शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

मुशेत नदीवरील नव्या पुलाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 04:32 IST

एक कोटी २२ लाखांचा निधी मंजूर; ७० वर्षे जुना पूल मोडकळीस आल्याने नवीन प्रस्ताव

अलिबाग : तालुक्यातील मुशेत नदीवर नव्याने पूल बांधण्याला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. पुलासाठी तब्बल एक कोटी २२ लाख ५० हजार रुपये मंजूरही केले आहेत. ७० वर्षे जुन्या पुलाच्या जागी आता लवकरच नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पुलावरून प्रवास करताना आता जीव मुठीत घेऊन जावे लागणार नाही.मुशेत पूल पूर्णपणे मोडकळीस आला असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तसेच या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हा पूल नादुरुस्त असल्याने या पुलावरून अलिबाग, रेवस तसेच बेलवली, बहिरोळे, मापगाव, कनकेश्वर देवस्थान, मुशेत आणि कार्लेखिंडीकडे जाणारी वाहने जीव मुठीत धरून प्रवास करतात. ग्रामीण भागाची नाळ अलिबाग शहराला जोडण्याचे महत्त्वाचे काम या पुलाचे आहे. मात्र, पुलाची दयनीय अवस्था झाल्याने तेथे नव्याने पुलाची उभारणी करणे आवश्यक झाले होते. याबाबत काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सरकारकडे मागणी केली होती. त्यांनी त्याबाबतचे पत्र १६ आॅगस्ट २०१८ रोजी दिले होते. अलिबाग शहराकडे येणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी हा महत्त्वाचा पूल आहे. त्यामुळे या पुलाची नव्याने निर्मिती व्हावी, यासाठी २००५ सालापासून प्रयत्न सुरू होते, अशी माहिती माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली.नागरिक सातत्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. एखादा अपघात झाल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. ही गंभीर बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने १२ सप्टेंबर २०१८ च्या निर्णयाने या पुलासाठी एक कोटी २२ लाख ५० हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळेही जिल्ह्यातील सर्व पुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारने सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्टरल आॅडिट करण्याचे आदेश दिले होते.या पुलाचे काम ७० वर्षांपूर्वी झाले आहे. २०१३ च्या मुसळधार पावसामध्ये या पुलाचे एका बाजूकडील दगडी बांधकाम असलेला काही भाग कोसळला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीही काही ठिकाणचा भाग कमी-अधिक प्रमाणात ढासळतच होता. या धोकादायक झालेल्या पुलामुळे एक वाहनचालक वाहून गेले होते; परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. सर्व गंभीर परिस्थिती पाहता रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुशेत नदीवरील पूल पूर्णपणे नादुरुस्त झाला असल्याने नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी विनंती ठाकूर यांनी सरकारकडे पुन्हा केली होती.

टॅग्स :Raigadरायगड