशी गंभीर परिस्थिती पाण्याअभावी निर्माण झाली असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.ग्रामस्थांच्या मागणीनुसार रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत भूजल सर्वेक्षण विभागाकडून नवीन पाणी योजना प्रस्तावित करण्यात आली. प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार विहीर बांधणे, उर्ध्व वाहिनी टाकणे, साठवण टाकी बांधणे व गावात गुरुत्व वाहिनी टाकणे आदी बाबींसाठीच्या पाणी पुरवठा योजनेकरिता ४६ लाख १ हजार १६७ रुपये मंजूर करण्यात आले अशी माहिती, माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना पळचिल गावचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ माारुती जाधव यांना रायगड जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अलिबाग या कार्यालयाकडून लेखी देण्यात आली आहे. या विहिरीचे बांधकाम गतवर्षी मे २0१५ मध्ये पूर्ण झाले असून विहिरीमध्ये मात्र थेंबभरही पाणी सापडलेले नाही. परिणामी शासनाने ४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्च करुन आणि भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करुन सुद्धा विहिरीत पाण्याचा थेंबही नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थ संतप्त व अस्वस्थ झाले आहे. कोणत्याही क्षणी पाण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे जाधव यांनी सांगितले. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी बेजबाबदार व चुकीच्या पद्धतीने काम करुन संपूर्ण ग्रामस्थांची आणि शासनाची फसवणूक केली आहे, असा आरोप पळचिलमधील जनता करीत आहे. या पाणी योजनेची पूर्णपणे चौकशी करुन ग्रामस्थांना पाणी देण्याची व्यवस्था करावी नाही तर पाण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल असे ग्रामस्थांच्या वतीने जाधव यांनी सांगितले.४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्च करुन आणि भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करुन सुद्धा विहिरीत पाण्याचा थेंबही नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थ संतप्त व अस्वस्थ झाले आहे. कोणत्याही क्षणी पाण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मारुती जाधव यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.> पळचिलमधील या विहिरीच्या खोदाईकरिता भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या सर्वेक्षण अहवालानुसारच विहिरीची त्याच ठिकाणी खोदई करण्यात आली आहे. पोलादपूर तालुक्यांतील नैसर्गिक भूजल पातळी मुळातच खाली गेली आहे. त्यातच या तालुक्यांतील या पळचिल गावासह अनेक गावे ही डोंगरावर असल्याने तेथे भूजल स्रोत सत्वर उपलब्ध होण्यात अनेकदा अडचणी येतात.भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार पळचिल गावांतील या विहिरीकरिता १०.५ मीटरची खोदाई के ली परंतु पाणी लागले नसल्याने १३ मीटरपर्यंत करण्यात आली. तरीही पाणी लागलेले नाही.विहिरीला कायमस्वरुपी पाणी राहाण्याकरिता जलशिवार योजनेतून बंधारा बांधणे प्रस्तावित असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा महाडचे शाखा अभियंता शैलेश बुटाला यांनी सांगितले.