शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळी खालावली

By admin | Updated: June 3, 2016 01:59 IST

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पळचिल गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तब्बल ४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्चून खोदण्यात आलेल्या

जयंत धुळप,  अलिबागरायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पळचिल गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तब्बल ४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्चून खोदण्यात आलेल्या विहिरीस पाणीच लागले नसल्याने, ग्रामस्थांची तहानही भागली नाही आणि पैसेही फुकट गेले अशी भावना ग्रामस्थांची झाली आहे. पळचिल गावचे ग्रामस्थ तथा पळचिल ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मारुती जाधव यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती प्राप्त झाली आहे.तीव्र उन्हाळ््यामुळे सध्या पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी या ग्रामस्थांवर आली आहे. पावसाचे आगमन एका आठवड्याने जरी लांबले तर पळचिल ग्रामस्थांवर स्थलांतर करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. १९८८-८९ मध्ये रायगड जिल्हा परिषदेमार्फत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले होते परंतु ती योजना गावातील लोकांसाठी अपुरी ठरली. गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधून तयार असून देखील पाण्याअभावी नवीन इमारतीतील आरोग्य केंद्र सुरु करता आलेले नाही, अशी गंभीर परिस्थिती पाण्याअभावी निर्माण झाली असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.ग्रामस्थांच्या मागणीनुसार रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत भूजल सर्वेक्षण विभागाकडून नवीन पाणी योजना प्रस्तावित करण्यात आली. प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार विहीर बांधणे, उर्ध्व वाहिनी टाकणे, साठवण टाकी बांधणे व गावात गुरुत्व वाहिनी टाकणे आदी बाबींसाठीच्या पाणी पुरवठा योजनेकरिता ४६ लाख १ हजार १६७ रुपये मंजूर करण्यात आले अशी माहिती, माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना पळचिल गावचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ माारुती जाधव यांना रायगड जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अलिबाग या कार्यालयाकडून लेखी देण्यात आली आहे. या विहिरीचे बांधकाम गतवर्षी मे २0१५ मध्ये पूर्ण झाले असून विहिरीमध्ये मात्र थेंबभरही पाणी सापडलेले नाही. परिणामी शासनाने ४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्च करुन आणि भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करुन सुद्धा विहिरीत पाण्याचा थेंबही नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थ संतप्त व अस्वस्थ झाले आहे. कोणत्याही क्षणी पाण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे जाधव यांनी सांगितले. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी बेजबाबदार व चुकीच्या पद्धतीने काम करुन संपूर्ण ग्रामस्थांची आणि शासनाची फसवणूक केली आहे, असा आरोप पळचिलमधील जनता करीत आहे. या पाणी योजनेची पूर्णपणे चौकशी करुन ग्रामस्थांना पाणी देण्याची व्यवस्था करावी नाही तर पाण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल असे ग्रामस्थांच्या वतीने जाधव यांनी सांगितले.४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्च करुन आणि भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करुन सुद्धा विहिरीत पाण्याचा थेंबही नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थ संतप्त व अस्वस्थ झाले आहे. कोणत्याही क्षणी पाण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मारुती जाधव यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.> पळचिलमधील या विहिरीच्या खोदाईकरिता भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या सर्वेक्षण अहवालानुसारच विहिरीची त्याच ठिकाणी खोदई करण्यात आली आहे. पोलादपूर तालुक्यांतील नैसर्गिक भूजल पातळी मुळातच खाली गेली आहे. त्यातच या तालुक्यांतील या पळचिल गावासह अनेक गावे ही डोंगरावर असल्याने तेथे भूजल स्रोत सत्वर उपलब्ध होण्यात अनेकदा अडचणी येतात.भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार पळचिल गावांतील या विहिरीकरिता १०.५ मीटरची खोदाई के ली परंतु पाणी लागले नसल्याने १३ मीटरपर्यंत करण्यात आली. तरीही पाणी लागलेले नाही.विहिरीला कायमस्वरुपी पाणी राहाण्याकरिता जलशिवार योजनेतून बंधारा बांधणे प्रस्तावित असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा महाडचे शाखा अभियंता शैलेश बुटाला यांनी सांगितले.