शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

मुशेत नदीवरील नव्या पुलाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 04:32 IST

एक कोटी २२ लाखांचा निधी मंजूर; ७० वर्षे जुना पूल मोडकळीस आल्याने नवीन प्रस्ताव

अलिबाग : तालुक्यातील मुशेत नदीवर नव्याने पूल बांधण्याला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. पुलासाठी तब्बल एक कोटी २२ लाख ५० हजार रुपये मंजूरही केले आहेत. ७० वर्षे जुन्या पुलाच्या जागी आता लवकरच नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पुलावरून प्रवास करताना आता जीव मुठीत घेऊन जावे लागणार नाही.मुशेत पूल पूर्णपणे मोडकळीस आला असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तसेच या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हा पूल नादुरुस्त असल्याने या पुलावरून अलिबाग, रेवस तसेच बेलवली, बहिरोळे, मापगाव, कनकेश्वर देवस्थान, मुशेत आणि कार्लेखिंडीकडे जाणारी वाहने जीव मुठीत धरून प्रवास करतात. ग्रामीण भागाची नाळ अलिबाग शहराला जोडण्याचे महत्त्वाचे काम या पुलाचे आहे. मात्र, पुलाची दयनीय अवस्था झाल्याने तेथे नव्याने पुलाची उभारणी करणे आवश्यक झाले होते. याबाबत काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सरकारकडे मागणी केली होती. त्यांनी त्याबाबतचे पत्र १६ आॅगस्ट २०१८ रोजी दिले होते. अलिबाग शहराकडे येणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी हा महत्त्वाचा पूल आहे. त्यामुळे या पुलाची नव्याने निर्मिती व्हावी, यासाठी २००५ सालापासून प्रयत्न सुरू होते, अशी माहिती माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली.नागरिक सातत्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. एखादा अपघात झाल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. ही गंभीर बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने १२ सप्टेंबर २०१८ च्या निर्णयाने या पुलासाठी एक कोटी २२ लाख ५० हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळेही जिल्ह्यातील सर्व पुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारने सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्टरल आॅडिट करण्याचे आदेश दिले होते.या पुलाचे काम ७० वर्षांपूर्वी झाले आहे. २०१३ च्या मुसळधार पावसामध्ये या पुलाचे एका बाजूकडील दगडी बांधकाम असलेला काही भाग कोसळला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीही काही ठिकाणचा भाग कमी-अधिक प्रमाणात ढासळतच होता. या धोकादायक झालेल्या पुलामुळे एक वाहनचालक वाहून गेले होते; परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. सर्व गंभीर परिस्थिती पाहता रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुशेत नदीवरील पूल पूर्णपणे नादुरुस्त झाला असल्याने नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी विनंती ठाकूर यांनी सरकारकडे पुन्हा केली होती.

टॅग्स :Raigadरायगड